शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिल्याने लोकसभा निवडणुकीत विजय -गिरीश महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 3:33 PM

देशाच्या सीमा सुरक्षीत कशा राहतील याची मतदारांना काळजी होती. अशा परिस्थितीत केंद्र सरकाने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. त्यामुळे देशातील जनतेला देशाच्या सुरक्षेविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारविषयी विश्वास निर्माण झाल्यामुळे लोकसभा निवडणुकीत मतदारांनी भरभरून प्रतिदाद देत 303 जागांवर भाजपाचे खासदार निवडून दिल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन म्हणाले.

ठळक मुद्दे काँग्रेसचे 50 आमदारही निवडून येणार नाहीपालकमंत्री गिरिश महाजन यांचे भाकित नाशिकमध्ये भाजपा महिला मोर्चा कार्यकारणीला मार्गदर्शन

नाशिक - देशाच्या सीमा सुरक्षीत कशा राहतील याची मतदारांना काळजी होती. अशा परिस्थितीत केंद्र सरकाने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. त्यामुळे देशातील जनतेला देशाच्या सुरक्षेविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारविषयी विश्वास निर्माण झाल्यामुळे लोकसभा निवडणुकीत मतदारांनी भरभरून प्रतिदाद देत 303 जागांवर भाजपाचे खासदार निवडून दिल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन म्हणाले.नाशिकमध्ये भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या दोन दिवसीय प्रदेश कार्यकारणीच्या  समारोप सोहळ्यात मार्गदर्शन करताना ते बोलेत होते. देशात 303 जागा मिळतील असे आम्हाला ही वाटले नव्हते, परंतु यावेळी केवळ लाट नव्हती, तर सुनामी होती, गेल्या पाच वर्षात सरकारने केलेल्या कामाची पावती मतदारांनी दिली. आता  राज्यातही  मुख्यमंत्री यांचीच हवा आहे. सरकारने पारदर्शक काम केले, अनेक प्रश्न चुटकी सरशी सम्पविले,  50 वर्षात निघाले नाही एवढे मोर्चे निघाले, मराठा आंदोलन सह अनेक मोर्चे निघाले, त्यासर्वांवर सरकारने तोडगा काढला. आरक्षणाविषयी  कोर्टाने निर्णय दिल्याने विरोधकांचे तोंड बंद झाल्याचेही महाजन म्हणाले,  विरोधकांवर टिका करताना त्यांनी काँग्रेसचे राज्यात 50 आमदाराही निवडून येणार नसल्याचे सांगितले. लोकसभेत राहुल गांधी यांच्या विरोधातील जागा जिंकली.  मात्र बारामती मध्ये थोडे कमी पडलो असलो तरी अनेक दिग्गजांना नेस्तनाबूद केले. माजी मुख्यमंत्री त्यांच्या मुलांना पराभूत केले. अजित पवार, नारायण राणे यांच्या मुलांचा पराभव केला, तर  अशोक चव्हाण, सुशील कुमार शिंदे यांनाही पराभवाचा सामना करावा लागल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. लोकसभेत  काँग्रेस मुक्त महाराष्ट्र अभियाने यशस्वी झाले आहे.काँग्रेसची केवळ  एक जागा राज्यात आली.  नाही तर सम्पूर्ण राज्य  काँग्रेस मुक्त झाले असते. त्याचप्रमामे राष्ट्रवादी काँग्रेसचीही अवस्था बिकट असून काँग्रेसच्या तिन नेत्यांचे तोंड तीन दिशेला आहे. त्यांचा विरोधीपक्षनेताच आपल्याकडे आला असून  अडून अनेकजण येण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेसमध्ये राहायला कोणीही तयार नसून पक्षाध्यक्ष पद सांभाळण्यासही कोणीही समोर येत नसल्याची टिकाही गिरीश महाजन यांनी केली त्यांनी केली. 

परिश्रम केल्या शिवाय संधी नाहीभाजपाच्या महिला मोर्चा पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पदाधिकऱ्यांनी, लोकप्रतिनिधींनी लोकांच्या सूख दुःखात सहभागी होण्याचे आवाहन केले. लोकांसाठी काम करताना जमिनीवर राहून काम करा. पक्षात परिश्रम केल्याशिवाय कोणालाही संधी मिळणाल नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिकBJPभाजपाWomenमहिलाGirish Mahajanगिरीश महाजनcongressकाँग्रेस