शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
4
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
5
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
6
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
7
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
8
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
9
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
10
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

यंदाही टंचाई कृती आराखड्यात टॅँकरवरच भर

By श्याम बागुल | Updated: November 22, 2018 15:13 IST

दरवर्षी उन्हाळ्यात भेडसाविणाऱ्या पाणी टंचाईला ऐन वेळी सामना करण्याऐवजी आॅक्टोंबर ते डिसेंबर, जानेवारी ते मार्च व एप्रिल ते जून अशा तीन टप्प्यात उपाययोजना केल्या जाव्यात यासाठी जिल्हा परिेषदेकडून टंचाई कृती आराखडा तयार केला जातो. त्यात प्रत्येक गावात पिण्याच्या पाण्याचे असलेले स्त्रोत, उद्भवणारी पाणी टंचाई,

ठळक मुद्देजून पर्यंत ३५० टॅँकर लागणार : २८ कोटी येणार खर्च

नाशिक : यंदा पावसाने फिरविलेली पाठ व सप्टेंबरपासूनच भेडसाविणारी पाणी टंचाई पाहता, त्यावर मात करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसाठी टंचाई कृती आराखड्यात टॅँकरद्वारे पाणी पुरवठ्यावरच भर देण्यात आला असून, जून अखेरपर्यंत जिल्ह्याला ३५० टॅँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागेल असा अंदाज जिल्हा परिषदेने तयार केलेल्या आराखड्यात व्यक्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे एकीकडे जिल्ह्यातील भीषण पाणी टंचाई विषयी काळजी व्यक्त करतानाच, दुसरीकडे टंचाई कृती आराखड्याचा पहिला टप्पा संपुष्टात येत असताना प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना हाती घेण्यात आलेली नाही.दरवर्षी उन्हाळ्यात भेडसाविणाऱ्या पाणी टंचाईला ऐन वेळी सामना करण्याऐवजी आॅक्टोंबर ते डिसेंबर, जानेवारी ते मार्च व एप्रिल ते जून अशा तीन टप्प्यात उपाययोजना केल्या जाव्यात यासाठी जिल्हा परिेषदेकडून टंचाई कृती आराखडा तयार केला जातो. त्यात प्रत्येक गावात पिण्याच्या पाण्याचे असलेले स्त्रोत, उद्भवणारी पाणी टंचाई, कराव्या लागणा-या उपायोजनांची माहिती गोळा करण्याबरोबरच त्या त्या तालुक्यातील आमदार व अन्य लोकप्रतिनिधींच्याही शिफारशींचा विचार केला जातो. साधारण संभाव्य पाणी टंचाईचा सामना करता यावा यासाठी महत्वाच्या उपाययोजना सुचविण्यात येतात. विंधन विहीरी, बुडक्या घेणे, विहीरी खोल करणे, नळ पाणी पुरवठा योजनांची दुरूस्ती करणे, तात्पुरत्या नळ पाणी पुरवठा योजना घेणे अशा प्रकारच्या आठ योजनांच्या अंमलबजावणीनंतरही जर पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर टॅँकर, बैलगाडीद्वारे पाणी पुरवठा करण्याचा शेवटचा पर्याय असतो. अर्थातच या योजना राबविण्यासाठी त्याची सुरूवात आॅक्टोंबर पासूनच केली जावी असा शासनाचा दंडक असला तरी, दरवर्षी जिल्हा परिषदेकडून डिसेंबर वा जानेवारी महिन्यातच कृती आराखडा तयार केला जातो. यंदा जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती व नोव्हेंबर महिन्यातच टॅँकरची संख्या नव्वदीवर पोहोचलेली असताना जिल्हा परिषदेने नोव्हेंबर महिन्यात आराखडा सादर केला. त्यातही बागलाण सारख्या दुष्काळी तालुक्यातील टंचाई परिस्थितीबाबत अर्धसत्य माहिती घेवून आराखडा तयार करण्यात आल्याचा आक्षेप आहे.जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच सुमारे २८ कोटी रूपये खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला असून, त्यात १३४१ गावे व १७१४ वाड्यांना यंदा भीषण पाणी टंचाईशी सामना करावा लागणार असल्याचा अंदाज आहे. त्यात सर्वाधिक १४७५ गावे, वाड्यांना ३३१ टॅँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणार असून, २४०३ गावे, वाड्यांना विंधन विहीरींची विशेष दुरूस्ती सुचविण्यात आली आहे.

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिक