शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
2
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
3
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
4
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
5
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
6
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
7
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
8
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
9
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
10
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
11
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
12
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
13
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
14
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
15
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
16
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
17
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
18
उत्तर बार्शी भागातून वाहणाऱ्या चांदनी नदीला महापूर, नरसिंह मंदिर पाण्याखाली!
19
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
20
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर

आंध्र प्रदेशमध्ये चकमकीत २० चंदनतस्कर ठार

By admin | Updated: April 8, 2015 02:55 IST

चित्तूर जिल्ह्यातील शेषाचलम पर्वतीय जंगल भागात मंगळवारी पहाटे विशेष संयुक्त कृती दलाशी झालेल्या धुमश्चक्रीत २० रक्तचंदन तस्कर मारले गेले.

चित्तूर (आंध्र प्रदेश) : आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यातील शेषाचलम पर्वतीय जंगल भागात मंगळवारी पहाटे विशेष संयुक्त कृती दलाशी झालेल्या धुमश्चक्रीत २० रक्तचंदन तस्कर मारले गेले. सुमारे २०० तस्करांनी निबिड जंगलात विळे, कुऱ्हाडी, तलवारी, गावठी शस्त्रे आणि दगडफेकीसह केलेल्या हल्ल्यात सहा पोलीस जखमी झाले. पण पोलिसांच्या गोळीबाराचा प्रभाव लक्षात घेऊन ठार झालेल्या सहकाऱ्यांना तेथेच टाकून बाकीच्या तस्करांनी पळ काढला. ठार झालेल्या तस्करांमध्ये १२ तामिळींचा समावेश असल्यामुळे तामिळनाडूत शोकसंतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. द्रमुक, भाकपा, पीएमके आणि भाजपाने आंध्र प्रदेश सरकारवर सडकून टीका केली. मारले गेलेले गरीब लाकूडतोडे असून, सरकारने तस्करी रोखताना कायदेशीर मार्ग अवलंबावा, अशी मागणीही या पक्षांनी केली. या घटनेवरून आंध्र आणि तामिळनाडूत अक्षरश: जुंपली आहे. तशातच स्वत:हून गोळीबाराच्या घटनेची दखल घेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने आंध्र प्रदेश सरकारला नोटीस पाठवत दोन आठवड्यांत अहवाल मागितला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्या आदेशावरून जंगलभागात हवाई पाहणी केली जात आहे. पहाटे ५ ते ६ वाजतादरम्यान चित्तूरच्या ‘चंद्रगिरी मंडल’मधील शेषाचलम् जंगल भागात दोन ठिकाणी चकमकी झाल्या. काही तस्कर रक्तचंदनाची खोडे वाहून नेताना आढळले. पोलिसांनी त्यांना हटकल्यानंतर ही धुमश्चक्री झाली. रक्तचंदनतस्करांनी वन कर्मचारी आणि पोलिसांवर हल्ले केल्याचा दीर्घ इतिहास आहे. डिसेंबर २०१३मध्ये शेषाचलम्च्या जंगलात चंदनतस्करांनी २ वन अधिकाऱ्यांना मारले होते. विशेष कृती दलाची स्थापनाचंदनाची तस्करी रोखण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने जून २०१३मध्ये विशेष कृती दलाची (एसटीएफ) स्थापना केली असून, त्यात पोलीस अधिकारी आणि वन कर्मचाऱ्यांचा समावेश केला आहे. वीरप्पन टोळीचा सहभाग?कुख्यात चंदनतस्कर वीरप्पन मारला गेला असला तरी त्याच्या टोळीचा शेषाचलम् जंगलातील तस्करीत सहभाग असण्याची शक्यता आंध्र प्रदेश पोलिसांनी नाकारलेली नाही. गेल्या वर्षी आंध्र प्रदेशात तेलगू देसम्चे सरकार सत्तेवर आल्यानंतर लगतच्या तामिळनाडूतील तस्करांना मोठ्या प्रमाणात अटक करून शेकडो टन रक्तचंदन जप्त करण्यात आले. बहुतांश तस्कर तामिळनाडूतून येत असून, ते एकावेळी शंभरावर लाकूडतोड्यांना जंगलात पाठवितात. आशियात पारंपरिक औषध आणि अन्य वापरासाठी रक्तचंदनाचा वापर केला जातो. तामिळनाडूत निदर्शनेतमिळगा वालवुरीमाई काची या संघटनेने तामिळनाडूच्या विविध भागांत निदर्शने करीत गोळीबाराचा निषेध केला आहे.