शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिल्याने लोकसभा निवडणुकीत विजय -गिरीश महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 15:36 IST

देशाच्या सीमा सुरक्षीत कशा राहतील याची मतदारांना काळजी होती. अशा परिस्थितीत केंद्र सरकाने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. त्यामुळे देशातील जनतेला देशाच्या सुरक्षेविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारविषयी विश्वास निर्माण झाल्यामुळे लोकसभा निवडणुकीत मतदारांनी भरभरून प्रतिदाद देत 303 जागांवर भाजपाचे खासदार निवडून दिल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन म्हणाले.

ठळक मुद्दे काँग्रेसचे 50 आमदारही निवडून येणार नाहीपालकमंत्री गिरिश महाजन यांचे भाकित नाशिकमध्ये भाजपा महिला मोर्चा कार्यकारणीला मार्गदर्शन

नाशिक - देशाच्या सीमा सुरक्षीत कशा राहतील याची मतदारांना काळजी होती. अशा परिस्थितीत केंद्र सरकाने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. त्यामुळे देशातील जनतेला देशाच्या सुरक्षेविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारविषयी विश्वास निर्माण झाल्यामुळे लोकसभा निवडणुकीत मतदारांनी भरभरून प्रतिदाद देत 303 जागांवर भाजपाचे खासदार निवडून दिल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन म्हणाले.नाशिकमध्ये भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या दोन दिवसीय प्रदेश कार्यकारणीच्या  समारोप सोहळ्यात मार्गदर्शन करताना ते बोलेत होते. देशात 303 जागा मिळतील असे आम्हाला ही वाटले नव्हते, परंतु यावेळी केवळ लाट नव्हती, तर सुनामी होती, गेल्या पाच वर्षात सरकारने केलेल्या कामाची पावती मतदारांनी दिली. आता  राज्यातही  मुख्यमंत्री यांचीच हवा आहे. सरकारने पारदर्शक काम केले, अनेक प्रश्न चुटकी सरशी सम्पविले,  50 वर्षात निघाले नाही एवढे मोर्चे निघाले, मराठा आंदोलन सह अनेक मोर्चे निघाले, त्यासर्वांवर सरकारने तोडगा काढला. आरक्षणाविषयी  कोर्टाने निर्णय दिल्याने विरोधकांचे तोंड बंद झाल्याचेही महाजन म्हणाले,  विरोधकांवर टिका करताना त्यांनी काँग्रेसचे राज्यात 50 आमदाराही निवडून येणार नसल्याचे सांगितले. लोकसभेत राहुल गांधी यांच्या विरोधातील जागा जिंकली.  मात्र बारामती मध्ये थोडे कमी पडलो असलो तरी अनेक दिग्गजांना नेस्तनाबूद केले. माजी मुख्यमंत्री त्यांच्या मुलांना पराभूत केले. अजित पवार, नारायण राणे यांच्या मुलांचा पराभव केला, तर  अशोक चव्हाण, सुशील कुमार शिंदे यांनाही पराभवाचा सामना करावा लागल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. लोकसभेत  काँग्रेस मुक्त महाराष्ट्र अभियाने यशस्वी झाले आहे.काँग्रेसची केवळ  एक जागा राज्यात आली.  नाही तर सम्पूर्ण राज्य  काँग्रेस मुक्त झाले असते. त्याचप्रमामे राष्ट्रवादी काँग्रेसचीही अवस्था बिकट असून काँग्रेसच्या तिन नेत्यांचे तोंड तीन दिशेला आहे. त्यांचा विरोधीपक्षनेताच आपल्याकडे आला असून  अडून अनेकजण येण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेसमध्ये राहायला कोणीही तयार नसून पक्षाध्यक्ष पद सांभाळण्यासही कोणीही समोर येत नसल्याची टिकाही गिरीश महाजन यांनी केली त्यांनी केली. 

परिश्रम केल्या शिवाय संधी नाहीभाजपाच्या महिला मोर्चा पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पदाधिकऱ्यांनी, लोकप्रतिनिधींनी लोकांच्या सूख दुःखात सहभागी होण्याचे आवाहन केले. लोकांसाठी काम करताना जमिनीवर राहून काम करा. पक्षात परिश्रम केल्याशिवाय कोणालाही संधी मिळणाल नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिकBJPभाजपाWomenमहिलाGirish Mahajanगिरीश महाजनcongressकाँग्रेस