शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

कसमादे परिसरातील गावांचा पाणीप्रश्न सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 00:24 IST

कसमादे पट्ट्यातील पिण्याच्या पाण्याची सोडवणूक करण्यासाठी चणकापूर धरणातून ४०० दशलक्ष घनफूट पाण्याचे आवर्तन सोडण्याचा आदेश जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी दिल्याने कसमादे पट्ट्यातील गिरणा काठाला दिलासा मिळाला आहे. आज सकाळी ६ वाजता हजार क्यूसेकने पाणी गिरणा नदीपात्रात विसर्ग करण्यात आला. त्यामुळे गिरणा नदीपात्रातील व काठावरील पाणीपुरवठा योजनेला नवसंजीवनी मिळणार आहे.

ठळक मुद्देदिलासा : चणकापूर धरणातून दहा दिवसांसाठी आवर्तन

कळवण : कसमादे पट्ट्यातील पिण्याच्या पाण्याची सोडवणूक करण्यासाठी चणकापूर धरणातून ४०० दशलक्ष घनफूट पाण्याचे आवर्तन सोडण्याचा आदेश जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी दिल्याने कसमादे पट्ट्यातील गिरणा काठाला दिलासा मिळाला आहे. आज सकाळी ६ वाजता हजार क्यूसेकने पाणी गिरणा नदीपात्रात विसर्ग करण्यात आला. त्यामुळे गिरणा नदीपात्रातील व काठावरील पाणीपुरवठा योजनेला नवसंजीवनी मिळणार आहे.दि. १६ ते २६ नोव्हेंबरदरम्यान चणकापूर धरणातून ४०० दशलक्ष घनफूट पाणी बिगर सिंचनासाठी सोडण्यात आले असून, चणकापूर धरणाचे आवर्तन सुटल्याने गिरणाकाठावरील गावांना जाणवणारी पाणीटंचाई काहीअंशी कमी होणार आहे. गिरणाकाठच्या गावांना पाणीटंचाई जाणवत असल्याने सातत्याने पाणी सोडण्याबाबत देवळ्याचे आमदार डॉ. राहुल अहेर, बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार या लोकप्रतिनिधींनी जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले होते. जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी तालुक्यातील ग्रामपंचायतींचे ठराव करून जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांना सादर करून पाणी सोडण्याची मागणी केली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाने पाटबंधारे विभागाला पाणी सोडण्याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मालेगाव पाटबंधारे विभागाने दि. १ नोव्हेंबर रोजी पाणीटंचाई संदर्भातील सकारात्मक अहवाल जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांना सादर केल्याने पाणी सोडण्याचे आदेश मालेगाव पाटबंधारे विभागाला दिले.(पान ३ वर)चणकापूर धरणातून कळवण नगरपंचायतीसह दाभाडीतील १२ गावे, लखमापूर, ब्राह्मणगाव, लोहोणेर, ठेगोंडा, सटाणा नगर परिषद, देवळा ग्रामीण पाणीपुरवठा योजना व इतर पाणीपुरवठा योजनांसाठी दहा दिवसांच्या कालावधीत ४०० दशलक्ष घनफूट पाणी बिगर सिंचन आवर्तनासाठी सोडण्यात आले असून, सकाळी सहा वाजता पाणी सोडण्यात आले.मालेगाव लघुपाटबंधारे विभागाने प्रथम पाणीपट्टी भरून पाणी सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले असून, दहा दिवसांच्या आवर्तन काळात पाणीपुरवठा योजना चालू ठेवून नागरिकांची पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण होणार नाही याची खबरदारी घेण्याबाबत आदेशदेखील जिल्हाधिकारी यांनी दिलेले आहेत. पाणी आरक्षण केलेल्या सर्व गावांना पाणी पोहोचेल याची दक्षता मालेगाव पाटबंधारे विभागाने घ्यायची असून, कळवण, देवळा, बागलाण व मालेगाव तालुक्यातील अनधिकृत पाणी उपसा करणाऱ्या विद्युत पंपाचा वीजपुरवठा खंडित करण्याबाबत मालेगाव पाटबंधारे विभागाशी संपर्क साधून कार्यवाही करण्याची सूचना महावितरणचे कळवण, मालेगाव, बागलाण व देवळा येथील यंत्रणेला करण्यात आली आहे.पाण्याच्या सिंचनासाठी अनधिकृत उपसा होणार नाही याकरिता मालेगाव पाटबंधारे विभागाशी संपर्क साधून कार्यवाही करावी व साठवण तलावातून अनधिकृत पाणी उपसा होणार नाही यासाठी सुरक्षारक्षक नेमणूक करण्याची सूचना जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी कळवण नगरपंचायत व सटाणा नगर परिषदेला केली आहे. मालेगाव पाटबंधारे विभाग, महावितरण व नगरपंचायत, नगर परिषद यांच्या मागणीनुसार आवर्तन काळात आवश्यकतेनुसार पोलीस बंदोबस्त तैनात करण्याची सूचना पोलीस अधीक्षक डॉ. संदीप दराडे यांना जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी केली आहे.शेतकरी बांधवांमध्ये समाधानजनतेच्या मागणीची दखल घेऊन ४०० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याचा निर्णय मालेगाव पाटबंधारे विभागाच्या सकारात्मक अहवालानंतर जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी घेतल्यामुळे कसमादे पट्ट्यातील शेतकरी बांधवांना दिलासा मिळाला आहे. कळवण, नवी बेज, जुनी बेज, पाळे, अभोणा, नाकोडे, मानूर, पाटविहीर, पाळे, वाडी, कळमथे, पिळकोस, सावकी, दह्याणे, गोसराणे आदी तालुक्यांतील ग्रामपंचायतींनी ग्रामसभेचे ठराव करून चणकापूर धरणातून पाणी सोडण्याची मागणी केली होती.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी