शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

कुठे नेऊन ठेवला भाजपा माझा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 00:46 IST

सत्ता नसते तेव्हा सारे शांत असते आणि सत्ता आली की सारे अशांत होते असा अनुभव सध्या नाशिकमधील भाजपा घेत आहेत. पक्षातील नव्या-जुन्यांचा वाद, त्यात नवागतांनी पक्षावर मिळवलेला ताबा, स्थानिक आमदारांमधील द्वंद्व या साºया प्रकारांमुळे कार्यकर्ते अस्वस्थ झाले असून, कोठे नेऊन ठेवला भाजपा माझा, असे म्हणण्याची वेळ निष्ठावंतांवर आली आहे.

नाशिक : सत्ता नसते तेव्हा सारे शांत असते आणि सत्ता आली की सारे अशांत होते असा अनुभव सध्या नाशिकमधील भाजपा घेत आहेत. पक्षातील नव्या-जुन्यांचा वाद, त्यात नवागतांनी पक्षावर मिळवलेला ताबा, स्थानिक आमदारांमधील द्वंद्व या साºया प्रकारांमुळे कार्यकर्ते अस्वस्थ झाले असून, कोठे नेऊन ठेवला भाजपा माझा, असे म्हणण्याची वेळ निष्ठावंतांवर आली आहे.  शिस्तबद्ध पक्ष म्हणून भाजपाची असलेली ओळख केव्हाच लयास गेली आहे. कॉँग्रेस आणि अन्य पक्षांशी लढता लढता त्यांचे गुण तर पक्षात आलेच; शिवाय त्याच पक्षातील नेतेही आता पक्षात आल्याने ओरिजनल भाजपाई शोधण्याची वेळ आली आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत तर चार सदस्यीय प्रभागात दोन ओरिजनल आणि दोन नवे परपक्षीय असे धोरणच म्हणे भाजपाने राबवून राजकारणात आदर्श समतोलाचे उदाहरण दाखवले होते. त्याचवेळी वादांच्या ठिणग्या उडत होत्या. परंतु आता त्या ठिणग्यांनी पक्षालाच आग लागते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. भाजपातील तीन आमदारांचे एक एकात नाही. तिघा आमदारांची त्रिमूर्ती स्थिती झालेली. त्यात एका अपक्ष आमदाराची पक्षात भर पडली. आधीच मूळ नेत्यांमध्ये वर्चस्ववाद त्यात अन्य पक्षांतील आजी- माजी आमदार नेते आणि त्यांच्या समर्थकांची भर पडली. त्यामुळे काय होणार, ज्यांनी मार्गदर्शन करावे किंवा ज्यांचा धाक होता असे नेते पक्षात नाहीत किंवा हयातही नाहीत, तर काही मार्गदर्शक मंडळावरील सदस्यांप्रमाणे मखरात बसवलेले आहेत. साहजिक गेल्या दोन ते तीन वर्षांत जे काही सुप्त संघर्ष होते तेच आता उघडपणे चव्हाट्यावर आले आहेत. शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांच्या हाती स्थानिक आणि महापालिकेची सत्ता एकवटल्यानंतर अन्य नाराजांना पक्षश्रेष्ठींचा आधार शोधावा लागला. स्थानिक पातळीवर एक निर्णय घेतला की राज्यस्तरावरून त्याला स्थगित करायचे या वादामुळे महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. त्याचबरोबर जिल्हास्तरावरील डझनभर समित्यांना मुहूर्त लागलेला नाही. बळी तो कान पिळी या उक्तीनुसार विशेष कार्य अधिकाºयासारखी पदे एकाच नेत्याच्या आणि आमदारांच्या घरातही दिली गेली, पण कार्यकर्त्यांना पुरेशी संधी मिळालेली नाही. त्यात गटबाजीचे सध्या दिसत असलेले दर्शन बघून भाजपा कार्यालयात पहिले राष्टÑ.. अंत स्वयं... ही घोषणा खुंटीलाच टांगल्याचा प्रत्यय येतो आहे.  एका पक्षातील वादाची कारणे तरी किती? जनसामान्यांसाठी उपयुक्त ठरावे अशा एका कल्याणकारी महिला रुग्णालयाचे स्थान कोणते असावे यासाठी दोन आमदारांमध्ये जो प्रतिष्ठेचा प्रश्न सुरू आहे त्यातून सर्वसामान्यांची परवड होत आहे त्याचे काय, याचा विचारही कोणी करताना दिसत नाही.मुख्यमंत्र्यांपर्यंत हा विषय मतास टाकावा लागतो आणि त्यांनी निकाल दिल्यानंतरही विरोध होत असेल तर मग पक्षाचे स्थानिक नेते ऐकणार तरी कोणाचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन वर्षांवर विधानसभा निवडणुका आल्या असून, त्यासाठी आताच रणशिंग फुंकले जाण्याची चिन्हे असली तरी ही निवडणूक लढविणार तरी कोणाच्या भरवशावर, असा प्रश्न आहे. कारण ज्यांच्या भरवशावर निवडणूक लढवावी असे समर्पित कार्यकर्ते केव्हाच अंतर्धान पावले आहेत.