शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

आदित्यपेक्षा उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावे: रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 01:45 IST

विधानसभा निवडणुकीत महायुती २८८ जागा लढवित असून, त्यापैकी २४० ते २५० जागा निवडून येतील हे निश्चित असले तरी, ज्या पक्षाचे अधिक आमदार निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल, असे ठरलेले असल्याने भाजपचे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील; परंतु ज्या पद्धतीने शिवसेनेचा आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याबाबत प्रचार सुरू आहे ते पाहता, आदित्यपेक्षा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झालेले अधिक चांगले असेल, असे मत केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे राज ठाकरे विरोधी पक्षनेते होणार नाहीत

नाशिक : विधानसभा निवडणुकीत महायुती २८८ जागा लढवित असून, त्यापैकी २४० ते २५० जागा निवडून येतील हे निश्चित असले तरी, ज्या पक्षाचे अधिक आमदार निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल, असे ठरलेले असल्याने भाजपचे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील; परंतु ज्या पद्धतीने शिवसेनेचा आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याबाबत प्रचार सुरू आहे ते पाहता, आदित्यपेक्षा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झालेले अधिक चांगले असेल, असे मत केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केले. राज ठाकरे हे बळ नसलेले नेते असल्यामुळे ते विरोधी पक्षनेते होणार नाहीत, त्यासाठी त्यांनी कॉँग्रेस आघाडीत सामील व्हावे, असा सल्लाही आठवले यांनी दिला.नाशिक येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आलेल्या आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार स्वबळावर निवडून येण्याइतपत पक्षाची ताकद नसल्यामुळे आम्ही महायुतीत सहभागी झालो. त्यात रिपाइंला सहा जागा देण्यात आल्या. एका जागेवर सेनेचा उमेदवार असून, पाच जागा रिपाइं लढत आहे. रिपाइंच्या सर्व उमेदवार कमळाचे चिन्ह घेऊन लढत असले तरी, विधिमंडळात त्यांना स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला दिला असल्याचेही आठवले यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीत पुन्हा युतीचीच सत्ता येणार असल्याचा दावा आठवले यांनी केला असून, आपल्या उमेदवारांनी कमळाचे निवडणूक चिन्ह घेतले म्हणून आपण भाजपामध्ये जाणार असल्याच्या अफवा पसरविल्या जात असल्याचे ते म्हणाले. राज ठाकरे यांनी सक्षम विरोधी पक्षनेते पदासाठी जनतेकडे कौल मागितल्याच्या प्रश्नावर बोलताना आठवले यांनी राज ठाकरे हे बळनसलेले नेते असून, त्यांना कोणत्याही परिस्थितीत विरोधी पक्षनेते पद मिळणार नाही. त्यासाठीत्यांनी कॉँग्रेस आघाडीत सामील व्हावे, असे सांगितले.पवारांवर गुन्हा चुकीचाचईडीने शरद पवार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करणे चुकीचे असून, पवार हे कोणत्याही बॅँकेत संचालक नव्हते. त्यामुळे अर्धवट माहितीच्या आधारे ईडीने गुन्हा दाखल केला असावा, असेही आठवले म्हणाले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Ramdas Athawaleरामदास आठवलेAaditya Thackerayआदित्य ठाकरेShiv Senaशिवसेनाworli-acवरळी