शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

सर्व्हे - नरेंद्र मोदी सरकावरील नाराज लोकांची संख्या वाढली, निवडणूक झाल्यास UPA च्या जागा दुप्पटीने वाढतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2018 09:12 IST

सत्तेत असणा-या नरेंद्र मोदी सरकारवरील नाराज लोकांची संख्या वाढली आहे. फक्त 10 महिन्यात नाराज लोकांचा आकडा 40 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. याआधी 2017 मध्ये नरेंद्र मोदी सरकावर नाखूश असणा-यांचा आकडा 27 टक्के इतका होता, जो 13 टक्क्यांनी वाढून 40 टक्क्यांवर पोहोचला आहे

नवी दिल्ली - सत्तेत असणा-या नरेंद्र मोदी सरकारवरील नाराज लोकांची संख्या वाढली आहे. फक्त 10 महिन्यात नाराज लोकांचा आकडा 40 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. याआधी 2017 मध्ये नरेंद्र मोदी सरकावर नाखूश असणा-यांचा आकडा 27 टक्के इतका होता, जो 13 टक्क्यांनी वाढून 40 टक्क्यांवर पोहोचला आहे. याचाच अर्थ नरेंद्र मोदी सरकारची लोकप्रियता कमी झाली आहे. केंद्रात नरेंद्र मोदी सरकारला तीन वर्ष नऊ महिने पुर्ण झाले आहेत. दरम्यान विरोध पक्ष वारंवार केंद्र सरकारवर हल्लाबोल करत असून आश्वासनं फोल ठरली असल्याची टीका करत आहे. यानंतर एबीपी न्यूजने सीएसडीएस-लोकनितीसोबत मिळून केलेल्या ओपिनियन पोलमधून ही आकडेवारी समोर आली आहे. 19 राज्यांमधील 175 लोकसभा मतदारसंघात 7 ते 20 जानेवारीदरम्यान हा सर्व्हे करण्यात आला. 

सर्व्हेनुसार पूर्व भारत म्हणजेच बिहार, बंगाल, झारखंड, ओडिसा आणि आसाममध्ये जर आज निवडणूक झाली तर एकूण 142 लोकसभा जागांपैकी भाजपा आणि त्यांच्या सहकारी पक्षांना 72 तर काँग्रेस आणि त्यांच्या सहकारी पक्षांना (युपीए) 18 आणि इतरांना 52 जागा मिळतील. तज्ञांनी सांगितल्यानुसार, एनडीएच्या जागांमध्ये झालेल्या वृद्धीमुळेच बिहारमध्ये नितीश कुमार यांचा पक्ष जनता दल युनायटेडसोबत हातमिळवणी झाली आहे. 

सर्व्हेनुसार दक्षिण भारत म्हणजेच कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू आणि केरळमध्ये एनडीएची स्थिती नाजूक होण्याची शक्यता असून, युपीएला फायदा होऊ शकतो. तेथील एकूण 132 जागांपैकी एनडीएला 34, युपीएला 63 आणि इतरांना 35 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 2017 मध्ये कऱण्यात आलेल्या सर्व्हेनुसार, एनडीएला 39, युपीएला 52 आणि इतरांना 41 जागा मिळण्याची शक्यता होती. याचाच अर्थ दक्षिण भारतात एनडीएच्या लोकप्रियतेत घट झाली आहे. एनडीएला पाच जागांचं नुकसान होत असून, युपीएला मात्र 11 जागांचा फायदा होत आहे. इतरांना सहा जागांचं नुकसान होत आहे. या सर्व्हेत स्पष्ट करण्यात आलं आहे की, यावर्षी कर्नाटकात होणा-या निवडणुकीत भाजपाला सत्तेत परत येण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागणार आहे. 

सर्व्हेनुसार उत्तर भारत म्हणजे उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली, पंजाब, हरियाणामधील एकूण 151 लोकसभा जागांवर आज निवडणूक झाल्यास एनडीएला 2014 च्या तुलनेत 20 जागांचं नुकसान होऊ शकतं. एनडीएला 111 जागा मिळण्याची शक्यता आहे. 2014 मधील लोकसभा निवडणुकीत एनडीएला येथून 131 जागा मिळाल्या होता. उत्तर भारतात युपीएला 13 जागा तर इतरांना 27 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा