शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

झाकण बाजूला ठेवून पुठ्ठ्याने झाकलं गटार; पाय ठेवताच कोसळला ७ वर्षाचा मुलगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 08:47 IST

दिल्लीत महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे एका चिमुकल्याचा जीव जाता जाता वाचला आहे.

Delhi Accident : देशाच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडत आहे. डोंगराळ भागात पावसामुळे दरडी कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत. केरळमधील  वायनाडमध्ये मुसळधार पावसानंतर झालेल्या भूस्खलनामुळे शेकडो लोकांचा मृत्यू झाला. राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढत चालला आहे. दिल्लीत मुसळधार पावसानंतर पाणी भरल्यामुळे तीन तरुणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता प्रशासनाच्या भोंगळ कारभाराची एक घटना समोर आली आहे. गटावरील झाकण गायब झाल्यामुळे एक मुलगा जखमी झाला आहे.

दिल्लीत महानगरपालिकेच्या निष्काळजीपणाचे प्रकरण समोर आले आहे. महापालिकेने केलेल्या चुकीमुळे त्यात सात वर्षांच्या चिमुरड्याचा जीव जाता जाता वाचला आहे. दक्षिण दिल्लीतील एका सार्वजनिक शाळेमध्ये इयत्ता तिसरीमध्ये शिकणारा मुलगा शुक्रवारी डिफेन्स कॉलनी परिसरात असलेल्या गटारात पडला. गटावर झाकण लावण्याऐवजी कागदी पुठ्ठा लावल्याने हा मुलगा मॅनहोलमध्ये पडला. सकाळी आठच्या सुमारास त्याचे वडील मुलाला शाळेत सोडण्यासाठी जात होते. त्याच्यासोबत त्याची आई आणि लहान बहीणही होती.

जेव्हा मुलगा शाळेच्या बाहेर गाडीतून उतरला तेव्हा त्याने अनवधानाने त्याचा पाय एका पुठ्ठ्यावर ठेवला, ज्याच्या खाली गटार होते. मुलाचे वजन पडताच पुठ्ठा फाटला आणि तो गटारामध्ये पडला. शेजारी उभे असलेले लोक आणि मुलाचे आई-वडील लगेचच धावून आले आणि त्याला गटारातून बाहेर काढले. मुलाला ताबडतोब एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आले, तेथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.

बँकेत कर्मचारी असलेल्या मुलाच्या वडिलांनी सांगितले की, गटाराचे झाकण त्याच ठिकाणी बाजूला ठेवण्यात आले होते आणि तिथे पुठ्ठ्याचे कव्हर ठेवण्यात आले होते. मुलाच्या वडिलांनी या अपघातासाठी दिल्ली महानगरपालिकेला जबाबदार धरलं आहे. मुलाच्या वडिलांनी शहरातील गटाराच्या ऑडिटवर प्रश्न उपस्थित करत या अपघाताची जबाबदारी एमसीडीच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी, असं म्हटलं आहे.

मॅनहोलमध्ये एखादा वृद्ध पुरुष किंवा स्त्री पडली असती तर काय झाले असते? या घटनेसाठी कोणत्या प्रशासनाला जबाबदार धरावे?, असा सवाल मुलाच्या वडिलांनी केला. मुलाच्या पालकांकडून अद्याप कोणतीही तक्रार आलेली नाही. दरम्यान, गाजीपूर भागात बांधकाम सुरू असलेल्या नाल्यात पडून महिला आणि तिच्या मुलाचा मृत्यू झाल्याच्या काही दिवसांनंतर ही धक्कादायक घटना घडली आहे.

दरम्यान, मुसळधार पावसानंतर संपूर्ण दिल्लीत पाणी साचल्यानंतर अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. २७ जुलै रोजी जुन्या राजेंद्र नगर परिसरात असलेल्या आरएयूच्या आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात पावसाचे पाणी साचलं होतं. तळघरात पाणी तुंबल्याने यूपीएससीची तयारी करणारे तीन विद्यार्थी बुडाले होते. दिल्लीत पावसामुळे पाणी साचण्यानंतर घडलेल्या घटनांमध्ये आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :delhiदिल्लीAccidentअपघात