शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

२०२ उमेदवार कोट्यधीश

By admin | Updated: May 13, 2016 04:24 IST

केरळ विधानसभेसाठी सोमवार दि. १६ मे रोजी निवडणूक होत असून निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या एकूण उमेदवारांपैकी २०२ उमेदवार कोट्यधीश असून

नवी दिल्ली : केरळ विधानसभेसाठी सोमवार दि. १६ मे रोजी निवडणूक होत असून निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या एकूण उमेदवारांपैकी २०२ उमेदवार कोट्यधीश असून, ३११ जणांवर फौजदारी गुन्हे दाखल झाल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे.‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ (एडीआर)तर्फे हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. केरळ विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात ११२५ उमेदवार आहेत. कोट्यधीश उमेदवारांत काँग्रेसचे ४३, माकपाचे २४, भाजपाचे १८, भारत धर्म जनसेनेचे १८, अण्णा द्रमुकचे २, आययूएमएलचे १७, केरळ काँग्रेसचे (एम) ९ आणि ३० अपक्ष यांचा समावेश आहे. दाखल केलेल्या शपथपत्रात आपली संपत्ती १ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. एकूणच उमेदवारांची सरासरी संपत्ती १.२८ कोटी रुपयांची आहे.रिंगणातील ११२५ उमेदवारांपैकी ३११ जणांनी आपल्यावर फौजदारी गुन्हे नोंदले गेल्याचे स्वत:च जाहीर केले आहे. त्यात माकपाचे ७२, भाजपाचे ४२, इंडियन नॅशनल काँग्रेसचे ३७१, भारत धर्म जनसनेचे १३, माकपचे १५, आययूएमएलचे ६, एसडीपीआयचे २५ आणि ४३ अपक्ष असे वर्गीकरण आहे.> केरळ-सोमालिया तुलनेमुळे संतापतिरूअनंतपुरम : विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात केरळची तुलना सोमालियाशी केल्याबद्दल आणि संबंधित वक्तव्य मागे न घेतल्याबद्दल मुख्यमंत्री ओमन चांडी आणि माकपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.मोदींनी केरळमधीलच नव्हे, तर जगातील मल्याळी समुदायाचा अवमान केला आहे. त्यांनी वादग्रस्त वक्तव्य मागे घेऊन आपली ‘राजकीय शालीनता’ दाखवावी. ही तुलना ‘आधारहिन आणि वस्तुस्थिती’च्या विरुद्ध आहे. चांडी यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, या वादग्रस्त वक्तव्याबद्दल मोदी यांनी मौन स्वीकारले असून, केरळच्या जनतेला त्यांचे मौन नव्हे, तर बिनशर्त माफी पाहिजे. मोदी यांनी निवडणूक सभेत राज्यातील आदिवासींच्या बालमृत्युदराची तुलना आफ्रिकेतील सोमालिया या देशाशी केली होती. >१0४ महिला रिंगणात११२५ पैकी ४९६ उमेदवारांनी ‘पॅन’चा तपशील दिलेला नाही. तर ८३४ जणांनी त्यांचा प्राप्तीकराचा तपशील जाहीर केलेला नाही. शैक्षणिक पात्रतेचा विचार करता ६६९ उमेदवार पाचवी ते १२ उत्तीर्ण आहेत. ३८० जणांनी पदवीधर किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षण घेतले आहे. २९ जण केवळ साक्षर आहेत. ७ जण निरक्षर आहेत. या सर्वांनी शपथपत्रातच ही माहिती दिली आहे. ६ उमेदवार ८० पेक्षा जास्त वयाचे असून दोघांनी त्यांचे वय जाहीर केलेले नाही. या वेळी १०४ महिला उमेदवार त्यांचे भवितव्य अजमावत आहेत.> माकपचे टीकास्त्र : मोदी यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर माकपनेही हल्लाबोल केला आहे. माकपचे महासचिव कोडियारी बाळकृष्ण म्हणाले की, राज्याची स्थिती सोमालियातील स्थितीशी होऊ शकत नाही. मोदींच्या वक्तव्याने राज्यातील जनतेचा अपमान झाला असून, निवडणुकीत जनता भाजपाला झटका दिल्याशिवाय राहणार नाही. राज्यात सोमालियासारखी स्थिती नाही, हे पंतप्रधानांनी समजून घेतले पाहिजे. ज्या राज्यात मोदी यांनी पंतप्रधान म्हणून प्रचार केला, तिथे भाजपाचा पराभव झालेला आहे.