५ वर्षांचं अफेअर, ३ मुलं, पण इन्स्टावरील प्रेमासाठी घर सोडलं; पतीनेच स्वहस्ते लावून दिलं पत्नीचं दुसरं लग्न!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 08:31 IST2026-01-09T08:31:09+5:302026-01-09T08:31:43+5:30

इंस्टाग्रामवर झालेल्या प्रेमापोटी एका तीन मुलांच्या मातेने आपल्या सुखी संसाराला तिलांजली दिली आहे.

5-year affair, 3 children, but left home for love on Instagram; Husband personally arranged his wife's second marriage! | ५ वर्षांचं अफेअर, ३ मुलं, पण इन्स्टावरील प्रेमासाठी घर सोडलं; पतीनेच स्वहस्ते लावून दिलं पत्नीचं दुसरं लग्न!

५ वर्षांचं अफेअर, ३ मुलं, पण इन्स्टावरील प्रेमासाठी घर सोडलं; पतीनेच स्वहस्ते लावून दिलं पत्नीचं दुसरं लग्न!

सोशल मीडियाच्या युगात नात्यांच्या व्याख्या बदलू लागल्या आहेत, याचे एक जिवंत आणि तितकेच धक्कादायक उदाहरण बिहारच्या वैशाली जिल्ह्यातून समोर आले आहे. इंस्टाग्रामवर झालेल्या प्रेमापोटी एका तीन मुलांच्या मातेने आपल्या सुखी संसाराला तिलांजली दिली आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकरणाचा शेवट इतका अकल्पित झाला की, खुद्द पतीनेच पुढाकार घेऊन आपल्या पत्नीचे लग्न तिच्या प्रियकराशी लावून दिले आणि स्वतः त्या लग्नाचा साक्षीदार बनला.

नेमकं प्रकरण काय?

वैशाली जिल्ह्यातील जंदाहा येथील रहिवासी असलेल्या रानी कुमारी हिचा विवाह २०११ मध्ये कुंदन कुमार यांच्याशी झाला होता. कुंदन हे अहिरपूर येथे ग्राहक सेवा केंद्र चालवतात. लग्नानंतर या जोडप्याला तीन मुले झाली. बाहेरून पाहता हे कुटुंब अगदी सुखी वाटत होते, मात्र या सुखी संसाराला सोशल मीडियाची नजर लागली.

इन्स्टाग्रामवर जुळलं नातं

राणी कुमारी हिचे तिच्याच नात्यातील आतेभावासोबत म्हणजेच गोबिंद कुमारसोबत इंस्टाग्रामवर बोलणे सुरू झाले. हे बोलणे इतके वाढले की, गेल्या पाच वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. गोबिंद आणि राणी यांच्यातील जवळीक वाढल्याने घरात वारंवार वाद होऊ लागले. राणी यापूर्वीही अनेकदा घर सोडून निघून गेली होती, मात्र मुलांच्या भविष्यासाठी कुंदन तिला समजावून परत आणत होते.

पतीने घेतला मोठा निर्णय

पत्नीचे मन आता आपल्यात नसून ती गोबिंदशिवाय जगू शकत नाही, हे जेव्हा कुंदन यांच्या लक्षात आले, तेव्हा त्यांनी एक कठोर पण व्यावहारिक निर्णय घेतला. रोजचा मानसिक त्रास आणि कौटुंबिक कलह संपवण्यासाठी कुंदन यांनी राणीला तिच्या प्रियकराकडे सोपवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन राणी आणि गोबिंदचे कोर्ट मॅरेज लावून दिले. विशेष म्हणजे, या लग्नात कुंदन स्वतः साक्षीदार म्हणून उभे राहिले आणि हसतमुखाने आपल्या पत्नीला निरोप दिला.

मुलांची जबाबदारी पित्याकडेच

या अजब प्रेमकाहाणीत त्या तीन निष्पाप मुलांचे सर्वात जास्त हाल झाले आहेत . आईने प्रेमासाठी मुलांचा त्याग केला असला तरी, वडील कुंदन यांनी या तिन्ही मुलांची जबाबदारी स्वीकारली आहे. आता ही मुले त्यांच्या वडिलांकडेच राहणार आहेत. लग्नानंतर राणीने प्रतिक्रिया दिली की, तिला पहिल्या पतीसोबत राहणे असह्य झाले होते आणि तिने हा निर्णय स्वतःच्या इच्छेने घेतला आहे. तर, दुसरीकडे गोबिंदने आता राणीला आयुष्यभर सांभाळण्याचे वचन दिले आहे.

Web Title : प्यार, बच्चे, इंस्टाग्राम: पति ने कराई पत्नी की दूसरी शादी!

Web Summary : बिहार में पति ने पत्नी का इंस्टाग्राम प्रेमी से विवाह कराया। पांच साल का अफेयर, तीन बच्चे थे। पारिवारिक कलह खत्म करने और पत्नी की खुशी के लिए शादी कराई, खुद गवाह बने। बच्चों की जिम्मेदारी पति पर।

Web Title : Affair, kids, Instagram love: Husband arranges wife's second marriage!

Web Summary : Bihar man arranges wife's marriage to her Instagram lover after five-year affair, three children. He witnessed the wedding, prioritizing her happiness and ending family disputes. He retains custody of their children.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.