शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

मध्यपूर्वेतील युद्धात ८ भारतीयांचा मृत्यू, एक बेपत्ता; ५५ लाख मायदेशी परतले, केंद्र सरकारची मोठी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 10:57 IST

मध्यपूर्वेतील संघर्षात आतापर्यंत ८ भारतीयांचा मृत्यू झाला असून ५५ लाख लोक भारतात परतले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने याबद्दलची अधिकृत माहिती दिली आहे.

मध्यपूर्वेत इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे तिथे राहणाऱ्या लाखो भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, या संघर्षात आतापर्यंत ८ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला असून, एक भारतीय नागरिक अद्याप बेपत्ता आहे. दरम्यान, युद्धजन्य परिस्थितीतून आतापर्यंत तब्बल ५५ लाख भारतीय नागरिक सुखरूप मायदेशी परतले आहेत.

युद्धात भारतीयांचे बळी

परराष्ट्र मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव असीम आर. महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, मध्यपूर्वेतील विविध देशांमध्ये कोट्यवधी भारतीय वास्तव्यास आहेत. अलीकडेच कुवेतमध्ये झालेल्या एका हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. परराष्ट्र मंत्रालय सध्या मृत नागरिकांच्या पार्थिवाला भारतात आणण्यासाठी स्थानिक प्रशासनाच्या सतत संपर्कात आहे. बेपत्ता असलेल्या एका भारतीयाचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदींची कूटनीती आणि मोठी चर्चा

दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या युद्धाबाबत जागतिक स्तरावर कूटनीतिक प्रयत्न सुरू केले आहेत. २८ मार्च रोजी पंतप्रधान मोदींनी सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान यांच्याशी फोनवरून सविस्तर चर्चा केली. यावेळी व्यापारी जहाजांची सुरक्षा आणि समुद्री मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाले. तसेच, प्रादेशिक ऊर्जा पायाभूत सुविधांवर होणाऱ्या हल्ल्यांचा भारताने निषेध केला आहे.

दूतावास २४ तास सतर्क

"सरकार आपल्या नागरिकांच्या सुरक्षेबाबत अत्यंत गंभीर आहे," असे महाजन यांनी स्पष्ट केले. युद्धाच्या पार्श्वभूमीवर संबंधित देशांतील भारतीय दूतावास २४ तास कार्यरत असून भारतीयांच्या मदतीसाठी विशेष हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी सांगितले की, भारत सातत्याने संयम बाळगण्याचे आवाहन करत असून चर्चा आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातूनच हे युद्ध संपावे, अशी भारताची भूमिका आहे.

५५ लाख भारतीयांची घरवापसी

२८ फेब्रुवारीपासून मध्यपूर्वेतील विविध देशांतून सुमारे ५५ लाख प्रवाशांनी भारतात परतणे पसंत केले आहे. यामध्ये स्थलांतरित कामगार आणि पर्यटकांचा समावेश आहे. सरकारकडून वेळोवेळी 'ट्रॅव्हल ॲडव्हायझरी' जारी करण्यात येत असून भारतीयांना सुरक्षित स्थळी राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Middle East Conflict: 8 Indians Dead, Millions Return Home

Web Summary : Middle East conflict claims 8 Indian lives, one missing. 5.5 million Indians safely returned home amid escalating tensions. The government is providing assistance and advocating for peaceful resolution through diplomacy. Embassies are on high alert.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIndiaभारतWarयुद्ध