शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
3
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
5
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
6
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
7
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
8
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
9
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
10
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
11
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
12
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
13
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
14
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
15
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
16
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
17
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
18
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
19
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
20
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल

झाकण बाजूला ठेवून पुठ्ठ्याने झाकलं गटार; पाय ठेवताच कोसळला ७ वर्षाचा मुलगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 08:47 IST

दिल्लीत महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे एका चिमुकल्याचा जीव जाता जाता वाचला आहे.

Delhi Accident : देशाच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडत आहे. डोंगराळ भागात पावसामुळे दरडी कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत. केरळमधील  वायनाडमध्ये मुसळधार पावसानंतर झालेल्या भूस्खलनामुळे शेकडो लोकांचा मृत्यू झाला. राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढत चालला आहे. दिल्लीत मुसळधार पावसानंतर पाणी भरल्यामुळे तीन तरुणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता प्रशासनाच्या भोंगळ कारभाराची एक घटना समोर आली आहे. गटावरील झाकण गायब झाल्यामुळे एक मुलगा जखमी झाला आहे.

दिल्लीत महानगरपालिकेच्या निष्काळजीपणाचे प्रकरण समोर आले आहे. महापालिकेने केलेल्या चुकीमुळे त्यात सात वर्षांच्या चिमुरड्याचा जीव जाता जाता वाचला आहे. दक्षिण दिल्लीतील एका सार्वजनिक शाळेमध्ये इयत्ता तिसरीमध्ये शिकणारा मुलगा शुक्रवारी डिफेन्स कॉलनी परिसरात असलेल्या गटारात पडला. गटावर झाकण लावण्याऐवजी कागदी पुठ्ठा लावल्याने हा मुलगा मॅनहोलमध्ये पडला. सकाळी आठच्या सुमारास त्याचे वडील मुलाला शाळेत सोडण्यासाठी जात होते. त्याच्यासोबत त्याची आई आणि लहान बहीणही होती.

जेव्हा मुलगा शाळेच्या बाहेर गाडीतून उतरला तेव्हा त्याने अनवधानाने त्याचा पाय एका पुठ्ठ्यावर ठेवला, ज्याच्या खाली गटार होते. मुलाचे वजन पडताच पुठ्ठा फाटला आणि तो गटारामध्ये पडला. शेजारी उभे असलेले लोक आणि मुलाचे आई-वडील लगेचच धावून आले आणि त्याला गटारातून बाहेर काढले. मुलाला ताबडतोब एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आले, तेथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.

बँकेत कर्मचारी असलेल्या मुलाच्या वडिलांनी सांगितले की, गटाराचे झाकण त्याच ठिकाणी बाजूला ठेवण्यात आले होते आणि तिथे पुठ्ठ्याचे कव्हर ठेवण्यात आले होते. मुलाच्या वडिलांनी या अपघातासाठी दिल्ली महानगरपालिकेला जबाबदार धरलं आहे. मुलाच्या वडिलांनी शहरातील गटाराच्या ऑडिटवर प्रश्न उपस्थित करत या अपघाताची जबाबदारी एमसीडीच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी, असं म्हटलं आहे.

मॅनहोलमध्ये एखादा वृद्ध पुरुष किंवा स्त्री पडली असती तर काय झाले असते? या घटनेसाठी कोणत्या प्रशासनाला जबाबदार धरावे?, असा सवाल मुलाच्या वडिलांनी केला. मुलाच्या पालकांकडून अद्याप कोणतीही तक्रार आलेली नाही. दरम्यान, गाजीपूर भागात बांधकाम सुरू असलेल्या नाल्यात पडून महिला आणि तिच्या मुलाचा मृत्यू झाल्याच्या काही दिवसांनंतर ही धक्कादायक घटना घडली आहे.

दरम्यान, मुसळधार पावसानंतर संपूर्ण दिल्लीत पाणी साचल्यानंतर अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. २७ जुलै रोजी जुन्या राजेंद्र नगर परिसरात असलेल्या आरएयूच्या आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात पावसाचे पाणी साचलं होतं. तळघरात पाणी तुंबल्याने यूपीएससीची तयारी करणारे तीन विद्यार्थी बुडाले होते. दिल्लीत पावसामुळे पाणी साचण्यानंतर घडलेल्या घटनांमध्ये आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :delhiदिल्लीAccidentअपघात