शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
5
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
6
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
7
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
8
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
9
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
11
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

पाणीकपातीचा आज फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 1:45 AM

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात अवघा पंधरा टक्के साठा शिल्लक आहे. शिवाय अन्य दोन साठवण धरणातूनदेखील पाणी सोडल्यानंतर ते मिळण्याची शक्यता कमी असल्याने अखेरीस पाणीकपातीच्या निर्णयाप्रत महापालिका आली आहे. प्रशासनाने यासंदर्भात मंगळवारी (दि.२५) महासभेत प्रस्ताव मांडला आहे. त्यावर निर्णय घेतला जाणार आहे.

नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात अवघा पंधरा टक्के साठा शिल्लक आहे. शिवाय अन्य दोन साठवण धरणातूनदेखील पाणी सोडल्यानंतर ते मिळण्याची शक्यता कमी असल्याने अखेरीस पाणीकपातीच्या निर्णयाप्रत महापालिका आली आहे. प्रशासनाने यासंदर्भात मंगळवारी (दि.२५) महासभेत प्रस्ताव मांडला आहे. त्यावर निर्णय घेतला जाणार आहे.महापालिकेची धोरणात्मक निर्णयासाठी तहकूब झालेली महासभा मंगळवारी (दि.२५) सकाळी होणार आहे. महापालिकेच्या महासभेत अनेक वादाचे विषय असले तरी शहरवासीयांच्या दृष्टीने सर्वाधिक महत्त्वाचा विषय पाणी कपातीचा असणार आहे. शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणात पाणीसाठा कमी होत आहे. पाऊसदेखील लांबल्याने आता नाशिककरांच्या तोंंडचे पाणी पळाले आहे. कश्यपी आणि गौतमी गोदावरी धरणात सुमारे दीडशे दशलक्षघनफूट पाणी असले तरी धरणातून महापालिकेच्या जलविहिरीपर्यंत पाणी येण्यात खडकाचा अडथळा आहे. महापालिकेने याठिकाणी चर खोदण्याचे काम सुरू केले आहे. तथापि, हे काम वेळेत होईल किंवा नाही अशी शंका आहे, त्याचबरोबर दारणा धरणातून प्रदूषित पाणी बंद झाल्यानेदेखील महापालिकेची अडचण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर गेल्या शनिवारी (दि.२२) महापौर रंजना भानसी आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी गंगापूर धरणाच्या ठिकाणी भेट दिली होती. त्यावेळीच पाणीकपातीच्या अनुषंघाने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश महापौरांनी दिले होते.पाणीपुरवठा विभागाने एकवेळ पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव महासभेवर ठेवला आहे. त्यानुसार ज्या भागात दोन वेळ पाणीपुरवठा होतो तेथे एकवेळ आणि एकवेळ पाणीपुरवठा असलेल्या ठिकाणी काही प्रमाणात कपात करण्याचे नियोजन आहे.कपातीऐवजी हवा निर्जला दिनप्रशासनाच्या वतीने दोन पर्याय देण्यात आले असले तरी प्रत्यक्षात मात्र कोरडा दिवस किंवा निर्जला दिन करण्यावर भर आहे. एका दिवसात पाणीकपात झाल्यास साडेचारशे दशलक्ष लिटर्स पाणी एकाच दिवसात वाचत असल्याने प्रशासनाच्या मतानुसार हाच प्रस्ताव योग्य आहे. मात्र, यापूर्वी एकदा कोरडा दिवस ठेवला की दुसºया दिवशी जलवाहिन्या कोरड्या असतात. त्या भरण्यासाठी वेळ जात असल्याने कोरडा दिवसाच्या दुसºया दिवशीदेखील नागरिकांना कमी पाणीपुरवठा होत असल्याने अडचण निर्माण होते. त्यामुळे सहसा नगरसेवक त्यासाठी राजी होत नाही.कटू निर्णय लोकप्रतिनिधींच्या माथीमनपात पाणीकपातीचे अधिकार खरे तर प्रशासकीय असून, ते लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन आयुक्तच घोषित करीत असतात. हा कटू निर्णय असल्याने लोकप्रतिनिधींच्या गळी मारण्याचे प्रकार सुरू झाल्याची चर्चा आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाgangapur damगंगापूर धरणwater shortageपाणीटंचाई