शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

400 साहिहित्यिकांनी केले नरेंद्र मोदींना मतदान करण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 5:21 PM

लोकसभा निवडणुकीमुळे सध्या संपूर्ण देशातील वातावरण राजकीय रंगात रंगून गेले आहे. कला, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्येही आता राजकीय वारे वाहू लागले आहे.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीमुळे सध्या संपूर्ण देशातील वातावरण राजकीय रंगात रंगून गेले आहे. कला, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्येही आता राजकीय वारे वाहू लागले आहे. काही दिवसांपूर्वी लेखक आणि कलाकारांच्या समुहाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केले होते. आता देशभरातील ४०० साहित्यिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समर्थनार्थ मतदान करण्याचे आवाहन केले आहे. 

प्रसिद्ध साहित्यिक नरेंद्र कोहली, चित्रा मुद्गल, सूर्यकांत बाली अशा प्रसिद्ध साहित्यिकांचा नरेंद्र मोदींना समर्थन देणाऱ्या  ४०० साहित्यिकांमध्ये समावेश आहे. भारतीय साहित्यिक संघटनेच्या झेंड्याखाली एकत्र आलेल्या या साहित्यिकांनी देशाची अखंडता, सुरक्षा, स्वाभिमान आणि विकास कायम ठेवण्यासाठी मोदींना मतदान करावे, असे आवाहन केले आहे. 

''भारतीय लोकशाहीमध्ये संविधानाचे महत्त्व सर्वतोपरी आहे. त्यामुळे तुम्ही तुमचे मत देशाची अखंडता, सुरक्षा, स्वाभिमान, एकात्मता, सांप्रदायिक, सद्भाव आणि विकास कायम राखण्यासाठी द्यावे, असे आवाहन आम्ही साहित्यिक करत आहोत.'' असे या साहित्यिकांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगभरात देशाची प्रतिष्ठा वाढवणारे, राष्ट्रीय सुरक्षेसाठी कटिबद्ध असणारे आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकास पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील असणारे नेते असल्याचेही या पत्रकात म्हटले आहे. 

याआधी इंडियन रायटर्स फोरमकडून करण्यात आलेल्या आवाहनामध्ये विविध भाषांमधील २०० हून अधिक लेखकांनी द्वेषाच्या राजकारणाविरोधात मतदान करण्याचे आवाहन केले होते. या लेखकांमध्ये गिरीश कर्नाड, रोमिला थापर, अमिताब घोष, नयनतारा सैगल आणि अरुंधती रॉय यांचा समावेश होता.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपाPoliticsराजकारण