शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

कुठे नेऊन ठेवला भाजपा माझा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 00:46 IST

सत्ता नसते तेव्हा सारे शांत असते आणि सत्ता आली की सारे अशांत होते असा अनुभव सध्या नाशिकमधील भाजपा घेत आहेत. पक्षातील नव्या-जुन्यांचा वाद, त्यात नवागतांनी पक्षावर मिळवलेला ताबा, स्थानिक आमदारांमधील द्वंद्व या साºया प्रकारांमुळे कार्यकर्ते अस्वस्थ झाले असून, कोठे नेऊन ठेवला भाजपा माझा, असे म्हणण्याची वेळ निष्ठावंतांवर आली आहे.

नाशिक : सत्ता नसते तेव्हा सारे शांत असते आणि सत्ता आली की सारे अशांत होते असा अनुभव सध्या नाशिकमधील भाजपा घेत आहेत. पक्षातील नव्या-जुन्यांचा वाद, त्यात नवागतांनी पक्षावर मिळवलेला ताबा, स्थानिक आमदारांमधील द्वंद्व या साºया प्रकारांमुळे कार्यकर्ते अस्वस्थ झाले असून, कोठे नेऊन ठेवला भाजपा माझा, असे म्हणण्याची वेळ निष्ठावंतांवर आली आहे.  शिस्तबद्ध पक्ष म्हणून भाजपाची असलेली ओळख केव्हाच लयास गेली आहे. कॉँग्रेस आणि अन्य पक्षांशी लढता लढता त्यांचे गुण तर पक्षात आलेच; शिवाय त्याच पक्षातील नेतेही आता पक्षात आल्याने ओरिजनल भाजपाई शोधण्याची वेळ आली आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत तर चार सदस्यीय प्रभागात दोन ओरिजनल आणि दोन नवे परपक्षीय असे धोरणच म्हणे भाजपाने राबवून राजकारणात आदर्श समतोलाचे उदाहरण दाखवले होते. त्याचवेळी वादांच्या ठिणग्या उडत होत्या. परंतु आता त्या ठिणग्यांनी पक्षालाच आग लागते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. भाजपातील तीन आमदारांचे एक एकात नाही. तिघा आमदारांची त्रिमूर्ती स्थिती झालेली. त्यात एका अपक्ष आमदाराची पक्षात भर पडली. आधीच मूळ नेत्यांमध्ये वर्चस्ववाद त्यात अन्य पक्षांतील आजी- माजी आमदार नेते आणि त्यांच्या समर्थकांची भर पडली. त्यामुळे काय होणार, ज्यांनी मार्गदर्शन करावे किंवा ज्यांचा धाक होता असे नेते पक्षात नाहीत किंवा हयातही नाहीत, तर काही मार्गदर्शक मंडळावरील सदस्यांप्रमाणे मखरात बसवलेले आहेत. साहजिक गेल्या दोन ते तीन वर्षांत जे काही सुप्त संघर्ष होते तेच आता उघडपणे चव्हाट्यावर आले आहेत. शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांच्या हाती स्थानिक आणि महापालिकेची सत्ता एकवटल्यानंतर अन्य नाराजांना पक्षश्रेष्ठींचा आधार शोधावा लागला. स्थानिक पातळीवर एक निर्णय घेतला की राज्यस्तरावरून त्याला स्थगित करायचे या वादामुळे महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. त्याचबरोबर जिल्हास्तरावरील डझनभर समित्यांना मुहूर्त लागलेला नाही. बळी तो कान पिळी या उक्तीनुसार विशेष कार्य अधिकाºयासारखी पदे एकाच नेत्याच्या आणि आमदारांच्या घरातही दिली गेली, पण कार्यकर्त्यांना पुरेशी संधी मिळालेली नाही. त्यात गटबाजीचे सध्या दिसत असलेले दर्शन बघून भाजपा कार्यालयात पहिले राष्टÑ.. अंत स्वयं... ही घोषणा खुंटीलाच टांगल्याचा प्रत्यय येतो आहे.  एका पक्षातील वादाची कारणे तरी किती? जनसामान्यांसाठी उपयुक्त ठरावे अशा एका कल्याणकारी महिला रुग्णालयाचे स्थान कोणते असावे यासाठी दोन आमदारांमध्ये जो प्रतिष्ठेचा प्रश्न सुरू आहे त्यातून सर्वसामान्यांची परवड होत आहे त्याचे काय, याचा विचारही कोणी करताना दिसत नाही.मुख्यमंत्र्यांपर्यंत हा विषय मतास टाकावा लागतो आणि त्यांनी निकाल दिल्यानंतरही विरोध होत असेल तर मग पक्षाचे स्थानिक नेते ऐकणार तरी कोणाचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन वर्षांवर विधानसभा निवडणुका आल्या असून, त्यासाठी आताच रणशिंग फुंकले जाण्याची चिन्हे असली तरी ही निवडणूक लढविणार तरी कोणाच्या भरवशावर, असा प्रश्न आहे. कारण ज्यांच्या भरवशावर निवडणूक लढवावी असे समर्पित कार्यकर्ते केव्हाच अंतर्धान पावले आहेत.