शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

अध्यापनापेक्षा इतर कामांचाच शिक्षकांवर अधिक भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:44 IST

नाशिक : जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षकांवर शैैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करण्यापेक्षा अन्य कामांचेच ओझे अधिक आहे. त्याचा परिणाम ...

नाशिक : जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षकांवर शैैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करण्यापेक्षा अन्य कामांचेच ओझे अधिक आहे. त्याचा परिणाम थेट विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत असल्याने खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे पालकांचा कल वाढण्याच्या दिशेने त्याचा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे केवळ शिक्षण आणि अध्यापनावर शिक्षण विभागाने लक्ष केंद्रित करून अन्य कामांसाठी स्वतंत्र यंत्रणा उभी केल्यास शिक्षणाची गुणवत्ता आणखी सुधारण्यास मदत होईल, असा सूर शिक्षक संंघटनांमधून उमटत आहे.

राष्ट्रीय पातळीवर जनगणना आणि निवडणुकीची कामे शिक्षकांनी स्वीकारली आहेत. मात्र, त्याशिवाय बांधकाम, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कामे, अनेक वेळा मतदार पुनर्निरीक्षण, बीएलओ या कामांना शिक्षकांचा विरोध असताना शिक्षकांना त्या कामात जुंपले जाते. या कामामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर, अध्ययन अध्यापनावर परिणाम होतो. मूळ ज्या कामासाठी नियुक्ती आहे, तेच काम जर योग्य पद्धतीने करता येत नसेल तर त्याचा विचार शासनाने करायला हवा. शिक्षकांना काही कामासाठी मानधन मिळते. ते मानधन सुशिक्षित बेरोजगारांना देऊन त्यांच्याकडून ही कामे करून घेतल्यास त्यांनाही लाभ होईल आणि कामाचा बोझाही शिक्षकांवर येणार नाही. अन्यथा त्यासाठी पर्यायी व्यवस्था शासनाने निर्माण करायला पाहिजे, असे शिक्षक संघटनांचे मत आहे.

एक शिक्षकी शाळांचे हाल

जिल्ह्यातील आदिवासी भागात कमी पटाच्या शाळांमध्ये एकच शिक्षक आहे. त्यातच शिक्षकेतर पदे भरण्यावरील बंदी आणि रिक्त पदांमुळे शिक्षकांवर सर्वच वर्गांची जबाबदारी येत असून, दोन शिक्षकी शाळांचीही मोठी संख्या असल्याने एक शिक्षक, शिक्षकेतर कामात अडकून असतो. तेथील विद्यार्थी शिक्षणावर त्याचा परिणाम होत आहे.

शासकीय योजनांचा भार

- शिक्षकांना मतदार यादी, गाव, आरोग्य असे अनेक प्रकारचे सर्व्हे, विविध जनजागृती मोहिमा, जनगणना अशी अनेक कामे करावी लागतात. या कामासाठीच एक शिक्षक पूर्णवेळ लागतो.

- पोषण आहार, धान्य वाटप आणि त्यासोबत त्याच्या विविध प्रकारामध्ये नोंदी ठेवणे, निवडणुकीची कामे, आरोग्य विभागाचे लसीकरण, गावातील आजारी, वृद्ध, बालकांचे सर्वेक्षण, गोळ्या-औषधांचे वाटप, कृषी विभागाची कामे, प्रत्येक नव्या उपक्रमात शिक्षक केंद्रस्थानी असतो.

- कोरोना काळातही शिक्षकांना कामे होतीच. शाळेच्या काळात अशी कामे लावल्यावर त्या शिक्षकाने अध्यापन कधी करावे, असा सवाल शिक्षक संघटनांनी केला.

अध्यापनाव्यतिरिक्त विविध प्रकारचे कामे

शिक्षकांना अध्यापनाव्यतिरिक्त विविध प्रकारची अनेक कामे करावी लागतात. ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणावर त्याचा परिणाम होतो. गुणवत्तेचे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी शिक्षकांवर अतिरिक्त कामांचे ओझे नको.

आनंदा कांदाळकर, जिल्हाध्यक्ष, शिक्षक समिती

शिक्षक शासकीय कर्मचारी आहे. अन्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणेच निवडणूक जनगनणा यासारखी राष्ट्रीय कार्यक्रमाची कामे शिक्षकांना आहेत. अन्य विभागाचे कर्मचारीही हे काम करतात. त्याव्यतिरिक्त कोणतेही अशैक्षक काम शिक्षकांना नाही.

- राजीव म्हसकर, शिक्षणाधिकारी प्राथमिक

पॉईंटर

१,६७४ जिल्हा परिषदेच्या शाळा

१३,५०० जिल्हा परिषद शिक्षकांची संख्या

२,७६,८१३ जि.प. शाळा विद्यार्थी संख्या