शहरं
Join us  
Trending Stories
1
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
2
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
3
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
4
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
5
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
6
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
7
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
8
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
9
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
10
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
11
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
12
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
13
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
14
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
15
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
16
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
17
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
18
भयंकरच घडलं! सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह; सिरीशाला पतीने रिक्षा स्टॅण्डवरच संपवले 
19
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
20
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
Daily Top 2Weekly Top 5

ठेक्यासाठी जोरदार चढाओढ सुरू

By admin | Updated: May 3, 2015 02:05 IST

ठेक्यासाठी जोरदार चढाओढ सुरू

नाशिक : महापालिकेच्या अमरधाममध्ये अंतिम संस्कार करण्यासाठी पुरविण्यात येणाऱ्या ठेक्यासाठी जोरदार चढाओढ सुरू असून, पंचवटीतील ठेक्यासाठी तर ठेकेदारांनी न्यायालयाची पायरी चढली आहे. दोन ठेकेदारांतील वाद सोडविण्यासाठी आयुक्तांनी अगोदरची निविदाप्रक्रिया रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे, तर न्यायप्रविष्ट बाबींमुळे स्थायी समितीने त्यासंदर्भात वादात न पडलेलेच बरे अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे हा घोळ न मिटल्यास अंत्यसंस्कारालाच अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.नाशिक महापालिकेच्या वतीने मोफत अंत्यसंस्कार योजना राबविली जाते. अंत्यसंस्कारासाठी लाकूड, रॉकेल, गोवऱ्या असे साहित्य पुरविले जाते. त्यासाठी ठेकेदार नियुक्त असून, महापालिका त्यासाठी ठेकेदारांना रक्कम देत असते. गेल्यावर्षी पंचवटीतील अमरधाममध्ये साहित्य पुरवण्याचा ठेका नंदकुमार मालपाणी यांना मिळाला. तत्पूर्वी हा ठेका रामदास हिरवे यांच्याकडे होता. मालपाणी यांना ठेका मिळाल्यानंतर स्थायी समितीने शिक्कामोर्तब केले. मात्र, अगोदरच्या ठेकेदाराने अंत्यसंस्काराचे मोठ्या प्रमाणात साहित्य आणून ठेवल्याने त्या ठेकेदाराला तीन महिने मुदतवाढ देण्यात आली. अशा प्रकारे तीन वेळा मुदतवाढ प्रशासनाने स्थायी समितीला अंधारात ठेवून देण्यात आली, असा आरोप शनिवारी स्थायी समितीत राहुल दिवे यांनी केला. यशवंत निकुळे यांनी मात्र नव्या ठेकेदाराने पालिकेला नाकदुऱ्या काढण्यास सांगितले, हा वाद न्यायप्रविष्ट असल्याने तूर्तास यावर निर्णय घेऊ नये आणि हा विषय तहकूब ठेवावा, अशी मागणी केली. दरम्यान, हिरवे आणि मालपाणी यांच्यातील वादासंदर्भात आयुक्तांनी दखल घेऊन मूळ निविदेतच अनेक त्रुटी होत्या. त्यात ठेकेदाराने शॉप अ‍ॅक्ट लायसन आणि दरवर्षी ठेकेदाराला दहा टक्के दरवाढ देणे याची तरतूद करण्याचे राहिल्याने स्थायी समितीने केलेला ठराव राज्यशासनाकडे विखंडित करण्यासाठी पाठविण्यात आला आहे आणि आयुक्तांनी फेरनिविदा मागविण्याचे आदेश दिले आहेत. तोपर्यंत अमरधाममध्ये साहित्य पुरवठ्याला अडचण येऊ नये यासाठी सध्याच्या ठेक्याला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव असल्याचे आरोग्याधिकरी डॉ. सुनील बुकाणे यांनी सांगितले. सभापती शिवाजी चुंभळे यांनी महापालिकेने ठराव विखंडित करण्याची कार्यवाही दोन महिन्यांत पूर्ण करावी, असे आदेश दिले. दरम्यान, अमरधाम येथे अंत्यसंस्कारासाठी कोणालाही अडचण उद्भवू देऊ नका, असे प्रा. कुणाल वाघ यांनी सांगितले. (प्रतिनिधी)