शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

संशयास्पद मृत्यू झालेल्या जवानाच्या पत्नीचे नाशिकमध्ये उपोषण ; शेळके कुटुंबीयांकडून चौकशीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 6:02 PM

येवला तालुक्यातील मानूर बुद्रूक येथील सीआयपीएफचे दिवंगत जवान दिगंबर माधव शेळके यांचा आसाममधील तेजपूर येथे देशसेवेत कार्यरत असताना २३ सप्टेंबर २०१८ रोजी त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांचा मृत्यू संशयास्पद असून, त्यांची हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त करीत शेळके कुटुंबीयांनी त्यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली आहे. मात्र त्यांच्या मागणीला प्रशासनाकडून दाद मिळत नसल्याने शेळके यांच्या पत्नी अनिता दिगंबर शेळके यांनी अखेर उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. 

ठळक मुद्देसीआरपीएफचे जवान दिगंबर शेळके याचा मृत्यू संशयास्पद मृत्युच्या कारणांची चौकशी व्हावी, शेळके कटुंबियांची मागणी

नाशिक : येवला तालुक्यातील मानूर बुद्रूक येथील सीआयपीएफचे दिवंगत जवान दिगंबर माधव शेळके यांचा आसाममधील तेजपूर येथे देशसेवेत कार्यरत असताना २३ सप्टेंबर २०१८ रोजी त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांचा मृत्यू संशयास्पद असून, त्यांची हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त करीत शेळके कुटुंबीयांनी त्यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली आहे. मात्र त्यांच्या मागणीला प्रशासनाकडून दाद मिळत नसल्याने शेळके यांच्या पत्नी अनिता दिगंबर शेळके यांनी अखेर उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. येवला तालुक्यातील सीआरपीएफचे दिवंगत जवान दिगंबर शेळके यांचा आसाममध्ये मृत्यू झाल्यानंतर सीआरपीएफकडून त्यांचा मृतदेह कुटुंबीयांना सुपुर्द करण्यात आला. परंतु त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना शेळके यांच्या मृत्यूविषयी कोणतीही सविस्तर माहिती अथवा त्यांच्या सेवेपासून मृत्यूनंतर कुटुंबीयांना मिळणाऱ्या सुविधा शेळके कुटुंबीयांना मिळाल्या नाही. त्यामुळे शेळके कुटुंबीयांनी दिगंबर शेळके यांच्या मृत्यूविषयी साशंकता व्यक्त करीत त्यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या दोषींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून दिगंबर शेळके यांना शहीद घोषित करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. दरम्यान, शेळके कुटुंबीयांसमवेत. निर्मला पवार, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेखा महाजन, लक्ष्मिकांत पारनेरकर, आशा निकम, अर्चना श्रीवास्तव, सविता पवार, सचिन खटकाळे, रामदास खटकाळे, बाळासाहेब शेळके, राजेंद्र शेळके आदी उपस्थित होते.  दरम्यान, दिगंबर शेळके यांच्या निधनानंतर सीआरपीएफने केवळ त्यांचा मृतदेह कुटुंबीयांना सुपुर्द केला. परंतु त्यानंतर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यांचे कोणतेही साहित्य कुटुंबीयांना पोहोचविण्यात आलेले नाही. तसेच कु टुंबीयांची साधी चौकशीही झाली नसून जवानाच्या मृत्यूनंतर मिळणारे सानुग्रह अनुदान आणि अन्य सुविधांपासूनही शेळके कुटुंबीय वंचित आहेत. यासंबंधी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला असून, येत्या दोन ते तीन दिवसांत सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा असल्याची माहिती नाशिक जिल्हा माजी सैनिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष दिनकर पवार यांनी दिली. 

टॅग्स :agitationआंदोलनNashikनाशिकcollectorजिल्हाधिकारीSoldierसैनिकPoliceपोलिस