शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
4
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
5
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
6
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
7
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
8
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
9
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
10
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
11
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
12
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
13
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
14
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
15
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
16
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
17
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
18
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
19
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
20
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
Daily Top 2Weekly Top 5

'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 09:10 IST

भारत आणि पाकिस्तानमध्ये लष्करी युद्धविराम असूनही, पाकिस्तानमधील हॅकर्स भारत सरकारच्या वेबसाइट्वर सायबर हल्ले करत आहेत.

पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे. भारतीय लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ला केला. यानंतर पाकिस्ताननेही सीमेवर गोळीबार सुरू केला. या गोळीबाराला भारतीय लष्कराने प्रत्युत्तर दिले. दरम्यान, या काळात भारतावर १५ लाख सायबर हल्ले झाल्याचे समोर आले. 

हे सायबर हल्ले भारताच्या मजबूत सायबर सुरक्षा यंत्रणेने हाणून पाडले. फक्त १५० सायबर हल्ले थांबवता आले नाहीत. हे हल्ले पाकिस्तान, बांगलादेश, इंडोनेशिया, मोरोक्को आणि पश्चिम आशियातून करण्यात आले. भारत आणि पाकिस्तानमध्ये लष्करी युद्धविराम असूनही, पाकिस्तानमधील हॅकर्स भारत सरकारच्या वेबसाइटना लक्ष्य करत आहेत. 

स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा

बांगलादेश आणि पश्चिम आशियातूनही सायबर हल्ले झाले. महाराष्ट्र सायबर अधिकाऱ्यांनी सोमवारी ही माहिती दिली.

अधिकाऱ्यांनी दावा फेटाळला

हॅकर्सनी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून डेटा चोरल्याचे, विमान वाहतूक आणि महानगरपालिका यंत्रणेत घुसखोरी केल्याचे आणि निवडणूक आयोगाच्या वेबसाइटला लक्ष्य केल्याचे दावे महाराष्ट्र सायबर कार्यालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फेटाळून लावले.

महाराष्ट्र सायबर कार्यालय हे राज्य सरकारच्या अंतर्गत येणारे नोडल कार्यालय आहे. हे सायबर गुन्ह्यांच्या तपास आणि सुरक्षेसाठी जबाबदार आहे. भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर, भारतातील सायबर हल्ले कमी झाले आहेत पण पूर्णपणे थांबलेले नाहीत," असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पाकिस्तान, बांगलादेश, इंडोनेशिया, मोरोक्को आणि पश्चिम आशियाई देशांमधून हे हल्ले सुरूच आहेत. महाराष्ट्र सायबर कार्यालयाने इंटरनेट माध्यमांवरील बनावट माहितीविरुद्ध मोहीम सुरू केली आहे आणि ८३ पैकी ३८ बनावट बातम्यांच्या पोस्ट काढून टाकल्या आहेत.

ऑनलाइन फसवणुकीबद्दल जागरूकेसाठी हेल्पलाइन सुरू करण्यात आल्या आहेत. नागरिक तात्काळ मदतीसाठी १९४५ आणि १९३० वर डायल करू शकतात. - कॉल आल्यानंतर, विश्लेषक कॉलरशी संपर्क साधतात. सुमारे १०० फोन लाईन्स एकाच वेळी काम करत आहेत. - १९३० आणि १९४५ या दोन्ही क्रमांकांवर दररोज सात हजार कॉल येतात. सायबर फसवणूक करणाऱ्यांवर वेळेवर कारवाई करून, २०१९ पासून ६०० कोटी रुपये वाचले आहेत. गेल्या सहा महिन्यांत २०० कोटी रुपये वाचले आहेत.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPakistanपाकिस्तान