शहरं
Join us  
Trending Stories
1
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
2
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
3
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
4
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
5
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
6
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
7
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
8
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
9
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
10
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
11
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
12
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
13
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
14
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
15
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
16
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
17
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
18
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
19
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
20
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री

तेलंगणात ११ मातब्बरांचे निकाल ठरणार लक्षवेधी!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2018 4:38 AM

आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेल्या प्रचारानंतर तेलंगणातील अनेक मातब्बर उमेदवारांचे भवितव्य शुक्रवारी मतपेटीत बंद झाले.

- धनाजी कांबळेहैदराबाद : आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेल्या प्रचारानंतर तेलंगणातील अनेक मातब्बर उमेदवारांचे भवितव्य शुक्रवारी मतपेटीत बंद झाले. या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे ११ डिसेंबरला जाहीर होणार असल्याने सर्वांचीच उत्सुकता वाढली आहे.टीआरएसचे नेते आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, टी. हरीश रावत, के. टी.रामा राव, ई. राजेंद्र, जी. जगदीश रेड्डी, जोगू रामण्णा, उत्तमकुमार रेड्डी, जेना रेड्डी कोंडूरू, के. लक्ष्मण, एम.मुरलीधर राव, अकबरूद्दिन ओवेसी यांच्यातील लढत लक्षवेधी ठरणार असून, यांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष आहे.टीआरएस विरुद्ध काँग्रेस-टीडीपी-टीजेएस-सीपीआय महाआघाडी अशाच चुरशी बहुसंख्य ठिकाणी होणार असून, काही ठिकाणी भाजपाचे उमेदवारही चांगली टक्कर देतील, असे चित्र आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाला राज्यात पाच जागा मिळाल्या होत्या. एमआयएमची ताकद हैदराबाद शहरातच असून, त्यांनी आठच उमेदवार उभे केले आहेत. गेल्या वेळी त्यांचे सात जण निवडून आलेच होते. यंदा आठही उमेदवार निवडून येतील, असा दावा अकबरुद्दिन ओवेसी यांनी केला आहे.अकबरुद्दिन ओवेसी यांनी टीआरएसला उघड पाठिंबाच दिला आहे. राज्यात टीआरएसचे सरकार येईल, असे ते स्वत:च सांगत आहेत. तरीही टीआरएसला बहुमतापेक्षा कमी जागा मिळाल्यास ओवेसींचे आमदार मदतीला धावतील, हे स्पष्ट आहे. दुसरीकडे भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीआरएस ही काँग्रेसची बी टीम असल्याची टीका केली असली तरी प्रसंगी राज्यात काँग्रेसचे सरकार येऊ नये, यासाठी भाजपाही टीआरएसलाच बाहेरून पाठिंबा देऊ शकेल. त्यामुळे काँग्रेसच्या पुढाकाराने तयार झालेल्या आघाडीच्या नेत्यांनी भाजपा व टीआरएस या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याची टीका केली होती. भाजपाने त्याचा इन्कार केला. टीआरएसच्या उमेदवारांच्या विरोधात भाजपाने फार ताकदीचे उमेदवार दिलेले नाहीत, हेही विसरून चालणार नाही. या पार्श्वभूमीवर मतदारांनी कुणाला कौल दिला आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.>ओवेसींची लढत महत्त्वपूर्णएमआयएमचे नेते आणि असुदुद्दीन ओवेसी यांचे बंधू अकबरूद्दीन ओवेसी यांनी चंद्रयागुट्टा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला होता. त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. टीआरएसचे सहा, काँग्रेसचे दोन, भाजपचे दोन आणि एमआयएमचे १ असे ११ उमेदवारांचे भवितव्य मतदारांच्या हातात असून, आता कोणाच्या पारड्यात किती मते पडली आहेत, हे मंगळवारीच कळणार असल्याने अनेकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

टॅग्स :Telangana Assembly Election 2018तेलंगणा विधानसभा निवडणूक 2018