शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
2
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
3
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
4
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
5
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
6
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
7
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
8
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
9
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
10
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
11
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
12
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
13
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
15
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
16
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
17
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
18
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
19
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
20
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार

अवघ्या दोन दिवसांत ३८ हजार हेक्टरवर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2021 1:35 AM

नाशिक जिल्ह्यात १ आणि २ डिसेंबर या दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे ३८ हजार ९२ हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले तर कांदा आणि द्राक्ष पिकांनाही या अवकाळीचा फटका बसला आहे. सुमारे २३ हजार हेक्टरवरील कांदा पिकांचे नुकसान झाले असून द्राक्ष पिकांचेही काही प्रमाणात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.

ठळक मुद्देअवकाळीचा फटका : प्राथमिक अहवालानुसार कांद्याचे सर्वाधिक नुकसान

नाशिक : नाशिक जिल्ह्यात १ आणि २ डिसेंबर या दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे ३८ हजार ९२ हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले तर कांदा आणि द्राक्ष पिकांनाही या अवकाळीचा फटका बसला आहे. सुमारे २३ हजार हेक्टरवरील कांदा पिकांचे नुकसान झाले असून द्राक्ष पिकांचेही काही प्रमाणात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.

अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्याला पुन्हा एकदा झोडपल्याने सलग दोन वर्षे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. निसर्गाची वक्रदृष्टी यंदाही नाशिक जिल्ह्यावर पडली आणि ऐन हिवाळ्यात झालेल्या पर्जन्यवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकाचे तसेच पशुधनाचे मेाठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यानुसार जिल्ह्यातील १०९७ गावांमधील शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान पाहण्याची वेळ आली. ५५ हजार ८९५ शेतकऱ्यांच्या कांदा, गहू, हरभरा, टोमॅटो, भाजीपाला तसेच आंबा, द्राक्ष आणि डाळिंबाचे नुकसान झाले.

कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने १ व २ डिसेंबरला अवकाळीचा पाऊस झाला. कोकण, मुंबईसह नाशकात अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपले. नाशिक जिल्ह्यात गारठ्याने ८७२ मेंढ्यांचा मृत्यू झाला तर गाय, वासरे व शेळ्या दगावल्याने मोठ्या प्रमाणात पशुधनाचे नुकसान झाले. भात, मका, भुईमुग, सोयाबीन, नागली, वरई, कांदा, हरभरा, गहू, टोमॅटो व भाजीपाला आडवा झाला. मालेगाव, सटाणा, नांदगाव या तालुक्यांमध्ये इतर तालुक्यांच्या तुलनेत जादा नुकसान झाल्याचे आकडेवारीवरून समोर येत आहे. जिल्हा प्रशासनाने पंचनामे पूर्ण केले असून आर्थिक नुकसानभरपाईचा अहवाल शासनाला सादर केला आहे.

--इन्फो-

या पिकांना बसला सर्वाधिक फटका

या अवकाळी पावसामुळे द्राक्ष आणि कांदा पिकांना चांगलाच फटका बसला. जिल्ह्यातील १०,५९९.०५ हेक्टरवरील पिकांना फटका बसला. या दोन दिवसांत कडाक्याची थंडी पडली, शिवाय पावसाची संततधार लागल्याने शेतकऱ्यांना द्राक्षे वाचविण्यासाठी औषध फवारणी करावी लागली. अनेक ठिकाणी तर बागेतील द्राक्षे गळून पडली तर तडेदेखील गेल्याने नुकसान झाले. कांदा पिकाच्या नुकसानीचे क्षेत्रदेखील माेठे आहे. अवकाळीमुळे २३,२४२.३० हेक्टरवरील कांदा पीक पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांना फटका बसला.

--इन्फो--

नुकसानीचे पीक क्षेत्र (हे.)

जिरायत - ७२८.९०

बागायत - २६६५३.३०

बहुवार्षिक फळपिके - १०७१०.६५

--इन्फो--

तालुका             नुकसानीचे क्षेत्र (हे.)

मालेगाव--------- ९२१

सटाणा ----------२८३७

नांदगाव---------२५५०

कळवण---------८२७.७०

देवळा----------७०.००

दिंडोरी---------२२६५.८०

सुरगाणा--------३१.८०

नाशिक---------१४२४.६०

त्र्यंबकेश्वर------२२८.१०

इगतपुरी----------२५३.००

पेठ--------------१८.००

निफाड-------------१३२८.००

सिन्नर-------------५९२.९५

येवला----------------५३.३०

चांदवड-------------२४६९१.६०

एकूण--------------३८०९२.८५

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊसFarmerशेतकरी