शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
2
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
3
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
4
ट्रम्प यांना आणखी एक धक्का! फ्रान्स पॅलेस्टिनी राष्ट्राला मान्यता देणार, मॅक्रॉन यांची मोठी घोषणा
5
₹५००० च्या SIP नं कसा बनेल ₹५ कोटींचा फंड? कमालीची आहे पद्धत, एकदा समजलात तर पैशांचं टेन्शन होईल दूर
6
१२८ किलोची वजनदार पत्नी अंगावर पडून पतीचा मृत्यू; सोशल मीडियावर पुन्हा घटना व्हायरल 
7
Stock Markets Today: वीकली एक्स्पायरीच्या दिवशी शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, निफ्टी ३० अंकांनी वाढून उघडला; ऑटो स्टॉक्समध्ये गुंतवणूकदारांची खरेदी
8
कंपनी मालकीन कर्मचाऱ्याच्या प्रेमात पडली, घटस्फोटासाठी कोट्यवधि रुपये मोजले; प्रकरण न्यायालयात पोहोचले
9
VIRAL : धडकी भरवणारी 'सफर'! अफगाणिस्तानातून विमानाच्या चाकात लपून भारतात पोहोचला १३ वर्षांचा मुलगा
10
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
11
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
12
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
13
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
14
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
15
Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!
16
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
17
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
18
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
19
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
20
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर

प्रदूषणामुळे भारतात वर्षभरात २५ लाख लोकांचा झाला मृत्यू; 'लान्सेट' च्या सर्वेक्षणातून माहिती उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2017 11:49 IST

भारतातील प्रदूषणाची भनायक परिस्थिती दाखविणारी आकडेवारी समोर आली आहे.

ठळक मुद्दे भारतातील प्रदूषणाची भनायक परिस्थिती दाखविणारी आकडेवारी समोर आली आहे. आकडेवारीच्या माध्यमातून भारतात असणारी प्रदूषणाची परिस्थिती निदर्शनास येते आहे. २०१५ मध्ये भारतात प्रदूषणामुळे तब्बल २५ लाख जणांचा मृत्यू झाला आहे.

नवी दिल्ली- भारतातील प्रदूषणाची भनायक परिस्थिती दाखविणारी आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीच्या माध्यमातून भारतात असणारी प्रदूषणाची परिस्थिती निदर्शनास येते आहे. २०१५ मध्ये भारतात प्रदूषणामुळे तब्बल २५ लाख जणांचा मृत्यू झाला आहे. वायू आणि जल प्रदूषणामुळे अकाली मृत्यू होणाऱ्यांचं प्रमाण भारतात सर्वाधिक असल्याचं लान्सेट या प्रतिष्ठित वैद्यकीय नियतकालिकाच्या अभ्यासातून समोर आलं आहे. २०१५ मध्ये जगभरात प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांमुळे ९० लाख लोकांचा मृत्यू झाला. यातील २८ टक्के लोक भारतीय होते. या आकडेवारीहून देशातील प्रदूषणाची समस्या किती भीषण आहे, ते समजतं आहे. द इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.

वैद्यकीय नियतकालिक ‘लान्सेट’ने जगभरातील देशांमधील प्रदूषण, त्याचा लोकांवर परिणाम आणि त्यामुळे होणारे मृत्यू यांचा अभ्यास केला. यामध्ये देशातील हवा (वायू) आणि पाणी किती प्रदूषित आहेत, याचा आढावा घेतला. हवा आणि पाणी यामधील प्रदूषण कोणत्या देशात, किती जणांच्या जीवावर त्याचा परिणाम झाला, याबद्दलची आकडेवारी नियतकालिकाने प्रसिद्ध केली आहे. यातूनही भारतातील जल आणि वायू प्रदूषणाची स्थिती चिंताजनक असल्याचं समोर आलं आहे. २०१५ मध्ये भारतात, वायू प्रदूषणामुळे १८ लाखांहून अधिक जणांनी जीव गमावला. तर जल प्रदूषण जवळपास ६ लाख लोकांनी जीव गमावला. 

मध्यम आणि कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये प्रदूषणाशी संबंधित कारणांमुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. औद्योगिकरणात जलद गतीने वाढ होणाऱ्या भारत, पाकिस्तान, चीन, बांगलादेश, मादागास्कर, केनिया यासारख्या देशांमध्ये प्रदूषणाची समस्या तितक्याच अती जास्त प्रमाणात वाढत असल्याचं ‘लान्सेट'ने आपल्या अहवालात म्हंटलं आहे. 

२०१५ मध्ये भारतात २५ लाख लोकांचा प्रदूषणामुळे झालेल्या आजारांमुळे मृत्यू झाला. यानंतर या यादीत चीनचा क्रमांक लागतो. चीनमध्ये प्रदूषणामुळे १८ लाख लोकांचा मृत्यू झाला. हृदयाचे आजार, फुफ्फुसाचा कर्करोग यासारख्या आजाराने लोकांचा मृत्यू झाला आहे. लान्सेटच्या अभ्यासात आरोग्य आणि पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या ४०पेक्षा जास्त प्रसिद्ध लेखकांचा सहभाग होता. जगभरात वायू प्रदूषण सर्वाधिक जीवघेणं ठरत असल्याचे या अभ्यासातून समोर आलं. वायू प्रदूषणामुळे २०१५ मध्ये जगभरात ६५ लाख लोकांनी जीव गमावला. तर जल प्रदूषणामुळे १८ लाख लोकांनी जीव गमावला.. याशिवाय कामाच्या ठिकाणी होणाऱ्या प्रदूषणामुळे ८ लाख लोकांचा मृत्यू झाला.

टॅग्स :pollutionप्रदूषणIndiaभारतDeathमृत्यूHealthआरोग्य