शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

अजित पवारांनी मंत्रिमंडळातून का कापला छगन भुजबळांचा पत्ता?; धक्कातंत्रामागे 'ही' आहेत कारणे!

By अक्षय शितोळे | Updated: December 15, 2024 20:07 IST

पहिल्या फळीचे नेते म्हणून छगन भुजबळ यांचे मंत्रिपद निश्चित मानले जात होते. मात्र ऐनवेळी त्यांना डच्चू देण्यात आला.

NCP Chhagan Bhujbal ( Marathi News ) : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज नागपुरात मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. या शपथविधी सोहळ्यात फडणवीस सरकारमध्ये ३९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांना संधी न देण्यात आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. मागील तीन दशकांहून अधिक काळ राज्याचं राजकारण गाजवणाऱ्या भुजबळ यांना अजित पवार यांनी दूर ठेवलं, याबाबतच्या चर्चांना आता उधाण आलं आहे.

नाशिक जिल्ह्याच्या राजकारणावर गेल्या अनेक वर्षांपासून छगन भुजबळ यांची पकड राहिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, नाशकातील मोठे प्रकल्प, विकासकामे, साहित्य-सांस्कृतिक उपक्रम यात भुजबळ आघाडीवर राहिले आहेत. पहिल्या फळीचे नेते म्हणून त्यांचे मंत्रिपद निश्चित मानले जात होते. मात्र ऐनवेळी त्यांना डच्चू देण्यात आला.

कोणत्या कारणांमुळे भुजबळ मंत्रिमंडळाबाहेर?

राज्याच्या राजकारणात आपलं वजन निर्माण करणाऱ्या छगन भुजबळ यांना पहिला धक्का बसला होता तो महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील आरोपी आणि नंतर झालेल्या जेलवारीमुळे. ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी भुजबळ यांना अटक करण्यात आली होती. काही महिने तुरुंगात राहिल्यानंतर त्यांची जामीनावर सुटका झाली. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये आणि नंतर महायुती सरकारमध्येही ते मंत्री झाले. मात्र राज्यात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात उभ्या राहिलेल्या मराठा आरक्षण आंदोलनावेळी भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. जरांगे आणि भुजबळ यांच्यात वारंवार शा‍ब्दिक फैरीही झडल्या. यातून राज्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघालं. भुजबळांच्या राजीमान्याचीही मागणी होत होती. मात्र अजित पवार हे त्यांच्या पाठीशी राहिले आणि भुजबळांचे मंत्रिपद कायम राहिले. परंतु आता नव्या सरकारमध्ये मात्र अजित पवारांनी छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश केलेला नाही. मराठा आरक्षणावेळी घेतलेली आक्रमक भूमिका, हेच भुजबळांच्या गच्छंतीचे कारण ठरले का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

दरम्यान, छगन भुजबळ यांना त्यांच्या जिल्ह्यातूनही मंत्रि‍पदासाठी मोठी स्पर्धा होती. कारण जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे नरहरी झिरवाळ, नितीन पवार व हिरामण खोसकर असे तीन आदिवासी आमदार आहेत. त्यामुळे आदिवासी समाजाला प्रतिनिधित्व देण्यासाठी झिरवळ यांना मंत्रिपद देणे क्रमप्राप्त होते. दुसरीकडे, माणिकराव कोकाटे हे पाच वेळा आमदार राहिलेले आहेत. त्यांना अजित पवार यांनी सिन्नरच्या सभेत मंत्रिपदाचे आश्वासन दिले होते. त्यामुळे तो शब्द पाळण्यासाठी कोकाटे यांना मंत्रिपद देणे अजित पवारांसाठी गरजेचे झाले होते. अशा स्थितीत नाशिक जिल्ह्यातूनच आणखी एक मंत्रिपद दिल्यास प्रादेशिक समतोल राखणं कठीण गेलं असतं. त्यामुळेही अजित पवारांकडून छगन भुजबळ यांना मंत्रिपद न देण्याचा निर्णय झाला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Chhagan Bhujbalछगन भुजबळNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारNashikनाशिकyevla-acयेवलाCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तार