शहरं
Join us  
Trending Stories
1
महाग सोन्यामुळे भारताची तिजोरी का रिकामी होत चालली आहे?
2
तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा 'यू-टर्न'; ज्योतिषी रिकी पंडित यांची 'OSD' पदावरून उचलबांगडी
3
Top Marathi News Live: 'नीट' पेपरफुटीच्या मुद्द्यावरून ABVPचे दिल्लीच्या NTE कार्यालयाबाहेर आंदोलन
4
Tata Altroz CNG AMT: ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका, टाटा अल्ट्रोझ सीएनजी ऑटोमॅटिक भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत!
5
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
6
Tata Trusts Row: ३६ वर्षांपूर्वीच्या शेअर ट्रान्सफरवरुन नवा वाद; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांना नोटीस
7
Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग
8
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा; एआयएडीएमकेमध्ये फूट
9
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
10
पॅट कमिन्सला BCCIचा मोठा दणका! हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यरसह 'नकोशा' यादीत मिळालं स्थान
11
Mumbai: डोक्यावर हात ठेवून आजार बरे करणाऱ्या चौघांना बेड्या; घरात देवाच्या मूर्ती, प्रतिमा पूजेला विरोध केल्याचा आरोप
12
Art Of Living: तुम्हाला माहीत आहे का? श्री श्री रवीशंकर त्यांच्या नावात दोनदा 'श्री' का लावतात?
13
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल 'भाजपा'मधून लढणार; रोहित पवारांचा मोठा दावा
14
इराणची नाकेबंदी युक्रेन तोडणार! अमेरिकेच्या हाती लागलं 'ब्रह्मास्त्र'; होर्मुजमध्ये आता रक्ताचा खेळ?
15
'मला पर्याय शोधून दाखवाच!', भरमिटिंगमध्ये अपमान केल्याने तरुणीचा तडकाफडकी राजीनामा; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
16
सायको किलर! २५ तासांत ३ हत्या करणाऱ्या गुरप्रीतच्या बॅगेत होतं ७ मृत्यूंचं गुपित
17
‘सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद’च्या अफवा खोट्या; एअर इंडियाने दिले स्पष्टीकरण, पण...
18
Shocking: खळबळजनक! लिंबू तोडल्याच्या रागातून १२ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या; १२ जणांना अटक
19
एलिफंटा ते नाणेघाट : प्राचीन व्यापाराचा ‘कॉरिडॉर’ उजेडात; पुरातत्व विभागाचे उत्खनन, व्यापारावर शिक्कामोर्तब
20
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

३३ टक्के एमएसएमई बंद पडण्याच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2020 04:36 IST

आॅल इंडिया मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमो) आणि अन्य नऊ औद्योगिक संघटना यांनी संयुक्तपणे केलेल्या सर्वेक्षणामधून वरील धक्कादायक निष्कर्ष उघड झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : कोरोनाच्या लॉकडाऊननंतर उद्योगधंदे आणि व्यापार पुन्हा सुरू होत असला तरी आपली मर्यादित साधनसामग्री आणि भविष्याबाबतची अनिश्चितता यामुळे देशातील एकतृतीयांश म्हणजेच ३३ टक्के एमएसएमई हे बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे धक्कादायक निष्कर्ष एका सर्वेक्षणामधून निघाले आहेत.


आॅल इंडिया मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमो) आणि अन्य नऊ औद्योगिक संघटना यांनी संयुक्तपणे केलेल्या सर्वेक्षणामधून वरील धक्कादायक निष्कर्ष उघड झाले आहेत. मे महिन्याच्या शेवटच्या सप्ताहात आॅनलाइन पद्धतीने करण्यात आलेल्या या सर्वेक्षणामध्ये ४६,५२५ एमएसएमई आणि व्यावसायिक तसेच कंपन्यांचे सीईओ व कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला आहे.


या सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्यापैकी एमएसएमईमधील ३५ टक्के तर व्यावसायिकांपैकी ३७ टक्के मते ही लॉकडाउनच्या काळामध्ये झालेले नुकसान हे भरून येण्यासारखे नसून त्यामुळे उद्योगांना आपले व्यवसाय गुंडाळण्याखेरीज अन्य काही पर्याय नसल्याचे मत व्यक्त करणारे आहेत. ३२ टक्के एमएसएमर्इंच्या मते हे नुकसान भरून निघण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो. अवघ्या १२ टक्के प्रतिसादकांनी केवळ तीन महिन्यांमध्ये हे नुकसान भरून निघण्याची शक्यता असल्याचे मत व्यक्त केले आहे.
या उद्योगांवर कर्जाचा मोठा बोजा आहे. त्यामुळे त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. नोटाबंदी आणि जीएसटीपासूनच या उद्योगांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, त्यामध्ये आता वाढ होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जाते.


या सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्यांपैकी एमएसएमईमधील ३ टक्के, कंपन्यांमधील ६ टक्के आणि ११ टक्के व्यावसायिकांनी कोरोनाच्या संकटाचा आपल्यावर कोणताच परिणाम होणार नसल्याचे सांगितले आहे. ३२ टक्के सहभागींनी आपला उद्योग या समस्येमधून बाहेर पडण्याची शक्यता नसल्याचे मत व्यक्त केले आहे. २९ टक्के सहभागितांनी या संकटामधून बाहेर पडण्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

केवळ कोरोनाच कारणीभूत नाही
च्लॉकडाऊनच्या काळामधील झालेले नुकसान, मर्यादित असलेली साधनसामग्री तसेच भविष्यामधील आॅर्डर मिळण्याबाबतची अनिश्चितता या बाबींमुळे एमएसएमई तसेच अन्य व्यावसायिकांना यापुढे व्यवसाय चालणे कठीण असल्याचे वाटत आहे. मात्र, यासाठी केवळ कोरोनाचे लॉकडाऊन हेच कारण नाही. याआधीपासूनच एमएसएमई व छोट्या उद्योगांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळेच हे उद्योग बंद पडू शकतील, असे मत या उद्योजकांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या