शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
2
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
3
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
4
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
5
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
6
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
7
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
8
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
9
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
10
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
11
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
12
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

कर्नाटकात कर्जमाफीनंतरही शेतकरी आत्महत्या, एका महिन्यात 90 शेतक-यांनी संपवली जीवनयात्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2017 4:19 PM

जुलै महिन्यात 90 हून जास्त शेतक-यांनी आत्महत्या केली आहे

बंगळुरु, दि. 19 - कर्नाटकात दुष्काळाला कंटाळून होणा-या शेतकरी आत्महत्या अजूनही सुरुच आहेत. अधिकृत माहितीनुसार, गेल्या जुलै महिन्यात 90 हून जास्त शेतक-यांनी आत्महत्या केली आहे. विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुखमंत्री सिद्धरमय्या यांनी कर्जमाफीची घोषणा केली होती. यावेळी त्यांनी 8,165 कोटी रुपयांची कर्जमाफी करत असल्याचं जाहीर केलं होतं. राज्यातील 22 लाख शेतक-यांच्या डोक्यावरील कर्जाचं ओझं कमी करण्याच्या हेतूने ही कर्जमाफी जाहीर करण्यात आली होती. मात्र कर्जमाफीची घोषणा होऊनही शेतक-यांच्या आत्महत्या काही थांबत नसल्याचं आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, 1 एप्रिलपासून ते 30 जून दरम्यान दिवसाला दोन शेतक-यांनी आत्महत्या केली आहे. मात्र जुलै महिन्यात परिस्थिती खूपच गंभीर झाली आहे. जुलै महिन्यात दिवसाला तीन शेतक-यांनी आत्महत्या केल्याचा रिपोर्ट आला आहे. गेल्या चार महिन्यात एकूण 297 शेतक-यांनी आत्महत्या केली असल्याचं रिपोर्टमध्ये नमूद आहे. 

सरकारने कर्जमाफीसाठी पावलं उचलली जात असल्याची घोषणा केली असली तरी शेतकरी आत्महत्या सत्र सुरुच आहे. 15 ऑगस्ट रोजी रमेश नावाच्या शेतक-याने विष पिऊन आत्महत्या केली होती. दुस-या दिवशी त्याचा मृत्यू झाला होता. रमेशच्या नावे एक एकर जमीन होती. सुरुवातीच्या तपासादरम्यान डोक्यावर दोन लाखाचं कर्ज असल्याने रमेशने आत्महत्या केल्याचं सांगण्यात आलं होतं. कृषी विभाग आणि स्थानिक अधिकारी रमेशच्या आत्महत्येचं नेमकं काय कारण आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महिन्याच्या अखेरपर्यंत नेमकी माहिती हाती लागेल. 

जुलै महिन्यात झालेल्या शेतकरी आत्महत्येमधील 50 टक्के आत्महत्या कावेरीजवळील परिसरात झाल्या आहेत. मंड्या, म्हैसूर, हासन आणि कोडागू येथे 48 शेतक-यांनी आत्महत्या केली आहे. 30 जूनपर्यंत मंड्या येथे एकूण आठ शेतक-यांनी आत्महत्या केली होती. 31 जुलैपर्यंत हा आकडा 29 वर पोहोचला. याचप्रमाणे म्हैसूर येथे मृतांचा आकडा 11 वरुन 25 वर पोहोचला आहे. हासन येथे जून महिन्यात सात शेतक-यांनी आत्महत्या केली. जुलै अखेरपर्यंत आत्महत्येचा आकडा 19 झाला होता. बागलकोट आणि बेळगावात जून महिन्यात सहा-सहा शेतक-यांनी आत्महत्या केल्या होत्या. जो आकडा नंतर अनुक्रमे 12 आणि 22 झाला. 

टॅग्स :Farmerशेतकरी