शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
5
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
6
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
7
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
8
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
9
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
10
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
11
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
12
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
13
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
14
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
15
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
16
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
17
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
18
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
19
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा

शाळा बंद झाल्याने विद्यार्थी बनले गुराखी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 00:26 IST

खडकी : ग्रामीण भागात प्राथमिक शाळा बंद असल्याने रानातच गोशाळा सुरू झाली असून विद्यार्थी सध्या गुराख्याची भूमिका बजावत आहेत. शेतकऱ्यांची मुले आता आपल्या आई-वडिलांना कामात मदत करीत त्यांच्यावरचा भार हलका करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत. दरम्यान, अभ्यासाची सवय बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याचेही पालकांकडून बोलले जात आहे.

ठळक मुद्देनुकसानीची खंत : अ‍ॅँड्रॉइड मोबाईलअभावी आॅनलाईन वर्गासही मुकले

अमृत कळमकर ।लोकमत न्यूज नेटवर्कखडकी : ग्रामीण भागात प्राथमिक शाळा बंद असल्याने रानातच गोशाळा सुरू झाली असून विद्यार्थी सध्या गुराख्याची भूमिका बजावत आहेत. शेतकऱ्यांची मुले आता आपल्या आई-वडिलांना कामात मदत करीत त्यांच्यावरचा भार हलका करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत. दरम्यान, अभ्यासाची सवय बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याचेही पालकांकडून बोलले जात आहे.दरवर्षी १५ जूनला शाळा सुरू होतात मात्र यावर्षी १५ आॅगस्टपर्यंत शाळा सुरू होण्याची चिन्हे दिसत नसल्याने विद्यार्थ्यांनी आपला मोर्चा शेतीकडे वळविला आहे. शेतातील महत्त्वाचे काम आता सुरू होण्यास सुरुवात झाली आहे. कांदा लागवड तसेच पुढील महिन्यात कापसाची वेचणी सुरू होणार असून विद्यार्थी शेतीकामात रमले आहेत. शेतातील इतर कामांबरोबरच शेतकऱ्यांकडे असणारी गुरे चारण्यासाठी माणसाच्या आवश्यकता असते. त्यामुळे घरातील कोणीतरी व्यक्तीच गुरे चारण्यासाठी जात आहेत.मात्र सद्यस्थितीत घरात दोन- तीन विद्यार्थी उपलब्ध असल्याने मजुरांची टंचाई भासत नाही. शेतकºयांना शाळा बंद असल्याचा फायदा होत असला तरी विद्यार्थ्यांचे मात्र नुकसान होणार आहे. त्याचप्रमाणे शेतकºयांकडून दुग्ध व्यवसाय केला जातो. त्यासाठी गायी, म्हैस, बैल आदी जनावरे पाळलेली असतात. पावसाळ्यात त्यांना खाण्यासाठी चारा उपलब्ध नसतो. त्यामुळे गुरे चारण्यासाठी मुले जात आहेत.एकत्र खेळण्यात वेळ जात असला तरी विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याकडे भ्रमणध्वनी उपलब्ध नसल्याने आॅनलाईन अभ्यास करणे गैरसोयीचे झाले आहे. प्राथमिक शाळा बंद असल्याने त्यांचे आॅनलाईन वर्ग बंद आहेत. मात्र त्यापुढील वर्गांचे आॅनलाईन वर्ग सुरू असली तरी काही अ‍ॅँड्रॉईड दूरध्वनीअभावी विद्यार्थी पूर्ण अभ्यास मुक्त झाले आहेत. अभ्यास करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ असला तरी शिक्षणाची तात्पुरती सोय उपलब्ध नसल्याने शेतकºयांच्या मुलांनी गोशाळा स्वीकारली आहे. शेतीकामासाठी विद्यार्थ्यांचा पालकांना हातभार सध्या श्रावण महिन्यामध्ये ग्रामीण भागात शेतीच्या कामांना वेग आला आहे. शेतकºयाला एक-एक माणसाची गरज भासत असल्याने प्रत्येक माणूस कामाला लागला आहे. घरातील म्हातारी माणसे सुद्धा आपापल्या परिने हातभार लावताना दिसून येत आहेत. पहिलीपासून दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचाही आता पालकांना हातभार लागत आहे. विद्यार्थी या अगोदर शाळेत जात असल्याने शेतकºयांना मजूर लावूनच कामे करावी लागायची.

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा