शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

एसटी कामगार संघटना आंदोलनाच्या तयारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 01:35 IST

वेतनकरारासह कामगारांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांकडे महामंडळाचे लक्ष वेधण्यासाठी मागीलवर्षी ऐन दिवाळीत चार दिवसांचा संप करणाऱ्या एसटी कामगार संघटनेने यंदाच्या दिवाळीतही प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचा तयारी केली असून, ३० आॅक्टोबरला आझाद मैदानापासून उपोषणाला सुरुवात होऊन १ नोव्हेंबरपासून राज्यातील विभागीय कार्यालयांसमोर उपोषणाला सुरुवात होणार आहे.

नाशिक : वेतनकरारासह कामगारांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांकडे महामंडळाचे लक्ष वेधण्यासाठी मागीलवर्षी ऐन दिवाळीत चार दिवसांचा संप करणाऱ्या एसटी कामगार संघटनेने यंदाच्या दिवाळीतही प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचा तयारी केली असून, ३० आॅक्टोबरला आझाद मैदानापासून उपोषणाला सुरुवात होऊन १ नोव्हेंबरपासून राज्यातील विभागीय कार्यालयांसमोर उपोषणाला सुरुवात होणार आहे. ऐन दिवसाळीतील संपामुळे प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता असल्यामुळे महामंडळ उपोषणावर काय तोडगा काढणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.  मान्यताप्राप्त संघटनेने कर्मचाºयांच्या हितासाठी वारंवार अनेक प्रश्न मांडले आहेत, परंतु महामंडळाकडून प्रश्नांची सोडवणूक होत नसल्याने तसेच वेतनकरारावर अद्यापही तळ्यात-मळ्यात सुरू असल्यामुळे महामंडळाचे लक्ष वेधण्यासाठी या दिवाळीत संघटनेने पुन्हा आंदोलनाची हाक दिलेली आहे. सन २०१६-१७ या कालावधीच्या वेतन करारासाठी एकतर्फी वेतनवाढ जाहीर करण्यात आल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. वेतनवाढ जाहीर करण्यात आली असली तरी चार वर्षांच्या वेतनवाढीसाठी जाहीर केलेले ४८४९ कोटींचे पॅकेज संघटनेने मान्य केलेले आहे. परंतु प्रशासनाने सदर पॅकेच वाटपाचे सूत्र वापरलेले आहे त्या सूत्रामुळे ४,८४९ कोटींमधील सुमारे १,५०० कोटी इतकी रक्कम शिल्लक राहत असल्यामुळे सदर रकमेचे कामगारांना वाटप होणे अपेक्षित असल्याची भूमिका संघटनेने घेतलेली आहे.वेतनकरारातील अनेक मुद्द्यांवर कामगार संघटनेने अद्यापही स्वाक्षरी केलेली नसून प्रशासन लवचिक भूमिका घेण्यास तयार नसल्यामुळे कर्मचाºयांमध्ये असंतोष असल्याचा दावा संघटनेने केला आहे. प्रशासननाच्या या भूमिकेमुळे कामगारांमध्ये नाराजी आहे. कामगारांच्या मागण्या मान्य न झाल्यास ३० आॅक्टोबरपासून आंदोलनात्मक भूमिका घेतली जाईल, असे संघटनेने कळविले आहे.  संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी २२ विविध प्रकारच्या मागण्या मांडलेल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने एकतर्फी करण्यात आलेली वेतनवाढ कोंडी दूर करावी, कामबंद आंदोलनात सहभागी कर्मचाºयांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत, खासगीकरणातून घेण्यात आलेल्या शिवशाही बसेस महामंडळानेच चालवाव्यात, महामंडळात विविध सेवांचे कंत्राटीकरण सुरू झाल्याने कर्मचाºयांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे. या कर्मचाºयांना दिलासा देण्यासाठी कंत्राटी कामाची पद्धत बंद करण्यात यावी, मयत आणि अपंगत्व आलेल्या कर्मचाºयांच्या वारसांना सुविधा तसेच नोकरी देण्याबाबतची तरतूद असतांनाही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. या मागण्यांप्रमाणेच अन्य अनेक महत्त्वाच्या मागण्या संघटनेने केलेल्या आहेत.वेतनकरार हेच मुख्य कारणकामगार संघटनेने विविध प्रकारांच्या २२ अडचणी आणि प्रश्नांबाबत उपोेषणाची हाक दिलेली असली तरी प्रत्यक्षात मात्र वेतनकरार हा विषय पुन्हा यानिमित्ताने संघटनेने समोर आणला आहे. संघटनेकडून या कराराबाबत घेण्यात आलेली भूमिका सावध असल्याचे गेल्या काही बैठकांमध्ये दिसून आलेली आहे. आक्रमकपणे हा मुद्दा व्यासपीठावरून अनेकदा मांडण्यात आलेला आहे. परंतु मधल्या काळात काय चर्चा होते याबाबतची माहिती मिळतही नाही. आता पुन्हा दिवाळीचा मुहूर्त साधून कामगारांनी उपोेषणाचा इशारा दिलेला आहे. याच प्रश्नावर कामबंद आंदोलन, असहकार तसेच विभागीय कार्यशाळांमध्ये होणाºया हाणामाºयापर्यंत प्रकरण गेल्याने ही बाब आता अत्यंत असंवेदनशील बनली आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळdiwaliदिवाळी