शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

मोदींनी सांगितला 'आत्मनिर्भर'तेचा फंडा; आपल्याला फक्त ग्लोबल व्हायचं नाहीय तर...

By मोरेश्वर येरम | Updated: January 5, 2021 21:38 IST

भारत देश कौशल्य आणि कलागुणांचं केंद्रस्थान राहीला आहे. देशातील स्टार्टअप उद्योगांना मिळालेलं यश हे देशातील तरुणांमधील उत्साहाची जाणीव करुन देतात.

ठळक मुद्देभारतीय उत्पादनं गुणवत्ता पूर्ण असावीत, असं मोदींनी म्हटलंयदेशात स्टार्टअप उद्योगांना मोठं यश मिळाल्याचंही मोदी म्हणालेसंपूर्ण जग आज स्वस्त, टीकाऊ आणि प्रयोगशील उत्पादनांच्या शोधात

नवी दिल्लीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आत्मनिर्भरतेबाबत देशाच्या युवा आणि उद्योगपतींसमोर आपले विचार मांडले. आत्मनिर्भर होऊन केवळ आपल्याला जागतिक बाजारपेठ भारतीय उत्पादनांनी भरायची नाहीय, तर भारतीय उत्पादनांनी जगभरातील लोकांच्या हृदयात स्थान प्राप्त करायला हवं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 

पंतप्रधान मोदींनी आज आपल्या लिंक्डइन अकाऊंटवर एक लेख प्रसिद्ध केला आहे. यात त्यांनी आत्मनिर्भर भारतामागचा उद्देश देशातील नागरिकांना समजावून सांगितला आहे. भारतीय कंपन्या जे उत्पादन तयार करतील त्याचं संपूर्ण जगभरात कौतुक व्हायला हवं, असं मोदी म्हणाले. 

भारत देश कौशल्य आणि कलागुणांचं केंद्रस्थान राहीला आहे. देशातील स्टार्टअप उद्योगांना मिळालेलं यश हे देशातील तरुणांमधील उत्साहाची जाणीव करुन देतात. देशातील युवा नवनवीन सेवा आणि उत्पादनांची निर्मिती करत आहेत. त्यांच्यासाठी देश आणि विदेशात मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत, असं मोदी म्हणतात. 

"संपूर्ण जग आज स्वस्त, टीकाऊ आणि प्रयोगशील उत्पादनांच्या शोधात आहे. आत्मनिर्भर भारत कौशल्य आणि गुणवत्ता या दोन सिद्धांतावर अवलंबून आहे. जास्तीत जास्त उत्पादन करण्याचा आमचा ध्यास आहे. पण त्याचसोबत आमच्या उत्पादनांची गुणवत्ता देखील उत्तम असायला हवी", असं मोदींनी म्हटलं आहे. 

जेव्हा आपण 'मेक इन इंडिया'चा नारा देतो तेव्हा फक्त भारतात उत्पादन व्हावं हा एकमेव उद्देश त्यामागे नाही. तर भारतात तयार होणाऱ्या उत्पादनांना जागतिक पातळीवर देखील मान्यता मिळायला हवी, असा उद्देश आहे. भारत आज संपूर्ण जगासाठी मोठी बाजारपेठ असल्याचंही मोदी यावेळी म्हणाले.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMake In Indiaमेक इन इंडियाBJPभाजपाIndiaभारत