शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
4
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
5
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
6
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
7
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
8
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
9
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
10
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
11
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
12
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
13
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
14
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
15
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
16
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
17
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

आंध्र प्रदेशमध्ये चकमकीत २० चंदनतस्कर ठार

By admin | Updated: April 8, 2015 02:55 IST

चित्तूर जिल्ह्यातील शेषाचलम पर्वतीय जंगल भागात मंगळवारी पहाटे विशेष संयुक्त कृती दलाशी झालेल्या धुमश्चक्रीत २० रक्तचंदन तस्कर मारले गेले.

चित्तूर (आंध्र प्रदेश) : आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यातील शेषाचलम पर्वतीय जंगल भागात मंगळवारी पहाटे विशेष संयुक्त कृती दलाशी झालेल्या धुमश्चक्रीत २० रक्तचंदन तस्कर मारले गेले. सुमारे २०० तस्करांनी निबिड जंगलात विळे, कुऱ्हाडी, तलवारी, गावठी शस्त्रे आणि दगडफेकीसह केलेल्या हल्ल्यात सहा पोलीस जखमी झाले. पण पोलिसांच्या गोळीबाराचा प्रभाव लक्षात घेऊन ठार झालेल्या सहकाऱ्यांना तेथेच टाकून बाकीच्या तस्करांनी पळ काढला. ठार झालेल्या तस्करांमध्ये १२ तामिळींचा समावेश असल्यामुळे तामिळनाडूत शोकसंतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. द्रमुक, भाकपा, पीएमके आणि भाजपाने आंध्र प्रदेश सरकारवर सडकून टीका केली. मारले गेलेले गरीब लाकूडतोडे असून, सरकारने तस्करी रोखताना कायदेशीर मार्ग अवलंबावा, अशी मागणीही या पक्षांनी केली. या घटनेवरून आंध्र आणि तामिळनाडूत अक्षरश: जुंपली आहे. तशातच स्वत:हून गोळीबाराच्या घटनेची दखल घेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने आंध्र प्रदेश सरकारला नोटीस पाठवत दोन आठवड्यांत अहवाल मागितला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्या आदेशावरून जंगलभागात हवाई पाहणी केली जात आहे. पहाटे ५ ते ६ वाजतादरम्यान चित्तूरच्या ‘चंद्रगिरी मंडल’मधील शेषाचलम् जंगल भागात दोन ठिकाणी चकमकी झाल्या. काही तस्कर रक्तचंदनाची खोडे वाहून नेताना आढळले. पोलिसांनी त्यांना हटकल्यानंतर ही धुमश्चक्री झाली. रक्तचंदनतस्करांनी वन कर्मचारी आणि पोलिसांवर हल्ले केल्याचा दीर्घ इतिहास आहे. डिसेंबर २०१३मध्ये शेषाचलम्च्या जंगलात चंदनतस्करांनी २ वन अधिकाऱ्यांना मारले होते. विशेष कृती दलाची स्थापनाचंदनाची तस्करी रोखण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने जून २०१३मध्ये विशेष कृती दलाची (एसटीएफ) स्थापना केली असून, त्यात पोलीस अधिकारी आणि वन कर्मचाऱ्यांचा समावेश केला आहे. वीरप्पन टोळीचा सहभाग?कुख्यात चंदनतस्कर वीरप्पन मारला गेला असला तरी त्याच्या टोळीचा शेषाचलम् जंगलातील तस्करीत सहभाग असण्याची शक्यता आंध्र प्रदेश पोलिसांनी नाकारलेली नाही. गेल्या वर्षी आंध्र प्रदेशात तेलगू देसम्चे सरकार सत्तेवर आल्यानंतर लगतच्या तामिळनाडूतील तस्करांना मोठ्या प्रमाणात अटक करून शेकडो टन रक्तचंदन जप्त करण्यात आले. बहुतांश तस्कर तामिळनाडूतून येत असून, ते एकावेळी शंभरावर लाकूडतोड्यांना जंगलात पाठवितात. आशियात पारंपरिक औषध आणि अन्य वापरासाठी रक्तचंदनाचा वापर केला जातो. तामिळनाडूत निदर्शनेतमिळगा वालवुरीमाई काची या संघटनेने तामिळनाडूच्या विविध भागांत निदर्शने करीत गोळीबाराचा निषेध केला आहे.