शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

मोदी सरकारचा 'सूट-बूट'वाल्यांना दणका; 'त्या' कर्जबुडव्यांकडून 7,600 कोटींची वसुली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 11:49 AM

कर्ज फेडण्याची क्षमता असूनही कर्जचुकवेगिरी करणाऱ्या व्यक्ती-कंपन्यांना 'विलफुल डिफॉल्टर' ठरवलं जातं.

ठळक मुद्देबँकांचं कर्ज बुडवून देशाबाहेर पळून गेलेल्यांवर मोदी सरकार काय, कशी आणि कधी कारवाई करणार, याची चर्चा सुरू आहे.मोदी सरकार - 1 दरम्यान राष्ट्रीयीकृत बँकांमधील 'विलफुल डिफॉल्टर्स'ची संख्या 60 टक्क्यांनी वाढली. या दिवाळखोरांकडून 7,600 कोटी रुपये वसूल करण्यात आल्याचं अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात 'नमो 2.0' ची सुरुवात झाली आहे. संसदेचं अधिवेशनही सुरू झालं असून 5 जुलैला अर्थमंत्री निर्मला सीतारामनदेशाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. त्यांच्या पोतडीतून काय निघणार, याबद्दल उत्सुकता आहेच; पण बँकांचं कर्ज बुडवून देशाबाहेर पळून गेलेल्यांवर मोदी सरकार काय, कशी आणि कधी कारवाई करणार, याची चर्चाही सुरू आहे. या दरम्यानच, मोदी सरकार-1च्या कार्यकाळात 'विलफुल डिफॉल्टर'ना दिलेल्या दणक्याबाबत सीतारामन यांनी माहिती दिली आहे.

कर्ज फेडण्याची क्षमता असूनही कर्जचुकवेगिरी करणाऱ्या व्यक्ती-कंपन्यांना 'विलफुल डिफॉल्टर' ठरवलं जातं. म्हणजेच, प्रामुख्याने सूट-बूटवाले बडे उद्योगपती या गटात येतात. मोदी सरकार हे 'सूट-बूट की सरकार' असून उद्योगपतींसाठीच काम करत असल्याची टीका विरोधक करत होते - अजूनही करतात. परंतु, मोदी सरकार - 1 दरम्यान राष्ट्रीयीकृत बँकांमधील 'विलफुल डिफॉल्टर्स'ची संख्या 60 टक्क्यांनी वाढली. म्हणजेच, या कार्यकाळात कर्जबुडव्यांना अभय न देता त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला, 'डिफॉल्टर' म्हणून त्यांची नोंद करण्यात आली. वित्त वर्ष 2014-15 मध्ये देशात 5,349 'विलफुल डिफॉल्टर्स' होते. ही संख्या 2018-19 च्या अखेरीस 8,582 इतकी झाली होती. या दिवाळखोरांकडून 7,600 कोटी रुपये वसूल करण्यात आल्याचं अर्थमंत्री सीतारामन यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात सांगितलं आहे. 

31 मार्च 2019 पर्यंत बँकांनी 8,121 प्रकरणांमध्ये कर्जवसुलीसाठी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर, रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांनुसार 2,915 प्रकरणांमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 

दे धक्का!

विलफुल डिफॉल्टरला बँका किंवा वित्तीय संस्थांकडून कुठलंही कर्ज दिलं जात नाही. पुढची पाच वर्षं या व्यक्ती किंवा कंपन्या कुठलाही नवा उद्योग सुरू करू शकत नाहीत. तसंच, सेबीच्या नियमांनुसार दिवाळखोर व्यक्ती आणि कंपन्यांसाठी कॅपिटल मार्केटची दारंही बंद केली जातात. 

दरम्यान, मोदी सरकारच्या रणनीतीमुळे सरकारी बँकांच्या एनडीएमध्ये (नॉन परफॉर्मिंग एसेट्स) घट झाल्याचं निर्मला सीतारामन यांनी नमूद केलं. तसंच, काळ्या पैशाच्या 380 प्रकरणांमध्ये नोटीस बजावण्यात आली असून त्यात 12,260  कोटी रुपयांच्या संपत्तीचा समावेश आहे. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीUnion Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनlok sabhaलोकसभाblack moneyब्लॅक मनी