एकत्र आत्महत्या करण्याचा इरादा पण ऐनवेळी प्रेयसीची माघार, प्रियकराची उडी अन् मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2024 03:35 PM2024-02-03T15:35:17+5:302024-02-03T15:36:01+5:30

अनेकांनी आपल्या प्रेमासाठी जीव गमावल्याच्या घटना घडल्या आहेत.

A 32-year-old married lover ended his life for his 20-year-old girlfriend in Balotra, Rajasthan | एकत्र आत्महत्या करण्याचा इरादा पण ऐनवेळी प्रेयसीची माघार, प्रियकराची उडी अन् मृत्यू

एकत्र आत्महत्या करण्याचा इरादा पण ऐनवेळी प्रेयसीची माघार, प्रियकराची उडी अन् मृत्यू

प्रेम आंधळं असतं... प्रेमात कोण कोणत्या थराला जाईल याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही, असं नेहमी बोललं जातं. अनेकांनी आपल्या प्रेमासाठी जीव गमावल्याच्या घटना घडल्या आहेत. अशातच राजस्थानमधील बालोत्रा ​​येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे आत्महत्या करण्याच्या इराद्याने रेल्वे स्टेशनवर पोहचलेल्या प्रेमी युगुलातील तरूणीनं ऐनवेळी माघार घेतली पण तरूणाला आपला जीव गमवावा लागला. 

३४ वर्षीय प्रियकरानं रेल्वे येताच उडी मारली अन् जीवन संपवलं. मात्र, त्याच्या प्रेयसीनं अखेरच्या क्षणी तिचा निर्णय बदलला आणि माघार घेतली. खरं तर मृत प्रियकराला २ मुलं देखील आहेत. ही घटना गुरुवारी रात्री राजस्थानमधील बालोत्रा ​​जिल्ह्यातील पाचपदरा पोलीस स्टेशन परिसरात घडली.  

प्रियकराची उडी अन् मृत्यू  
राजू भट्ट असं मृताचं नाव असून तो मजुरी करून उदरनिर्वाह करायचा. राजू विवाहित असून त्याला दोन मुलं आहेत. या घटनेनंतर राजूच्या कुटुंबीयांनी त्याची प्रेयसी रवीना (२०) आणि तिच्या कुटुंबीयांवर हत्येचा आरोप केला आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. एकाच गावात राहणारे राजू आणि रवीना यांच्यात मागील एक वर्षापासून प्रेमसंबंध होते. 

दरम्यान, लग्न होत नसल्याने राजू आणि रवीना यांच्यात वाद झाला आणि त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. दोघेही जवळच्या रेल्वे स्टेशनजवळ पोहचले. पण वेगवान ट्रेन आल्यावर ट्रेनचा वेग पाहून रवीना घाबरून मागे सरकली, मात्र तोपर्यंत राजूनं तिच्यासमोर उडी मारली होती. त्यानंतर रेल्वे गार्ड आणि स्टेशनच्या इतर कर्मचाऱ्यांनी राजूचा मृतदेह बालोत्रा ​​स्थानकात आणला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून राजूचा मृतदेह रुग्णालयात नेला.

कुटुंबीयांचा गंभीर आरोप 
राजूच्या कुटुंबीयांनी मृतदेह घेण्यास नकार देत प्रेयसी रवीना आणि तिच्या कुटुंबीयांच्या अटकेची मागणी केली. याआधी देखील राजूला जीवे मारण्याच्या धमक्या आल्याचा आरोप मृताच्या भावाने केला. महिलेच्या कुटुंबीयांनी राजूचा खून केला आणि त्याचा मृत्यू आत्महत्या करून झाला असं भासवण्यासाठी त्याचा मृतदेह ट्रॅकवर ठेवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, राजूचं १५ वर्षांपूर्वी लग्न झालं होतं आणि त्याला आठ आणि पाच वर्षांची दोन मुलं आहेत.

Web Title: A 32-year-old married lover ended his life for his 20-year-old girlfriend in Balotra, Rajasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.