शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आंध्र प्रदेशमध्ये चकमकीत २० चंदनतस्कर ठार

By admin | Updated: April 8, 2015 02:55 IST

चित्तूर जिल्ह्यातील शेषाचलम पर्वतीय जंगल भागात मंगळवारी पहाटे विशेष संयुक्त कृती दलाशी झालेल्या धुमश्चक्रीत २० रक्तचंदन तस्कर मारले गेले.

चित्तूर (आंध्र प्रदेश) : आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यातील शेषाचलम पर्वतीय जंगल भागात मंगळवारी पहाटे विशेष संयुक्त कृती दलाशी झालेल्या धुमश्चक्रीत २० रक्तचंदन तस्कर मारले गेले. सुमारे २०० तस्करांनी निबिड जंगलात विळे, कुऱ्हाडी, तलवारी, गावठी शस्त्रे आणि दगडफेकीसह केलेल्या हल्ल्यात सहा पोलीस जखमी झाले. पण पोलिसांच्या गोळीबाराचा प्रभाव लक्षात घेऊन ठार झालेल्या सहकाऱ्यांना तेथेच टाकून बाकीच्या तस्करांनी पळ काढला. ठार झालेल्या तस्करांमध्ये १२ तामिळींचा समावेश असल्यामुळे तामिळनाडूत शोकसंतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. द्रमुक, भाकपा, पीएमके आणि भाजपाने आंध्र प्रदेश सरकारवर सडकून टीका केली. मारले गेलेले गरीब लाकूडतोडे असून, सरकारने तस्करी रोखताना कायदेशीर मार्ग अवलंबावा, अशी मागणीही या पक्षांनी केली. या घटनेवरून आंध्र आणि तामिळनाडूत अक्षरश: जुंपली आहे. तशातच स्वत:हून गोळीबाराच्या घटनेची दखल घेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने आंध्र प्रदेश सरकारला नोटीस पाठवत दोन आठवड्यांत अहवाल मागितला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्या आदेशावरून जंगलभागात हवाई पाहणी केली जात आहे. पहाटे ५ ते ६ वाजतादरम्यान चित्तूरच्या ‘चंद्रगिरी मंडल’मधील शेषाचलम् जंगल भागात दोन ठिकाणी चकमकी झाल्या. काही तस्कर रक्तचंदनाची खोडे वाहून नेताना आढळले. पोलिसांनी त्यांना हटकल्यानंतर ही धुमश्चक्री झाली. रक्तचंदनतस्करांनी वन कर्मचारी आणि पोलिसांवर हल्ले केल्याचा दीर्घ इतिहास आहे. डिसेंबर २०१३मध्ये शेषाचलम्च्या जंगलात चंदनतस्करांनी २ वन अधिकाऱ्यांना मारले होते. विशेष कृती दलाची स्थापनाचंदनाची तस्करी रोखण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने जून २०१३मध्ये विशेष कृती दलाची (एसटीएफ) स्थापना केली असून, त्यात पोलीस अधिकारी आणि वन कर्मचाऱ्यांचा समावेश केला आहे. वीरप्पन टोळीचा सहभाग?कुख्यात चंदनतस्कर वीरप्पन मारला गेला असला तरी त्याच्या टोळीचा शेषाचलम् जंगलातील तस्करीत सहभाग असण्याची शक्यता आंध्र प्रदेश पोलिसांनी नाकारलेली नाही. गेल्या वर्षी आंध्र प्रदेशात तेलगू देसम्चे सरकार सत्तेवर आल्यानंतर लगतच्या तामिळनाडूतील तस्करांना मोठ्या प्रमाणात अटक करून शेकडो टन रक्तचंदन जप्त करण्यात आले. बहुतांश तस्कर तामिळनाडूतून येत असून, ते एकावेळी शंभरावर लाकूडतोड्यांना जंगलात पाठवितात. आशियात पारंपरिक औषध आणि अन्य वापरासाठी रक्तचंदनाचा वापर केला जातो. तामिळनाडूत निदर्शनेतमिळगा वालवुरीमाई काची या संघटनेने तामिळनाडूच्या विविध भागांत निदर्शने करीत गोळीबाराचा निषेध केला आहे.