शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या झटक्याने वायरमन मृत्युमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 01:39 IST

नांदगाव : लाइन जोडण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या रोहित्रावर (डीपी) चढलेला वायरमन विजेचा झटका लागून खाली पडून मृत्युमुखी पडल्याची घटना बुधवारी (दि.२४) दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास ढेकू येथे घडली. घटनेनंतर संतप्त जमावाने जातेगाव वीज उपकेंद्रावर हल्ला करून कार्यालयात तोडफोड केली. सोपान चव्हाण असे या वायरमनचे नाव आहे.

ठळक मुद्देढेकूची घटना : जातेगाव उपकेंद्रावर जमावाचा हल्ला

नांदगाव : लाइन जोडण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या रोहित्रावर (डीपी) चढलेला वायरमन विजेचा झटका लागून खाली पडून मृत्युमुखी पडल्याची घटना बुधवारी (दि.२४) दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास ढेकू येथे घडली. घटनेनंतर संतप्त जमावाने जातेगाव वीज उपकेंद्रावर हल्ला करून कार्यालयात तोडफोड केली. सोपान चव्हाण असे या वायरमनचे नाव आहे.खांबावर चढलेला सोपान अकस्मात विजेच्या तारेला चिकटला आणि बघता बघता खाली फेकला गेला. उपचारासाठी त्याला नेण्यात येत असतानाच त्याचा मृत्यू झाला. तो मयत झाल्याच्या वृत्ताने ढेकू गावात हलकल्लोळ उडाला. तरुण मयत सोपान चव्हाण (२५, रा. ढेकू) हा ह्यझिरो वायरमनह्ण होता. झिरो वायरमन ही अनधिकृत संकल्पना असून, ग्रामीण भागात विजेच्या खांबावर चढून काम करण्यासाठी अनेक वायरमन, स्थानिक तरुणांकडून अल्प आर्थिक मोबदल्यात काम करून घेत असतात. सध्या वीज वितरण कंपनीची वीजबिल वसुली मोहीम सुरू असून, मुख्य तारांमधील वीजप्रवाह बंद करून, बिलांच्या वसुलीसाठी दबाव आणला जातो असे म्हटले जाते. मयत सोपान हा नेमका दुरुस्तीसाठी चढला होता की कशासाठी याचा खुलासा होऊ शकलेला नाही.खांबावर चढताना ह्यपरमिटह्ण घेऊन वीज बंद केली जाते. चढलेली व्यक्ती सुरक्षित खाली उतरल्यावरच विजेचा प्रवाह सुरू केला जातो. प्रस्तुत घटनेत लाइनमन हरिश्चंद्र चव्हाण याने वीजप्रवाह बंद केल्याची खात्री करून वायरमन गणेश आहेर यांना कळविले व त्यानंतर सोपान खांबावर चढला होता, अशी माहिती मिळाली. अशावेळी त्याला विजेचा धक्का कसा बसला. यावर तर्कवितर्क सुरू असून, यामुळे वीज वितरण कंपनीच्या कारभारावर संताप व्यक्त करण्यासाठी जातेगाव येथे ग्रामस्थांनी तीन तास रस्त्यावर ठिय्या देऊन रास्ता रोको आंदोलन केले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. याबाबत वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता वाटपाडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.अन‌् तणाव निवळलाया घटनेने ग्रामस्थ संतप्त झाले होते. पोलीस निरीक्षक अनिल कातकडे यांनी सुचवलेली मध्यस्थी ग्रामस्थ व मयताचे नातेवाईक ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते. शेवटी आमदार सुहास कांदे यांच्या हस्तक्षेपानंतर तणाव निवळला व सांयकाळी उशिरा मृतदेह नांदगावच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. सोपानची आर्थिक स्थिती हलाखीची होती. त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

टॅग्स :electricityवीजDeathमृत्यू