शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

दिंडोरीत महिलांची भटकंती ; पश्चिम पट्ट्यात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:37 AM

तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना ग्रामस्थांना करावा लागत असून, शेतीसाठी पाणी तर नाहीच, जनावरांनाही पाणी नाही व पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करायची वेळ गाव-वाडे-वस्त्यात राहणाऱ्या आदिवासी बांधवांवर आली आहे.

वणी : तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना ग्रामस्थांना करावा लागत असून, शेतीसाठी पाणी तर नाहीच, जनावरांनाही पाणी नाही व पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करायची वेळ गाव-वाडे-वस्त्यात राहणाऱ्या आदिवासी बांधवांवर आली आहे. देवसाणे, चौसाळे, चारणवाडी, सारसाळे, करंजखेड, एकलहरा, पिंगळवाडी, खोरी ही आदिवासी बहुल गावे असून, या व लगतच्या भागातील शेतजमिनीतील विहिरींनी तळ गाठला आहे.शेती व्यवसायावर याचा प्रतिकूल परिणाम झाला आहे. पुरेशा पाण्याअभावी शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. जनावरांना पिण्याचे पाणी कुठून उपलब्ध करायचे ही समस्या उभी ठाकली आहे. ग्रामस्थांनाही पिण्यासाठी पाणी मिळविण्यासाठी दाही दिशा भटकंती करावी लागते आहे. सद्यस्थितीत एकलहरा व करंजाळी येथील धरणातून ग्रामपंचायतीच्या विहिरीच्या माध्यमातून पिण्यासाठी पाणीपुरवठा होत आहे; मात्र धरणसाठ्याची पाण्याची पातळी पाणीटंचाईचे स्पष्ट संकेत देत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने विहिरी खोदण्याचा निर्णय घेतल्याची माहिती वामनराव राऊत यांनी दिली.एक परस म्हणजेच सात फूट विहीर खोदण्यासाठी सुमारे पन्नास हजार रुपये खर्च येतो. काही भागात पाणी जमिनीत किती फुटावर लागू शकते याच्या चाचपणीसाठी अधिक खोदकामही करावे लागते. सदर खर्चाचा आवाका मोठा असल्याने आदिवासी बहुल ग्रामपंचायतींना हा खर्च पेलणारा नाही.जनावरांनाही पिण्यासाठी पाणी नसल्याने धरणालगतच्या क्षेत्रातील पाण्याचा वापर सध्या करावालागतो आहे. जनावरांना चारा नसल्याने गव्हाचा तुस व भाताचा कोंडा याचा वापर करावा लागतो आहे. हिरवा चारा दाट जंगली भागात असला तरी बिबट्या अस्वल, या जंगली श्वापदांच्या भीतीमुळे जनावरांना मोकळे सोडता येत नाही. त्यामुळे इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था आदिवासी बांधवांची झाली आहे.पशुपालक हवालदिलजनावरांना चारा-पाणी अत्यल्प असून, त्यांची भूक भागविण्यासाठी जंगलातही सोडता येत नसल्याने डोळ्यादेखत गुरांचे हाल पाहण्याची वेळ आदिवासी बांधवांवर आली आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई ही या भागात पाचवीला पूजलेली, हा प्रतिवर्षीचा अनुभव आहे; मात्र ठोस उपाययोजनेअभावी आदिवासी भागाची परवड सुरूच असून, मागील वर्षी पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाल्याने स्वत:च्या शेती व्यवसायासाठी पाणी वापरले नाही. ते पाणी जनतेसाठी टँकरच्या माध्यमातून मोफत उपलब्ध करून दिल्याची माहिती संगीता राऊत यांनी दिली. पाण्यासाठी दाही दिशा भटकंती करणाºया ग्रामस्थांसाठीची समस्या सोडविणेकामी ठोस उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :droughtदुष्काळwater shortageपाणीटंचाईNashikनाशिक