शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

‘हीच वेळ आहे...’ : गेल्या वर्षी जिल्ह्यात आढळले २ हजार ९४८ क्षयरोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 18:07 IST

यावर्षी जागतिक क्षयरोग दिनाचे घोषवाक्य ‘‘हीच वेळ आहे’’ असे निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये क्षयरोग निर्मूलनाचे, क्षयमुक्त जगण्यासाठी, सर्व क्षयबाधितांपर्यंत पोहचण्याची, तुम्ही क्षयबाधित आहात का? हे तपासण्यची, सर्व वैद्यकिय व्यावसायिकांपर्यंत पोहचण्याची ‘हीच वेळ आहे’.

ठळक मुद्दे१९५२सालापासून बी.सी.जी लसीचा उपयोग‘टी.बी’ नोटीफाईड आजार

नाशिक : जिल्ह्यातून क्षयरोग हद्दपार करण्यासाठी शासकिय यंत्रण झटत असली तरी, अद्याप यंत्रणेला फारसे यश आलेले नाही. २०१८ साली जिल्ह्यात २ हजार ९४८ क्षयरोगी आढळून आले होते. त्यापैकी २८ रुग्ण दगावले तर ९५ टक्के रुग्णांना उपचाराखाली आणण्यास यश आल्याचा दावा जिल्हा क्षयरोग कार्यालयाकडून करण्यात आला आहे.रॉबर्ट कोच यांनी २४ मार्च १८८२साली क्षयरोगाचा शोध लावला. मायकोबॅक्टरियम ट्युबरक्युलॉसिस नावाच्या जीवाणुमळे क्षयरोगाची लागण होते. हा आजार मुख्यत: हवेमार्फत पसरतो, असा निष्कर्ष कोच यांनी संशोधनातून लावला होता. त्यामुळे २४ मार्च हा जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो. १९५२सालापासून बी.सी.जी लसीचा उपयोग देशात केला जाऊ लागला. क्षयरोगाच्या रुग्णांचे नवीन व पुर्नउपचार घेणारे असे दोन प्रकारांमध्ये वर्गीकरण केले गेले.जिल्ह्यातील ग्रामीण भागात ४५ लाख लोकसंख्येसाठी सुधारित राष्टÑीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम जिल्हा क्षयरोग नियंत्रण सोसायटीमार्फत हाती घेण्यात आला आहे. या अभियानांतर्गत १६ क्षयरोग पथके, ७० मान्यताप्राप्त सुक्ष्मदर्शक केंद्र व १३८ शासकिय तथा अशासकीय आरोग्य संस्थाच्या सहकार्याने मोहीम राबविली जात आहे. जिल्ह्यात आढळून रुग्णांपैकी १हजार ५११ रूग्ण थुंकी दुषित क्षयरोगाचे तर ५७१ रु ग्ण थुंकी अदूषित क्षयरोगी आहेत. तसेच ३५८ रूग्ण हे पुनर्उपचार घेणारे व ५०८ अन्य अवयवांचे रुग्ण असल्याची माहिती जिल्हा क्षयरोग केंद्राकडून प्राप्त झाली आहे.‘‘हीच वेळ आहे’’यावर्षी जागतिक क्षयरोग दिनाचे घोषवाक्य ‘‘हीच वेळ आहे’’ असे निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये क्षयरोग निर्मूलनाचे, क्षयमुक्त जगण्यासाठी, सर्व क्षयबाधितांपर्यंत पोहचण्याची, तुम्ही क्षयबाधित आहात का? हे तपासण्यची, सर्व वैद्यकिय व्यावसायिकांपर्यंत पोहचण्याची ‘हीच वेळ आहे’.अशी आहेत क्षयरोगाची लक्षणेदोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ खोकला येणेसंध्याकाळी हलकासा ताप दररोज येणेभूक मंदावणे, वजन कमी होणेथुंकीतून रक्त पडणेछातीत वेदना होणेअशक्तपणा जाणवणे आणि रात्री घाम येणे.‘टी.बी’ नोटीफाईड आजारभारत सरकारने क्षयरोग (टी.बी) हा आजार ‘नोटीफायबल’ म्हणून घोषित केला आहे. त्यामुळे शासकीय अध्यादेशानूसार सर्व खासगी वैद्यकिय व्यावसायिकांना त्यांच्याकडून निदान करण्यात आलेल्या तसेच उपचार करत असलेल्या या आजाराच्या रूग्णांची माहिती जिल्हा क्षयरोग केंद्राला विहित नमुन्यात देणे बंधनकारक आहे.

टॅग्स :Healthआरोग्यNashikनाशिक