शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
2
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
3
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
4
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
5
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
6
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
7
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
8
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
9
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?
10
"बाय बाय मुंबई, मी लवकरच...", प्राजक्ता माळी अचानक चालली तरी कुठे?, चाहते पडले चिंतेत
11
अमेरिकेतून भारतासाठी आली आनंदाची बातमी! 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
12
Delhi Blast : देशभरात हायअलर्ट! दिल्ली कार स्फोटाचा तपास NIA करणार; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
13
कालभैरव जयंती २०२५: कालभैरवाच्या कृपेने 'या' ८ राशींच्या आयुष्यात घडणार अविस्मरणीय घटना!
14
पहलगामनंतर आता दिल्ली..; 7 महिन्यात 41 भारतीयांचा मृत्यू, काँग्रेसचा मोदी-शाहांवर निशाणा
15
पाकिस्तानी क्रिकेटर संघासोबत असताना घरावर गोळीबार, खिडक्या फुटल्या, कुटुंबीयांमध्येही घबराट
16
Groww IPO Allotment and GMP: ग्रे मार्केटमध्ये Groww ची स्थितीही वाईट; उच्चांकापासून ८२% घसरली किंमत; कसं चेक कराल तुम्हाला शेअर्स मिळाले की नाही?
17
वाहतूककोंडीचा त्रास संपवण्यासाठी AI तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत टोल नाक्याचा प्रस्ताव
18
घोसाळकरांना धक्का, पेडणेकरांचा मार्ग मोकळा; मुंबई मनपा आरक्षण सोडत जाहीर! जाणून घ्या संपूर्ण यादी...
19
Delhi Red Fort Blast : स्फोट प्रकरणात पुलवामा कनेक्शन समोर; डॉ. उमरचा जवळचा मित्र डॉ. सज्जाद अहमद याला अटक
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! व्यूजसाठी घरी केला खतरनाक स्टंट; गरम तव्यावर बसला अन्...

पाण्याचे दुर्भिक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 00:44 IST

बादलीभर पाण्यासाठी चातकाप्रमाणे वाट पाहण्याची दुर्दैवी वेळ विदर्भात ग्रामीण भागातील नागरिकांवर आली आहे. दरवर्षीप्रमाणे प्रशासनाचे नियोजन चुकल्याने यंदाही विदर्भातील शेकडो गावांमध्ये भीषण जलसंकट आ वासून आहे. यवतमाळ शहरात तर एकेका कुटुंबाला ड्रमभर पाण्यात आठ दिवस गुजराण करावी लागत आहे. मागास वस्त्यांची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. पुढील काही दिवसात ही स्थिती स्फोटक झाल्यास आश्चर्य वाटू नये.

बादलीभर पाण्यासाठी चातकाप्रमाणे वाट पाहण्याची दुर्दैवी वेळ विदर्भात ग्रामीण भागातील नागरिकांवर आली आहे. दरवर्षीप्रमाणे प्रशासनाचे नियोजन चुकल्याने यंदाही विदर्भातील शेकडो गावांमध्ये भीषण जलसंकट आ वासून आहे. यवतमाळ शहरात तर एकेका कुटुंबाला ड्रमभर पाण्यात आठ दिवस गुजराण करावी लागत आहे. मागास वस्त्यांची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. पुढील काही दिवसात ही स्थिती स्फोटक झाल्यास आश्चर्य वाटू नये. पाण्यासाठी मोताद झालेल्या यवतमाळकरांना आठवडाभराचे पाणी साठवून ठेवण्याकरिता सुटी घ्यावी लागत आहे. १९७३ च्या दुष्काळाची आठवण करून देणारी ही पाणीटंचाई असल्याची प्रचिती येत आहे. उन्हाळा जेमतेम सुरू झाला आहे. पुढे स्थिती आणखी गंभीर होऊ शकते. अनेक भागांची भिस्त टँकरवर असली तरी टँकरही येत नाही. गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यात तर चक्क खड्ड्यातील अशुद्ध पाणी पिण्याची वेळ नागरिकांवर येऊन ठेपली आहे. गावातील हातपंपच निकामी झाल्याने पाणी मिळण्याचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. नळयोजनेच्या विहिरींची पातळी अतिशय खोल गेली आहे. त्यामुळे पाण्याचा उपसा एकदिवसा आड केला जात आहे. परिणामी नागरिकांना आठ दिवसानंतरच पाणी मिळत आहे. ग्रामसेवकाकडे तक्रार केली तरी तो दुर्लक्ष करतो. चंद्रपूर जिल्ह्यात जिवती तालुक्यातील ग्रामीण दरवर्षी पाण्याच्या समस्येला सामोरे जातात. गोंदिया, भंडारातही स्थिती वेगळी नाही. उन्हाची दाहकता तशी फेब्रुवारीपासूनच जाणवायला लागली होती. मार्च संपताना ती तीव्र झाली आहे. मात्र प्रशासनदरबारी नियोजनाचा अभाव असल्याने पाणी पेटल्याशिवाय राहणार नाही, असे वाटायला लागले आहे. गुंडभर पाण्यासाठी दोन- दोन किलोमीटरची पायपीट करावी लागत असल्याचे चित्र अनेक भागात पाहायला मिळते. जंगलातही वन्यजीवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पहिल्यांदा मार्चमध्येच जंगलातील नैसर्गिक पाणवठे आटू लागले आहेत. ही बाब वनखात्यासाठी अधिक चिंताजनक आहे. ‘टायगर कॅपिटल’ म्हणून ओळख असलेल्या विदर्भात वाघांची संख्या मोठी आहे. वाघांची तृष्णा भागविण्यासाठी वन विभाग दरवर्षी नियोजन करीत असतो. कृत्रिम पाणवठे तयार केले जातात. मात्र यंदा हे काम आतापासूनच हाती घेण्यात आले आहे. नैसर्गिक पाणवठे आटत चालल्याने वनविभागाची डोकेदुखी वाढत असताना कृत्रिम पाणवठ्यात शिकाऱ्यांकडून विषप्रयोग करून प्राण्यांची शिकार करण्याची भीती आहेच. एकंदरीत यंदाचा उन्हाळा डोळ्यातून पाणी आणणारा ठरू शकतो.

टॅग्स :Waterपाणीdroughtदुष्काळMaharashtraमहाराष्ट्रwater scarcityपाणी टंचाई