शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: इटलीहून विशेष विमानाने 263 विद्यार्थी भारतात, सर्वजण आयटीबीपीच्या छावला कॅम्पमध्ये रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2020 11:39 IST

आतापर्यंत देशाबाहेरून तब्बल 1600 भारतीय नागरिक भारतात परतले आहेत. आरोग्य सचिव लव अग्रवाल यांनी सांगितल्याप्रमाणे 1600 भारतीय आणि इतर काही देशांचे नागरिक मिळून जवळपास 1700 लोकांना क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. 

ठळक मुद्देइटलीमध्ये तर एकाच दिवसात तब्बल 800 जणांचा मृत्यू एअर इंडियाच्या विशेष विमानाने 263 भारतीय विद्यार्थ्यांना भारतात आणण्यात आले.देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता 315वर 

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात हाहाकार घातला आहे. इटलीमध्ये तर एकाच दिवसात तब्बल 800 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. जगात कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका इटलीला बसला आहे. आज येथून एअर इंडियाच्या विशेष विमानाने 263 भारतीय विद्यार्थ्यांना भारतात आणण्यात आले.

एयर इंडियाचे हे विमान आज सकाळी 9:15 वाजता दिल्ली विमान तळावर पोहोचले. येथे थर्मल स्क्रीनिंग आणि इमिग्रेशननंतर या सर्व विद्यार्थांना आयटीबीपी छावला कॅम्पमध्ये क्वारेंटाइनमध्ये पाठवण्यात आले.

संपूर्ण देशात आज सकाळी सात वाजल्यापासून जनता कर्फ्यू पाळण्यात येत आहे. देशात कोरोना व्हायरस संक्रमानाचे अनेक रुग्ण आढळले आहेत. ही संख्या आता 315वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार राजधानी दिल्लीत कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता 27वर पोहोचली आहे. 

आतापर्यंत देशाबाहेरून तब्बल 1600 भारतीय नागरिक भारतात परतले आहेत. आरोग्य सचिव लव अग्रवाल यांनी सांगितल्याप्रमाणे 1600 भारतीय आणि इतर काही देशांचे नागरिक मिळून जवळपास 1700 लोकांना क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. 

रोममध्ये अडकलेल्या भारतीयांना आणण्यासठी एअर इंडियाने 787 ड्रिमलाइनर विमान पाठवले होते. गेल्या काही दिवसांपासून भारताने कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका बसलेल्या चीन, जापान आणि ईरान सारख्या देशांतून शेकडो नागरिकांना भारतात आणले आहे. सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे, की 22 मार्चपासून एक आठवड्यापर्यंत कुठल्याही देशाचे विमान भारतात येऊ दिले जाणार नाही. 

सरकारने सर्व अंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी घालण्याच्या एक दिवस आधी एम्सटर्डम विमानतळावर अडकलेल्या 100 भारतीय नागरिकांनी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. हे सर्वजण अमेरिकेहून भारतात येत होते. नवीदिल्लीत पोहोचण्यासठी केवळ दोन तास शिल्लक असतानाच यांचे विमान पुन्हा परत निघून गेले होते. एम्सटर्डम येथे अडकलेल्या भारतीयांमध्ये संजय सप्रा देखील आहेत. त्यांच्या पत्नी टीना सप्रा यांनी नागरी उड्डाणमंत्री हरदीप पुरी यांना पत्र लिहून आपल्या पतीला आणि इतर भारतीय नागरिकांना मदत करण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी एक विशेष विमान पाठवण्याचीही विनंती केली आहे.

मलेशियात अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणण्याची मागणी -केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना मलेशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थांना भारतात आणण्यावर लक्ष द्यावे असे म्हटले आहे. आपल्या पत्रात विजयन यांनी येथे जवळपास 250 विद्यार्थी असल्याचे म्हटले आहे. भारताने दुसऱ्या देशांतील विमानांना यायला बंदी घातल्याने ते तेथे अडकले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसStudentविद्यार्थीItalyइटलीIndiaभारतdelhiदिल्लीAirportविमानतळairplaneविमान