शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

वाहतुकीची कोंडी होईल सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 00:50 IST

यू-टर्न काम पूर्ण झाल्याने लोकार्पण सोहळ्यापूर्वीच वाहतूक सुरू झाली असून, जॉगिंग ट्रॅकसमोरील बोगद्यातील वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

इंदिरानगर : यू-टर्न काम पूर्ण झाल्याने लोकार्पण सोहळ्यापूर्वीच वाहतूक सुरू झाली असून, जॉगिंग ट्रॅकसमोरील बोगद्यातील वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.  इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकसमोरील बोगद्यात होणारी वाहतूक कोंडी काढण्यासाठी पेठेनगरसमोर उड्डाणपुलाच्या खाली यू-टर्न मंजूर करूनही त्याचे काम सुरू करण्यास विलंब होत असल्याने वाहतुकीची कोंडी कायम आहे़ या कामाला विरोध हाणून पाडण्यासाठी पोलीस बंदोबस्तात काम सुरू करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती. अखेर सुमारे सहा महिन्यांपूर्वी यू-टर्न काम सुरू करून ते पूर्ण झाल्याने निवडणुकीची आचारसंहिता असल्याने लोकार्पण पूर्वीच वाहनधारकांनी वाहतूक सुरू केली आहे.इंदिरानगर बोगद्यातील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी अनेक वेळेस विविध उपाययोजना करण्यात आल्या, परंतु बोगद्यातील वाहतूक कोंडी कमी झाली नाही त्यात दिवस भर पडत आहे. त्यामुळे दिवसभरात अनेक वेळेस वाहनधारकांना वाहतूक कोंडी समोर जावे लागते. याची दखल घेत पेठेनगरसमोर सुमारे पावणेदोन वर्षांपूर्वीची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या यू-टर्नचे काम हाती घेतले होते. कामाची सुरुवात करण्यात आली होती. परंतु स्थानिक एका नगरसेवकांनी विरोध केल्याने काम थांबविण्यात आले होते.  तत्कालीन पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी पेठेनगरसमोरील यू-टर्न जागेची पाहणी करून तातडीने काम सुरू करण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. सुमारे सहा महिने सदर काम पूर्ण करण्यात आले असून, वाहनधारकांनी वाहतूक सुरू केली आहे. त्यामुळे आता बोगद्यातील वाहतुकीची कोंडी कमी होती की नाही याकडे लक्ष लागून आहे.अपघातानंतर काम सुरूसुमारे पाच महिन्यांपूर्वी सुंदरबन कॉलनीकडून कमोदनगरकडे उड्डाणपूल ओलांडत असताना झालेल्या अपघातात मायलेकांनी जीव गमावला होता. यावेळी संतप्त महिला व नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन भुयारी मार्गाचे कामाचा शुभारंभ करण्यात आला होता.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीNashikनाशिक