शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडीस पाणी सोडण्यास तात्पुरती स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 01:37 IST

: गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाने लावलेल्या तगाद्यानुसार नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून जायकवाडीसाठी पाणी सोडण्याची तयारी अंतिम टप्प्यात आलेली असतानाच या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेच्या सुनावणीत सोमवारी (दि.२९) न्यायालयाने ३१ आॅक्टोबरपर्यंत जायकवाडीसाठी नगर व नाशिक जिल्ह्यास पाणी सोडण्यास स्थगिती दिली आहे.

नाशिक : गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाने लावलेल्या तगाद्यानुसार नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून जायकवाडीसाठी पाणी सोडण्याची तयारी अंतिम टप्प्यात आलेली असतानाच या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेच्या सुनावणीत सोमवारी (दि.२९) न्यायालयाने ३१ आॅक्टोबरपर्यंत जायकवाडीसाठी नगर व नाशिक जिल्ह्यास पाणी सोडण्यास स्थगिती दिली आहे. सायंकाळी न्यायालयाच्या निर्णयाची प्रत जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर पाणी सोडण्यास तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. न्यायालयाच्या निर्णयाने नाशिक जिल्हावासीयांना तात्पुरत्या स्वरुपात दिलासा मिळाला आहे.  समन्यायी पाणीवाटपाच्या महाराष्टÑ जलसंपत्ती अधिनियमातील तरतुदींना आक्षेप घेणारी याचिका पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना व नगर जिल्ह्यातील काही खासगी संस्थांनी सर्वाेच्च न्यायालयात २०१६ मध्ये दाखल केली आहे. त्यावर आजपर्यंत फारशी सुनावणी होऊ शकली नाही. परंतु न्यायालयात अशाच स्वरूपाच्या जवळपास ३६ याचिका दाखल असल्याने सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मदन लोकूर व अब्दुल नजिर यांच्यासमोर सुनावणी झाली. विखे पाटील यांच्या वतीने अ‍ॅड. कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. त्यावर न्यायालयाने पाण्याच्या या प्रश्नाची गंभीरता लक्षात घेता येत्या ३१ आॅक्टोबरपर्यंत ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिले. ३१ आॅक्टोबर रोजी याचिकेवर पुढील सुनावणी घेतली जाणार आहे. न्यायालयाचा हा निर्णय सर्वोच्च न्यायालयातील सरकारी वकील प्रशांत पी. यांनी तत्काळ गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालकांना कळविला. त्यानुसार महामंडळाने सायंकाळी जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांना कार्यवाही स्थगित करण्याबाबत कळविले. तत्पूर्वी महामंडळाकडून आठ दिवसांपासून गंगापूर, दारणा व पालखेड या धरणातून पाणी सोडण्यासाठी दबाब टाकला जात असल्याने पोलीस व पाटबंधारे विभागाने तयारी चालविली होती.तयारी आणि स्थगितीच्सोमवारी (दि.२९) सकाळी जिल्हाधिकाऱ्यांनी जलसंपदा, पोलीस, वीज वितरण कंपनी, प्रांत अधिकारी, तहसीलदारांची बैठक घेतली. त्यात मंगळवारी सकाळी १० वाजता गंगापूर व दारणा धरणातून अनुक्रमे तीन हजार क्यूसेक व पंधरा हजार क्यूसेकने विसर्ग करण्याचे ठरविले. पाणी सोडण्यास होणारा विरोध लक्षात घेता, प्रत्येक धरणावर पोलीस बंदोबस्त, त्याचबरोबर वीज उपकेंद्र, के. टी. वेअर बंधाºयांवरही बंदोबस्त ठेवण्याचे आदेश दिले. नदीपात्राच्या दुतर्फा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असून, साधारणत: अडीच दिवसांत पाणी सोडण्याचे ठरविण्यात आले होते. परंतु त्याला संध्याकाळी स्थगिती देण्यात आली.

टॅग्स :Waterपाणीnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय