शहरं
Join us  
Trending Stories
1
शतकातील सर्वात दीर्घ सूर्यग्रहण, ६ मिनिटे २३ सेकंदांपर्यंत परसेल अंधकारा, कोण कोणत्या देशांत दिसणार? भारतात कुठे-कुठे दिसणार? जाणून घ्या
2
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
3
इंडिगोच्या ७० हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द! क्रूच्या कमतरतेमुळे मुंबई, पुणे, नागपूरसह देशभरातील हजारो प्रवासी हैराण
4
'मी खोटे काम केलं नाही!' छत्रपती संभाजीनगरची बोगस 'IAS' कल्पना भागवत अखेर 'बोलली'...
5
₹६७००००० चं टॉयलेट, ₹७६००० चा ब्रश अन्... किती श्रीमंत आहेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन? रहस्यमय आहे संपत्ती!
6
MS धोनीचा लाडका, वर्ल्डकपही खेळला; पण नंतर १० वर्ष संघाबाहेर बसला... अखेर क्रिकेटला रामराम
7
पुतिन यांच्या भारत दौऱ्यामुळे शेअर बाजारात खळबळ, 'हे' शेअर्स फोकसमध्ये राहणार...
8
Team India's New Jersey For T20 World Cup 2026: रोहितनं दाखवली टीम इंडियाची नवी जर्सी; कॉलरवरील तिरंगा चर्चेत!
9
मोठी बातमी! बिजापूरमध्ये भीषण चकमक; 7 नक्षलवादी ठार, तर 2 जवान शहीद
10
सायको काकी! सुंदर मुलांचा काटा काढायची अन् पार्टी करायची, स्वत:च्या मुलालाही सोडलं नाही
11
India's Squad For T20I vs SA: टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा! हार्दिक पांड्यासह गिलचं कमबॅक!
12
एलॉन मस्कची धडकी भरवणारी भविष्यवाणी, म्हणाला- येत्या काळात महायुद्ध अटळ! २०३० पर्यंत...
13
हाहाकार! जमिनीतून अचानक विषारी गॅस बाहेर पडू लागला; धनबादमध्ये मुलाचा मृत्यू, शेकडो पक्षी दगावले
14
फोनचा पासवर्ड विसरलात? सर्व्हिस सेंटरला जायची गरज नाही; 'अशा' प्रकारे ५ मिनिटांत घरबसल्या करू शकता अनलॉक!
15
गुरुनिष्ठेचा आदर्श, रामदास स्वामींचे दर्शन; संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे श्रीधर स्वामी!
16
चमत्कार! कडाक्याच्या थंडीत निर्दयी आईने रस्त्यावर फेकलं, भटक्या कुत्र्यांनी नवजात बाळाला वाचवलं
17
"भारताचे तुकडे झाले, तरच...!"; बांगलादेशच्या माजी लष्करी अधिकाऱ्याचे विषारी फुत्कार, कोण आहेत अब्दुल्लाहिल अमान आजमी?
18
Virat Kohli Century : किंग कोहलीचा 'शतकी रोमान्स'! रायपूरच्या मैदानातही विक्रमांची 'बरसात'
19
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ‘असे’ करा पूजन; पाहा, शुभ मुहूर्त, सोपा विधी अन् काही मान्यता!
20
मोठी उलथापालथ! ओला इलेक्ट्रीक रसातळाला पोहोचली; नोव्हेंबरच्या रेसमध्ये बाहेर फेकली गेली 
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य, पाणी पुरवठा विभागाच्या बदल्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 19:20 IST

जिलहा परिषदेच्या आरोग्य व ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील कर्मचा-यांच्या बदली प्रक्रियेत बिगर आदिवासी भागातून आदिवासी भागात बदली केल्यास मोठा असमतोल निर्माण होत असल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा करुन या दोन्ही विभागांच्या बदल्या न करण्याचा प्रशासकीय निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देअसमतोल टळला : प्रशासनाकडून ऐनवेळी निर्णय

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांची रिक्त पदे व पेसा क्षेत्रात शंभर टक्के अनुशेष भरण्याची शासनाची असलेली सक्ती पाहता, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्यास व्यवस्थापन कोलमडण्याची भिती व्यक्त करून शासनाने बदल्या करण्याची सक्ती न करण्याची भूमिका प्रशासन व पदाधिका-यांनी घेवून मंगळवारी आरोग्य व पाणी पुरवठा विभागातील कर्मचा-यांच्या बदल्या ऐनवेळी रद्द केल्या आहेत. अशा बदल्यांमुळे बिगर आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात असमतोल निर्माण होवून कामकाज ठप्प होण्याची शक्यता असल्यामुळेच बदल्या शासनाच्या संमतीने बदल्या रद्द करण्यात आल्या असून, अन्य विभागात देखील अशाच प्रकारे असमतोल निर्माण झाल्यास त्या बदल्यांचे देखील आदेश निर्गमीत करण्यात येणार नसल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी सांगितले.

जिलहा परिषदेच्या आरोग्य व ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील कर्मचा-यांच्या बदली प्रक्रियेत बिगर आदिवासी भागातून आदिवासी भागात बदली केल्यास मोठा असमतोल निर्माण होत असल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा करुन या दोन्ही विभागांच्या बदल्या न करण्याचा प्रशासकीय निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषद अंतर्गत २८ मे पासुन विविध विभागामधील बदली पात्र कर्मचा-यांसाठी बदली प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मंगळवारी आरोग्य विभागातील कर्मचा-यांसाठी बदली प्रक्रिया राबविण्यात येणार होती. मात्र बदली प्रक्रिया केल्यास बिगर आदिवासी भागातील आरोग्य सेवा विस्कळीत होणार असल्याने प्रशासनाने बदल्या न करण्याचा निर्णय घेतला. आरोग्य विभागांतर्गत बिगर आदिवासी क्षेत्रासाठी ११४६ पदे मंजुर आहेत. त्यापैकी ४७१ पदे भरलेले असून तब्बल ८२० पदे रिक्त आहेत. आदिवासी क्षेत्रात ९७७ पदे मंजुर असून ७४९ पदे भरण्यात आलेली आहेत. तर २२८ पदे रिक्त आहेत. शासनाच्या निर्देशानुसार आदिवासी क्षेत्रातील १०० टक्के पदे भरणे बंधनकारक आहे. मात्र अशा परिस्थितीत बदली प्रक्रिया राबविल्यास आदिवासी भागातील पदे भरली जातील मात्र बिगर आदिवासी भागातील पदे मोठया संख्येने रिक्त होणार आहेत. त्यामुळे याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा करुन बदली प्रक्रिया रदद करण्याचा निर्णय घेण्यात आला.ग्रामीण पाणी पुरवठा विभागात देखील आठच कनिष्ठ अभियंत्यांची पदे मंजुर असून, बदल्या केल्यास त्यातील दोन पदे बिगर आदिवासी भागात वर्ग करावे लागतील, त्यामुळे संपुर्ण जिल्ह्यासाठी अवघे सहा पदे असतील. तसे झाल्यास व्यवस्थेवर ताण पडेल. सध्या जिल्हयात दुष्काळी परिस्थिती व पाणी टंचाई असल्याने या विभागातील बदल्याही थांबविण्यात आल्या आहेत.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद