शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 14:28 IST

Govt issues notification for Census: केंद्र सरकारने १६व्या जनगणनेसाठी अधिसूचना जारी केली.

नवी दिल्ली: केंद्र सरकारने १६व्या जनगणनेसाठी अधिसूचना जारी केली असून, त्यामध्ये जातनिहाय गणनेचाही समावेश आहे. ही जनगणना २०२७ मध्ये होणार आहे. २०११ नंतर तब्बल १६ वर्षांनी जनगणना पार पडेल. २०२७ मध्ये होणाऱ्या जनगणनेत देशभरातून लोकसंख्येशी संबंधित आकडेवारी गोळा केली जाईल. या प्रक्रियेत सुमारे ३४ लाख गणक, पर्यवेक्षक तसेच सुमारे १.३ लाख जनगणना अधिकारी सामील होतील. डिजिटल साधनांचा या प्रक्रियेत अधिकाधिक वापर करण्यात येईल. नागरिकांना स्वयंनोंदणीची सुविधाही उपलब्ध करून दिली जाईल. ही भारताची १६वी आणि स्वातंत्र्यानंतरची आठवी जनगणना असेल.

देशातील लडाख, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड राज्यांतील बर्फाच्छादित प्रदेशांमध्ये जनगणना १ ऑक्टोबर २०२६ ही तर इतर भागांमध्ये ती १ मार्च २०२७ ही संदर्भ तारीख मानून केली जाणार आहे. जनगणनेसाठी करावयाच्या पूर्वतयारीचा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी आढावा घेतला. त्या बैठकीला गृहमंत्रालयाचे सचिव, जनगणना आयुक्त मृत्युंजयकुमार नारायण यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जनगणनेचे दोन टप्पेपहिला टप्पा: प्रत्येक घरात किती जणांचे वास्तव्य आहे, तेथील मालमत्ता, सुविधा यांची माहिती गोळा करणे. दुसरा टप्पा: ‘लोकसंख्या गणना’ म्हणजे प्रत्येक व्यक्तीची सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि इतर माहिती संकलित करणे. 

अधिसूचना हा फुसका बारही अधिसूचना हा फुसका बार असल्याचे काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सोमवारी म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, या अधिसूचनेत जातनिहाय गणनेचा कोणताही स्पष्ट उल्लेख नाही. त्यामुळे या मुद्द्यावर केंद्राने पुन्हा एकदा घुमजाव केले आहे, असा प्रश्न उपस्थित होतो. 

आमचे सर्वेक्षण वेगळे: कर्नाटक कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोमवारी सांगितले की, राज्य सरकारकडून करण्यात येणारे सामाजिक-शैक्षणिक आणि जातीविषयक सर्वेक्षण हे केंद्र सरकारच्या जातनिहाय गणनेपेक्षा खूप वेगळे आहे. कर्नाटक सरकारने नव्याने जातनिहाय गणना करण्याचा निर्णय घेऊन ओबीसी समाजाची फसवणूक केली आहे, असा आरोप केंद्रीय मंत्री आणि ‘भाजप’चे नेते भूपेंद्र यादव यांनी केला.

बहुतांश राजकीय पक्षांना हवी जातीनिहाय जनगणना२०१० मध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा मंत्रिमंडळासमोर आणण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर मंत्रिगट स्थापन झाला. बहुतांश राजकीय पक्षांनी जातीनिहाय जनगणना घेण्याची शिफारस केली होती. यूपीए सरकारने २०११ मध्ये जातींवर आधारित जनगणनेऐवजी सामाजिक-आर्थिक व जातीय सर्वेक्षण केले. जातीविषयक काही माहिती यात गोळा झाली, पण ती पूर्ण प्रसिद्ध झाली नाही.

टॅग्स :IndiaभारतGovernmentसरकार