शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
3
२० क्विंटल स्फोटकांची खरेदी अन् पैशांवरुन वाद; ४ शहरांमध्ये IED हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
4
दिल्ली कार हल्ल्याचा मास्टरमाईंड डॉ. उमर कुणाकडून घेत होता आदेश? धक्कादायक माहिती आली समोर
5
कर्मचाऱ्यांना दररोज ऑफिसला येण्याचा आदेश, ६०० जणांनी राजीनामा दिला; कंपनीला बसला ₹१,५३५ कोटींचा फटका
6
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
7
Groww IPO Listing: Google सारखीच आहे Groww ची कहाणी! एक चूक आणि बनलं ओळखीचं नाव, शेअर बाजारातही केलं अवाक्
8
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
9
'३ इडियट्स'मधील मिलीमीटर पत्नीसोबत दिसला दिल्लीच्या रस्त्यावर, १६ वर्षांनंतर त्याला ओळखणं झालं कठीण
10
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
11
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
12
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
13
वोटचोरीसह सरकार नोकरी चोर निघाले, वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासनाचे काय?: काँग्रेस
14
FREE मध्ये अपडेट होतंय Aadhaar Card, वर्षभरासाठी माफ झाली फी; पाहा कोणाला मिळणार फायदा?
15
"आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."
16
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
17
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
18
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
19
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
20
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र

‘हीच वेळ आहे...’ : गेल्या वर्षी जिल्ह्यात आढळले २ हजार ९४८ क्षयरोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 18:07 IST

यावर्षी जागतिक क्षयरोग दिनाचे घोषवाक्य ‘‘हीच वेळ आहे’’ असे निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये क्षयरोग निर्मूलनाचे, क्षयमुक्त जगण्यासाठी, सर्व क्षयबाधितांपर्यंत पोहचण्याची, तुम्ही क्षयबाधित आहात का? हे तपासण्यची, सर्व वैद्यकिय व्यावसायिकांपर्यंत पोहचण्याची ‘हीच वेळ आहे’.

ठळक मुद्दे१९५२सालापासून बी.सी.जी लसीचा उपयोग‘टी.बी’ नोटीफाईड आजार

नाशिक : जिल्ह्यातून क्षयरोग हद्दपार करण्यासाठी शासकिय यंत्रण झटत असली तरी, अद्याप यंत्रणेला फारसे यश आलेले नाही. २०१८ साली जिल्ह्यात २ हजार ९४८ क्षयरोगी आढळून आले होते. त्यापैकी २८ रुग्ण दगावले तर ९५ टक्के रुग्णांना उपचाराखाली आणण्यास यश आल्याचा दावा जिल्हा क्षयरोग कार्यालयाकडून करण्यात आला आहे.रॉबर्ट कोच यांनी २४ मार्च १८८२साली क्षयरोगाचा शोध लावला. मायकोबॅक्टरियम ट्युबरक्युलॉसिस नावाच्या जीवाणुमळे क्षयरोगाची लागण होते. हा आजार मुख्यत: हवेमार्फत पसरतो, असा निष्कर्ष कोच यांनी संशोधनातून लावला होता. त्यामुळे २४ मार्च हा जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो. १९५२सालापासून बी.सी.जी लसीचा उपयोग देशात केला जाऊ लागला. क्षयरोगाच्या रुग्णांचे नवीन व पुर्नउपचार घेणारे असे दोन प्रकारांमध्ये वर्गीकरण केले गेले.जिल्ह्यातील ग्रामीण भागात ४५ लाख लोकसंख्येसाठी सुधारित राष्टÑीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम जिल्हा क्षयरोग नियंत्रण सोसायटीमार्फत हाती घेण्यात आला आहे. या अभियानांतर्गत १६ क्षयरोग पथके, ७० मान्यताप्राप्त सुक्ष्मदर्शक केंद्र व १३८ शासकिय तथा अशासकीय आरोग्य संस्थाच्या सहकार्याने मोहीम राबविली जात आहे. जिल्ह्यात आढळून रुग्णांपैकी १हजार ५११ रूग्ण थुंकी दुषित क्षयरोगाचे तर ५७१ रु ग्ण थुंकी अदूषित क्षयरोगी आहेत. तसेच ३५८ रूग्ण हे पुनर्उपचार घेणारे व ५०८ अन्य अवयवांचे रुग्ण असल्याची माहिती जिल्हा क्षयरोग केंद्राकडून प्राप्त झाली आहे.‘‘हीच वेळ आहे’’यावर्षी जागतिक क्षयरोग दिनाचे घोषवाक्य ‘‘हीच वेळ आहे’’ असे निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये क्षयरोग निर्मूलनाचे, क्षयमुक्त जगण्यासाठी, सर्व क्षयबाधितांपर्यंत पोहचण्याची, तुम्ही क्षयबाधित आहात का? हे तपासण्यची, सर्व वैद्यकिय व्यावसायिकांपर्यंत पोहचण्याची ‘हीच वेळ आहे’.अशी आहेत क्षयरोगाची लक्षणेदोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ खोकला येणेसंध्याकाळी हलकासा ताप दररोज येणेभूक मंदावणे, वजन कमी होणेथुंकीतून रक्त पडणेछातीत वेदना होणेअशक्तपणा जाणवणे आणि रात्री घाम येणे.‘टी.बी’ नोटीफाईड आजारभारत सरकारने क्षयरोग (टी.बी) हा आजार ‘नोटीफायबल’ म्हणून घोषित केला आहे. त्यामुळे शासकीय अध्यादेशानूसार सर्व खासगी वैद्यकिय व्यावसायिकांना त्यांच्याकडून निदान करण्यात आलेल्या तसेच उपचार करत असलेल्या या आजाराच्या रूग्णांची माहिती जिल्हा क्षयरोग केंद्राला विहित नमुन्यात देणे बंधनकारक आहे.

टॅग्स :Healthआरोग्यNashikनाशिक