शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
4
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
5
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
6
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
7
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
8
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
9
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
10
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
11
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
12
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
13
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
14
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
15
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
16
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
17
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
18
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
19
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
20
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी

सतर्कतेचा इशारा : हवामान खात्याच्या अंदाजामुळे चिंता वाढली जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टीची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2019 1:49 AM

नाशिक : आॅक्टोबरमध्ये कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू असतानाचा येत्या दोन दिवसांत जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविल्याने शेतकऱ्यांसह प्रशासकीय यंत्रणेची देखील चिंता वाढली आहे.

नाशिक : आॅक्टोबरमध्ये कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू असतानाचा येत्या दोन दिवसांत जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविल्याने शेतकऱ्यांसह प्रशासकीय यंत्रणेची देखील चिंता वाढली आहे. अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेच्या तर शेतकऱ्यांना उरल्यासुरल्या पिकांची काळजी घेण्याबाबतचे आवाहन केले आहे. आपत्तीचा सामना करण्यासाठी जिल्ह्यातील आपत्कालीन यंत्रणेला देखील सज्जतेच्या सूचना दिलेल्या आहेत.जून-जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेला महापूर आणि त्यामुळे पिकांचे झालेले नुकसान यातून शेतकरी सावरत नाही तोच आॅक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे जिल्'ातील साडेतीन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्'ातील जवळपास सर्वच पिके नष्ट झाली आहे, तर द्राक्षांची मोठी हानी झाल्याने हंगामातील द्राक्ष उत्पादनदेखील कमी होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. हाती आलेले तसेच शेतातील उभे पीक वाहून गेल्यामुळे ओढावलेल्या नैसर्गिक आपत्तीची झळ कायम असताना जिल्ह्यात येत्या ६ ते ८ तारखेदरम्यान अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविल्याने शेतकºयांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे.अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे नाशिक जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत यापूर्वीच परतीच्या पावसाने नुकसान केले असताना आता अतिवृष्टीचा धोका निर्माण झालेला आहे. विशेषत: डोंगराळ भागात असलेल्या तालुक्यांना या अतिवृष्टीचा फटका बसण्याची शक्यता असल्याने यापूर्वी अवकाळी पाऊस झालेल्या तालुक्यांची हानी होण्याची शक्यता आहे.नैसर्गिक आपत्तीचा सामना करणाºया जिल्हा प्रशासनाला यंदा जूनपासूनच लहरी पावसामुळे धावपळ करावी लागत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर लागलीच अवकाळी पावसाचे संकट आल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा आता आपत्ती निवारण आणि पंचनामन्याच्या कामाला जुंपली आहे.हवामान खात्याने अंदाज वर्तविल्यानंतर जिल्हा यंत्रणा सतर्क झाली असून, जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. विशेषत: शेतकºयांचा उरलासुरला शेतमाल वाचवण्यिाचे मोठे आव्हान प्रशासनापुढे निर्माण झाले आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी शेतकºयांना सावध राहण्याचा सल्ला देण्याबरोबर पिके सुरक्षित ठेवण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :Rainपाऊस