शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
2
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
3
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
4
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
5
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
7
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
8
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
9
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
10
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
11
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
12
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
13
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
14
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
15
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
16
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
18
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
19
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
20
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं

'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 09:10 IST

भारत आणि पाकिस्तानमध्ये लष्करी युद्धविराम असूनही, पाकिस्तानमधील हॅकर्स भारत सरकारच्या वेबसाइट्वर सायबर हल्ले करत आहेत.

पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे. भारतीय लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ला केला. यानंतर पाकिस्ताननेही सीमेवर गोळीबार सुरू केला. या गोळीबाराला भारतीय लष्कराने प्रत्युत्तर दिले. दरम्यान, या काळात भारतावर १५ लाख सायबर हल्ले झाल्याचे समोर आले. 

हे सायबर हल्ले भारताच्या मजबूत सायबर सुरक्षा यंत्रणेने हाणून पाडले. फक्त १५० सायबर हल्ले थांबवता आले नाहीत. हे हल्ले पाकिस्तान, बांगलादेश, इंडोनेशिया, मोरोक्को आणि पश्चिम आशियातून करण्यात आले. भारत आणि पाकिस्तानमध्ये लष्करी युद्धबंदी असूनही, पाकिस्तानमधील हॅकर्स भारत सरकारच्या वेबसाइटना लक्ष्य करत आहेत. 

स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा

बांगलादेश आणि पश्चिम आशियातूनही सायबर हल्ले झाले. महाराष्ट्र सायबर अधिकाऱ्यांनी सोमवारी ही माहिती दिली.

अधिकाऱ्यांनी दावा फेटाळला

हॅकर्सनी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून डेटा चोरल्याचे, विमान वाहतूक आणि महानगरपालिका यंत्रणेत घुसखोरी केल्याचे आणि निवडणूक आयोगाच्या वेबसाइटला लक्ष्य केल्याचे दावे महाराष्ट्र सायबर कार्यालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फेटाळून लावले.

महाराष्ट्र सायबर कार्यालय हे राज्य सरकारच्या अंतर्गत येणारे नोडल कार्यालय आहे. हे सायबर गुन्ह्यांच्या तपास आणि सुरक्षेसाठी जबाबदार आहे. भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर, भारतातील सायबर हल्ले कमी झाले आहेत पण पूर्णपणे थांबलेले नाहीत," असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पाकिस्तान, बांगलादेश, इंडोनेशिया, मोरोक्को आणि पश्चिम आशियाई देशांमधून हे हल्ले सुरूच आहेत. महाराष्ट्र सायबर कार्यालयाने इंटरनेट माध्यमांवरील बनावट माहितीविरुद्ध मोहीम सुरू केली आहे आणि ८३ पैकी ३८ बनावट बातम्यांच्या पोस्ट काढून टाकल्या आहेत.

ऑनलाइन फसवणुकीबद्दल जागरूकेसाठी हेल्पलाइन सुरू करण्यात आल्या आहेत. नागरिक तात्काळ मदतीसाठी १९४५ आणि १९३० वर डायल करू शकतात. - कॉल आल्यानंतर, विश्लेषक कॉलरशी संपर्क साधतात. सुमारे १०० फोन लाईन्स एकाच वेळी काम करत आहेत. - १९३० आणि १९४५ या दोन्ही क्रमांकांवर दररोज सात हजार कॉल येतात. सायबर फसवणूक करणाऱ्यांवर वेळेवर कारवाई करून, २०१९ पासून ६०० कोटी रुपये वाचले आहेत. गेल्या सहा महिन्यांत २०० कोटी रुपये वाचले आहेत.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPakistanपाकिस्तान