शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

‘आम आदमी पार्टी’ची धूळवड थांबेना

By admin | Updated: March 5, 2015 23:52 IST

दोन नेत्यांना पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीतून (पीएसी) हटविण्याच्या निर्णयावर आपचे वरिष्ठ नेते मयंक गांधी यांनी गुरुवारी तीव्र नाजारी व्यक्त केली.

मयंक गांधी : यादव, भूषण यांच्या हकालपट्टीवर नाराजी; निर्णयामागील हेतूवर प्रश्नचिन्हनवी दिल्ली : आम आदमी पार्टीत धूळवड सुरूच असून प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव या दोन नेत्यांना पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीतून (पीएसी) हटविण्याच्या निर्णयावर आपचे वरिष्ठ नेते मयंक गांधी यांनी गुरुवारी तीव्र नाजारी व्यक्त केली. उभय नेत्यांना हटविण्याची पद्धत आणि त्यामागील हेतूवरही त्यांनी हल्लाबोल केला आहे.राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत बुधवारी झालेल्या मतदानाच्या वेळी मयंक गांधी अनुपस्थित होते. यादव आणि भूषण या दोघांनीही स्वेच्छेने समितीतून बाहेर पडण्याची तयारी दर्शविल्यानंतरही मनीष सिसोदिया यांनी उभयतांना हटविण्याचा प्रस्ताव मांडण्याच्या प्रकाराने आपण स्तब्ध झालो आहोत, अशा शब्दात त्यांनी आपले दु:ख व्यक्त केले आहे. आपल्या ब्लॉगवर यासंदर्भात मत मांडतानागांधी यांनी भूषण आणि यादव पीएसीचे सदस्य राहिल्यास आपण आपचे राष्ट्रीय संयोजक म्हणून काम करू शकणार नाही, असे अरविंद केजरीवाल यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते, असा दावा केला आहे. यादव हे केजरीवाल यांच्याविरुद्ध कटकारस्थान रचत होते असा ठपका ठेवण्यात आला असून बैठकीदरम्यान यासंदर्भात काही साक्षीही देण्यात आल्या. काम करण्यात अडचणी येत असल्याने केजरीवाल आपल्यास पीएसीमध्ये ठेवू इच्छीत नाहीत. तेव्हा मी व प्रशांत समितीतून बाहेर पडू परंतु आम्हाला काढण्यात येऊ नये, असे योगेंद्र यादव यांनी सांगितले होते. त्यांनी दोन फॉर्म्युलेही दिले होते. पीएसीची पुनर्स्थापना करण्यात यावी आणि मतदानाद्वारे नवीन सदस्यांची निवड व्हावी. भूषण आणि यादव यात उमेदवार राहणार नाहीत. समितीच्या कामकाजाची विद्यमान पद्धतच कायम राहील आणि उभय नेते कुठल्याही बैठकीला हजर राहणार नाहीत, असे सुचविण्यात आले होते, याकडे गांधी यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले की, बैठकीच्या मध्यान्हानंतर मनीष सिसोदिया आणि इतरांनी आशिष खेतान, आशुतोष, दिलीप पांडे आदींसोबत विचारविनिमय केला आणि त्यानंतर बैठक पुन्हा सुरू होताच सिसोदिया यांनी यादव व प्रशांत यांना समितीतून बाहेर काढण्याचा प्रस्ताव मांडला. संजयसिंग यांनी त्याला अनुमोदन दिले. सिसोदिया यांच्या प्रस्तावाने आपण स्तब्ध झालो आहोत. या दोघांना हटविण्यात आल्याने आपण चकित झालो असून हा निर्णय कार्यकर्त्यांच्या भावना दुखावणारा आहे, अशी खंत गांधी यांनी व्यक्त केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)पक्षाच्या कामकाजात तोडगा निघू शकणार नाहीत असे काही मतभेद आहेत. तसेच एके (केजरीवाल), पीबी (भूषण) आणि वायवाय (यादव) यांच्यात परस्पर विश्वासाची कमतरता आहे, असे आपचे नेते मयंक गांधी यांनी म्हटले आहे.दरम्यान सकाळी येथे पत्रकारांशी बोलताना यादव यांनी गांधींच्या ब्लॉगवर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. आपण तो वाचला असल्याचे मात्र त्यांनी सांगितले. पक्ष सोडण्याची शक्यताही त्यांनी फेटाळली असून समर्थकांना आपल्यावर विश्वास असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.