शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

मोदींनी सांगितला 'आत्मनिर्भर'तेचा फंडा; आपल्याला फक्त ग्लोबल व्हायचं नाहीय तर...

By मोरेश्वर येरम | Updated: January 5, 2021 21:38 IST

भारत देश कौशल्य आणि कलागुणांचं केंद्रस्थान राहीला आहे. देशातील स्टार्टअप उद्योगांना मिळालेलं यश हे देशातील तरुणांमधील उत्साहाची जाणीव करुन देतात.

ठळक मुद्देभारतीय उत्पादनं गुणवत्ता पूर्ण असावीत, असं मोदींनी म्हटलंयदेशात स्टार्टअप उद्योगांना मोठं यश मिळाल्याचंही मोदी म्हणालेसंपूर्ण जग आज स्वस्त, टीकाऊ आणि प्रयोगशील उत्पादनांच्या शोधात

नवी दिल्लीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आत्मनिर्भरतेबाबत देशाच्या युवा आणि उद्योगपतींसमोर आपले विचार मांडले. आत्मनिर्भर होऊन केवळ आपल्याला जागतिक बाजारपेठ भारतीय उत्पादनांनी भरायची नाहीय, तर भारतीय उत्पादनांनी जगभरातील लोकांच्या हृदयात स्थान प्राप्त करायला हवं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 

पंतप्रधान मोदींनी आज आपल्या लिंक्डइन अकाऊंटवर एक लेख प्रसिद्ध केला आहे. यात त्यांनी आत्मनिर्भर भारतामागचा उद्देश देशातील नागरिकांना समजावून सांगितला आहे. भारतीय कंपन्या जे उत्पादन तयार करतील त्याचं संपूर्ण जगभरात कौतुक व्हायला हवं, असं मोदी म्हणाले. 

भारत देश कौशल्य आणि कलागुणांचं केंद्रस्थान राहीला आहे. देशातील स्टार्टअप उद्योगांना मिळालेलं यश हे देशातील तरुणांमधील उत्साहाची जाणीव करुन देतात. देशातील युवा नवनवीन सेवा आणि उत्पादनांची निर्मिती करत आहेत. त्यांच्यासाठी देश आणि विदेशात मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत, असं मोदी म्हणतात. 

"संपूर्ण जग आज स्वस्त, टीकाऊ आणि प्रयोगशील उत्पादनांच्या शोधात आहे. आत्मनिर्भर भारत कौशल्य आणि गुणवत्ता या दोन सिद्धांतावर अवलंबून आहे. जास्तीत जास्त उत्पादन करण्याचा आमचा ध्यास आहे. पण त्याचसोबत आमच्या उत्पादनांची गुणवत्ता देखील उत्तम असायला हवी", असं मोदींनी म्हटलं आहे. 

जेव्हा आपण 'मेक इन इंडिया'चा नारा देतो तेव्हा फक्त भारतात उत्पादन व्हावं हा एकमेव उद्देश त्यामागे नाही. तर भारतात तयार होणाऱ्या उत्पादनांना जागतिक पातळीवर देखील मान्यता मिळायला हवी, असा उद्देश आहे. भारत आज संपूर्ण जगासाठी मोठी बाजारपेठ असल्याचंही मोदी यावेळी म्हणाले.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMake In Indiaमेक इन इंडियाBJPभाजपाIndiaभारत