शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कुठे नेऊन ठेवला भाजपा माझा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 00:46 IST

सत्ता नसते तेव्हा सारे शांत असते आणि सत्ता आली की सारे अशांत होते असा अनुभव सध्या नाशिकमधील भाजपा घेत आहेत. पक्षातील नव्या-जुन्यांचा वाद, त्यात नवागतांनी पक्षावर मिळवलेला ताबा, स्थानिक आमदारांमधील द्वंद्व या साºया प्रकारांमुळे कार्यकर्ते अस्वस्थ झाले असून, कोठे नेऊन ठेवला भाजपा माझा, असे म्हणण्याची वेळ निष्ठावंतांवर आली आहे.

नाशिक : सत्ता नसते तेव्हा सारे शांत असते आणि सत्ता आली की सारे अशांत होते असा अनुभव सध्या नाशिकमधील भाजपा घेत आहेत. पक्षातील नव्या-जुन्यांचा वाद, त्यात नवागतांनी पक्षावर मिळवलेला ताबा, स्थानिक आमदारांमधील द्वंद्व या साºया प्रकारांमुळे कार्यकर्ते अस्वस्थ झाले असून, कोठे नेऊन ठेवला भाजपा माझा, असे म्हणण्याची वेळ निष्ठावंतांवर आली आहे.  शिस्तबद्ध पक्ष म्हणून भाजपाची असलेली ओळख केव्हाच लयास गेली आहे. कॉँग्रेस आणि अन्य पक्षांशी लढता लढता त्यांचे गुण तर पक्षात आलेच; शिवाय त्याच पक्षातील नेतेही आता पक्षात आल्याने ओरिजनल भाजपाई शोधण्याची वेळ आली आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत तर चार सदस्यीय प्रभागात दोन ओरिजनल आणि दोन नवे परपक्षीय असे धोरणच म्हणे भाजपाने राबवून राजकारणात आदर्श समतोलाचे उदाहरण दाखवले होते. त्याचवेळी वादांच्या ठिणग्या उडत होत्या. परंतु आता त्या ठिणग्यांनी पक्षालाच आग लागते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. भाजपातील तीन आमदारांचे एक एकात नाही. तिघा आमदारांची त्रिमूर्ती स्थिती झालेली. त्यात एका अपक्ष आमदाराची पक्षात भर पडली. आधीच मूळ नेत्यांमध्ये वर्चस्ववाद त्यात अन्य पक्षांतील आजी- माजी आमदार नेते आणि त्यांच्या समर्थकांची भर पडली. त्यामुळे काय होणार, ज्यांनी मार्गदर्शन करावे किंवा ज्यांचा धाक होता असे नेते पक्षात नाहीत किंवा हयातही नाहीत, तर काही मार्गदर्शक मंडळावरील सदस्यांप्रमाणे मखरात बसवलेले आहेत. साहजिक गेल्या दोन ते तीन वर्षांत जे काही सुप्त संघर्ष होते तेच आता उघडपणे चव्हाट्यावर आले आहेत. शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांच्या हाती स्थानिक आणि महापालिकेची सत्ता एकवटल्यानंतर अन्य नाराजांना पक्षश्रेष्ठींचा आधार शोधावा लागला. स्थानिक पातळीवर एक निर्णय घेतला की राज्यस्तरावरून त्याला स्थगित करायचे या वादामुळे महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. त्याचबरोबर जिल्हास्तरावरील डझनभर समित्यांना मुहूर्त लागलेला नाही. बळी तो कान पिळी या उक्तीनुसार विशेष कार्य अधिकाºयासारखी पदे एकाच नेत्याच्या आणि आमदारांच्या घरातही दिली गेली, पण कार्यकर्त्यांना पुरेशी संधी मिळालेली नाही. त्यात गटबाजीचे सध्या दिसत असलेले दर्शन बघून भाजपा कार्यालयात पहिले राष्टÑ.. अंत स्वयं... ही घोषणा खुंटीलाच टांगल्याचा प्रत्यय येतो आहे.  एका पक्षातील वादाची कारणे तरी किती? जनसामान्यांसाठी उपयुक्त ठरावे अशा एका कल्याणकारी महिला रुग्णालयाचे स्थान कोणते असावे यासाठी दोन आमदारांमध्ये जो प्रतिष्ठेचा प्रश्न सुरू आहे त्यातून सर्वसामान्यांची परवड होत आहे त्याचे काय, याचा विचारही कोणी करताना दिसत नाही.मुख्यमंत्र्यांपर्यंत हा विषय मतास टाकावा लागतो आणि त्यांनी निकाल दिल्यानंतरही विरोध होत असेल तर मग पक्षाचे स्थानिक नेते ऐकणार तरी कोणाचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन वर्षांवर विधानसभा निवडणुका आल्या असून, त्यासाठी आताच रणशिंग फुंकले जाण्याची चिन्हे असली तरी ही निवडणूक लढविणार तरी कोणाच्या भरवशावर, असा प्रश्न आहे. कारण ज्यांच्या भरवशावर निवडणूक लढवावी असे समर्पित कार्यकर्ते केव्हाच अंतर्धान पावले आहेत.