शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
3
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
4
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
5
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
6
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
7
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
8
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
9
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
10
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
11
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
12
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
13
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
14
किशोरवयीन मुलांमध्ये जाणवते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता; अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका
15
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
16
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
17
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
18
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
19
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
20
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश

आरोग्य, पाणी पुरवठा विभागाच्या बदल्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 19:20 IST

जिलहा परिषदेच्या आरोग्य व ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील कर्मचा-यांच्या बदली प्रक्रियेत बिगर आदिवासी भागातून आदिवासी भागात बदली केल्यास मोठा असमतोल निर्माण होत असल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा करुन या दोन्ही विभागांच्या बदल्या न करण्याचा प्रशासकीय निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देअसमतोल टळला : प्रशासनाकडून ऐनवेळी निर्णय

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांची रिक्त पदे व पेसा क्षेत्रात शंभर टक्के अनुशेष भरण्याची शासनाची असलेली सक्ती पाहता, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्यास व्यवस्थापन कोलमडण्याची भिती व्यक्त करून शासनाने बदल्या करण्याची सक्ती न करण्याची भूमिका प्रशासन व पदाधिका-यांनी घेवून मंगळवारी आरोग्य व पाणी पुरवठा विभागातील कर्मचा-यांच्या बदल्या ऐनवेळी रद्द केल्या आहेत. अशा बदल्यांमुळे बिगर आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात असमतोल निर्माण होवून कामकाज ठप्प होण्याची शक्यता असल्यामुळेच बदल्या शासनाच्या संमतीने बदल्या रद्द करण्यात आल्या असून, अन्य विभागात देखील अशाच प्रकारे असमतोल निर्माण झाल्यास त्या बदल्यांचे देखील आदेश निर्गमीत करण्यात येणार नसल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी सांगितले.

जिलहा परिषदेच्या आरोग्य व ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील कर्मचा-यांच्या बदली प्रक्रियेत बिगर आदिवासी भागातून आदिवासी भागात बदली केल्यास मोठा असमतोल निर्माण होत असल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा करुन या दोन्ही विभागांच्या बदल्या न करण्याचा प्रशासकीय निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषद अंतर्गत २८ मे पासुन विविध विभागामधील बदली पात्र कर्मचा-यांसाठी बदली प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मंगळवारी आरोग्य विभागातील कर्मचा-यांसाठी बदली प्रक्रिया राबविण्यात येणार होती. मात्र बदली प्रक्रिया केल्यास बिगर आदिवासी भागातील आरोग्य सेवा विस्कळीत होणार असल्याने प्रशासनाने बदल्या न करण्याचा निर्णय घेतला. आरोग्य विभागांतर्गत बिगर आदिवासी क्षेत्रासाठी ११४६ पदे मंजुर आहेत. त्यापैकी ४७१ पदे भरलेले असून तब्बल ८२० पदे रिक्त आहेत. आदिवासी क्षेत्रात ९७७ पदे मंजुर असून ७४९ पदे भरण्यात आलेली आहेत. तर २२८ पदे रिक्त आहेत. शासनाच्या निर्देशानुसार आदिवासी क्षेत्रातील १०० टक्के पदे भरणे बंधनकारक आहे. मात्र अशा परिस्थितीत बदली प्रक्रिया राबविल्यास आदिवासी भागातील पदे भरली जातील मात्र बिगर आदिवासी भागातील पदे मोठया संख्येने रिक्त होणार आहेत. त्यामुळे याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा करुन बदली प्रक्रिया रदद करण्याचा निर्णय घेण्यात आला.ग्रामीण पाणी पुरवठा विभागात देखील आठच कनिष्ठ अभियंत्यांची पदे मंजुर असून, बदल्या केल्यास त्यातील दोन पदे बिगर आदिवासी भागात वर्ग करावे लागतील, त्यामुळे संपुर्ण जिल्ह्यासाठी अवघे सहा पदे असतील. तसे झाल्यास व्यवस्थेवर ताण पडेल. सध्या जिल्हयात दुष्काळी परिस्थिती व पाणी टंचाई असल्याने या विभागातील बदल्याही थांबविण्यात आल्या आहेत.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद