शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाई रोखण्यासाठी उपाययोजना करा

By admin | Updated: January 21, 2016 22:21 IST

निवेदन : येवला शहर भाजपाची नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी

येवला : शहरातील पिण्याच्या पाण्याच्या शुद्धिकरणात होत असलेला गलथानपणा व भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेता त्यावरील उपाययोजनांबाबत तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने मुख्याधिकारी डॉ. राहुल वाघ यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा देण्यात आला. येवला शहराला गेल्या ३० ते ३२ वर्षांपासून शुद्ध व स्वच्छ पिण्याचा पाण्याचा पुरवठा तत्कालीन नगराध्यक्ष कै. केशवराव पटेल यांच्या धोरणामुळे अखंडितपणे सुरू आहे. शहराचा विस्तार लक्षात घेता नगरपरिषदेने नवीन व जास्त क्षमतेची जलशुद्धिकरण यंत्रणा गेल्या काही वर्षांत कार्यान्वित करून शहराला पूर्ण क्षमतेने शुद्ध पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न केला आहे. नगरपरिषदेने जलशुद्धी करण्याचे प्रमाण वाढवले पण जलशुद्धिकरण प्रक्रियेत वापरण्यात येणारी पावडर निकृष्ट दर्जाची असून तिच्या वापराने नागरिकांना पोटदुखी, उलट्या यांसह साथीच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. जलशुद्धिकरण प्रक्रि येत टीसीएलपावडर ही ३३ टक्के क्लोरीनयुक्तप्रमाणित पाहिजे व तुरटीही एवन ग्रेडची पाहिजे. मात्र शहरातील जलशुद्धिकरण केंद्रात निकृष्ट दर्जाची पावडर वापरली जात असल्याने जनसामान्याचे आरोग्य धोक्यात आले आहे. जलशुद्धिकरण केंद्राचे क्लोरिंग रूम (युनिट) फक्त दिखाव्यासाठी असून, त्यातील क्लोरिंगच्या टाक्या शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. या क्लोरिंग सिस्टिमचा वापर कधी होणार, शहरात लाखो रु पये खर्चून पाणीपुरवठा करण्यासाठी करण्यात आलेली पाइपलाइनही आर्धापर्यंत टाकण्यात आली आहे. परंतु ज्या भागात ती टाकण्यात आली त्या भागाला तिचा काहीच उपयोग नाही. लाखो रु पयांचा चुराडा होऊनही येवलेकरांना कमी दाबाने पाणीपुरवठ्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. नागरिकांना अजूनही जंतयुक्त अशुद्ध व गढुळ पाण्याचा पुरवठा होत आहे. नगरपालिकेचे कर्मचारी व अधिकारी वसुलीत व्यस्त असताना, टंचाई काळात तलाव परिसरातील विहिरींमधून दिवस-रात्र पाणीचोरी होऊन या पाण्याची अवैध विक्र ी केली जात आहे. पाणीपट्टी कर नागरिकांनी भरायचा आणि पाणी पळवायचे पाणी चोरांनी, अशी स्थिती शहरात दिसून येत आहे. तलाव परिसरातील सर्वच पाणीचोरांना जरब बसवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे गरजेचे असताना प्रशासन याकडे डोळेझाक करत आहे.निवेदनावर शहरातील सर्व भागातील नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यावेळी भाजपा शहराध्यक्ष आनंद शिंदे, दुर्गा भांडगे, श्यामसुंदर काबरा, दिनेश परदेशी, भरत क्षीरसागर, गीताराम दारु णकर, मीननाथ पवार, सागर नाईकवाडे, चेतन धसे, अमोल क्षीरसागर, उमेश काकडे, अन्सारी रहीम, सुनील काटवे, संकेत वाडेकर, श्रीराम क्षीरसागर, राजू रंगरेज, चेतन बाकळे, नितीन कायस्थ, कृष्णा गाडेकर, गणेश विघे, संदीप कटारे, सुनील बढे, गणेश कुमावत, वैभव वाडेकर, संजय खानापुरे, सुरेश बोगर, दीपक पोकळे, रु पेश भोसले, मच्छिंद्र पवार, राजू शिंदे, आकाश दाणेज, जगदीश भावसार, सचिन क्षीरसागर, हितेश शिंदे, सुमीत खानापुरे, मयूर मेघराज यांसह मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)