शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "माझ्याकडे ना सायकल, ना घर; जेएमएम, काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचारातून अमाप संपत्ती जमवली"
2
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
3
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
4
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
5
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
6
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
7
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
8
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
9
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
10
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
11
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
12
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
13
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
14
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
15
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
16
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
17
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
18
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
19
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
20
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात

जिल्ह्यातील वीस आदिवासी गावे वनसंवर्धनाच्या वाटेवर

By अझहर शेख | Published: July 28, 2019 12:09 AM

‘हजार हातांनी देणाऱ्या वनांची पुण्याई, वन आहे नद्यांची आई...’ असे म्हटले जाते, मात्र वाढत्या अतिक्रमणांमुळे दिवसेंदिवस वनजमिनीचे क्षेत्र कमी होत चालल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे.

नाशिक : ‘हजार हातांनी देणाऱ्या वनांची पुण्याई, वन आहे नद्यांची आई...’ असे म्हटले जाते, मात्र वाढत्या अतिक्रमणांमुळे दिवसेंदिवस वनजमिनीचे क्षेत्र कमी होत चालल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. नैसर्गिक ऋतूचक्रही बिघडत आहे. याची जाणी ठेवत वनांचे महत्त्व जिल्ह्यातील वीस आदिवासी गावांना पटले असून, वनसंवर्धनासाठी त्यांनी योगदान देण्यास सुरुवात केली आहे. हजारो हेक्टरवर रोपवन विकसित करून उत्तमप्रकारे त्याचे संवर्धन लोकसहभागातून होताना दिसत आहे. परिणामी जिल्ह्यातील विविध गावे दरवर्षी संत तुकाराम वनग्राम योजनेत बक्षीसपात्र ठरत आहेत.नैसर्गिक राखीव वनक्षेत्र किंवा रोपवनातील वृक्षसंपदा असो, त्यांचे संरक्षण व संवर्धन महत्त्वाचे आहे. वने टिकली तर परिसरात पर्जन्यमानाचे प्रमाणही टिकून राहण्यास मदत होते. आदिवासी गावकऱ्यांनाही वनांचे महत्त्व पटले असून, वनविभागाने स्थापन केलेल्या संयुक्त वनव्यवस्थापन समितींच्या माध्यमातून गावकºयांनी एकत्र येत वनजमिनींवर होणारे अतिक्रमण रोखण्यासह वनक्षेत्रात चराई व कुºहाडबंदीचा निर्णय घेतला.वनविभाग पूर्व, पश्चिम भागातील ननाशी, त्र्यंबकेश्वर, कळवण, सुरगाणा, उंबरठाण, दिंडोरी या वनपरिक्षेत्रातील सुमारे वीस गावांनी नैसर्गिक जंगलाचे संरक्षण करण्याबरोबरच नव्याने वृक्षलागवडीवरही भर दिला आहे. जल मृदसंधारणाची कामे यशस्वीरीत्या पूर्ण केल्याने परिसरातील भूजल पातळीत वाढ होऊ लागली. त्यामुळे बागायती पिकांचे उत्पादन आदिवासी शेतकºयांना घेणे शक्य होत आहे.जंगलात समतल चर खोदून पाणी अडविल्याने वनतळ्यांत मे महिन्यापर्यंत पुरेल असा पाणीसाठा वन्यजिवांना उपलब्ध झाला. जंगल संवर्धनातून गावांचा शाश्वत विकासाचा प्रयत्न केला जात आहे.वनसंवर्धनाच्या माध्यमातून गाव, पाड्यांचा शाश्वत विकास साधण्याचा प्रयत्न वनविभाग लोकसहभागातून करत आहे. पूर्व भागातील सुरगाणा ते कळवण वनपरिक्षेत्रातील बहुतांश गावे स्वयंस्फूर्तीने पुढे आली आहे. त्यामुळे भविष्यात पुन्हा या भागात जंगलांची घनता वाढलेली दिसून येईल. त्याचा फायदा गावकºयांनाही निश्चित स्वरूपात होणार आहे.- तुषार चव्हाण, उपवनसंरक्षक, नाशिक पूर्वगाव, पाड्यांनी जंगले राखली त्याचा सर्व फायदा शासनआदेशानुसार त्याच गावांना मिळवून देण्यासाठी वनविभाग प्रयत्नशील आहे. निंबारपाड्यावर आदिवासींनी जपलेला बांबू वनविभागाने विक्री करून मिळालेला मोबादला संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी खर्च करण्यावर भर दिला जाणार आहे.- सुजित नेवसे, सहायक वनसंरक्षकगवळीपाड्यात लोकसहभागातून वनजमिनींवरील अतिक्रमणे काढण्यात आली. साग फुटव्यांचे संरक्षण करून त्याचे जंगलात रूपांतर झाले. ठिकठिकाणी रोपवन करून ते गावकºयांनी सांभाळले. त्यामुळे संत तुकाराम वनग्राम योजनेत गवळीपाडा जिल्ह्यात प्रथम तर राज्यात द्वितीय क्रमांक मिळवू शकला. पश्चिम भागामधील विविध वनपरिक्षेत्रात अशा पद्धतीने लोकसहभागातून वनविकास आणि निसर्ग संवर्धन केले जात आहे.- रवींद्र भोगे, वनपरिक्षेत्र अधिकारी, पश्चिम भाग, नाशिकअसे केले निसर्गसंवर्धन जंगल राखण्यासाठी स्वयंस्फूर्तीने पुढाकार दरवर्षी हजारो रोपांची लागवड अन् संवर्धन जंगल परिसरात समतल चर खोदून पाणी अडविले. वनतळे, बंधारे, दगडी नाले बांधून जलमृदा संधारणाची कामे प्राधान्याने केली. जंगलात होणारी घुसखोरी थांबविली. चराई व कुºहाडबंदीचा निर्णय एकत्रित घेत अमलात आणला.या गावांनी घेतली आघाडी पूर्व भाग : सुरगाणा वनपरिक्षेत्र : गोंदुणे, देवगाव, निंबारपाडा, त्रिभुवन. कनाशी वनपरिक्षेत्र : शेपूपाडा, कोसवन. दिंडोरी वनपरिक्षेत्र : भातोडा. कळवण वनपरिक्षेत्र : इन्शी. चांदवड वनपरिक्षेत्र : कानडगाव पश्चिम भाग : ननाशी वनपरिक्षेत्र - गवळीपाडा (महाजे), शृंगारपाडा, चिमणपाडा, झारली, धोंडापाडा त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्र : काचुर्ली, श्रीघाट, टाके देवगाव, कळमुस्ते, हर्षेवाडी.

टॅग्स :forestजंगलforest departmentवनविभाग