शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

साठ वर्षांनंतर मुंगसरे शिवरस्त्याचा ‘मार्ग मोकळा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 00:05 IST

साठ वर्षांनंतर अखेर मुंगसरे शिवरस्त्याचा मार्ग मोकळा झाल्याने शेतकरी व गावकरी वर्गात समाधानाचे व आनंदाच्या वातावरणात कामाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांनी अतिक्रमणे स्वत:हून काढून घेतली.

मातोरी : साठ वर्षांनंतर अखेर मुंगसरे शिवरस्त्याचा मार्ग मोकळा झाल्याने शेतकरी व गावकरी वर्गात समाधानाचे व आनंदाच्या वातावरणात कामाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांनी अतिक्रमणे स्वत:हून काढून घेतली.गेल्या साठ वर्षांपासून मुंगसरे ते मातोरी गावाला जोडणारा रस्ता बंद होता. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी अतिक्र मणे करून रस्ता काबीज केला होता. हा रस्ता जवळपास नामशेष झाला होता; परंतु मुंगसरे गावातील नागरिकांना प्रवासासाठी, तर शेतकऱ्यांना शेतमाल वाहतुकीसाठी मुंगसरे फाटा येथे एक ते दीड किलोमीटर यावे लागत असे. याबाबत पाच महिन्यांपूर्वी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. स्थानिक शेतकºयांनी अनेक वर्षं शासकीय कार्यालयात पाठपुरावा केला, शेवटी आपणच पुढाकार घेऊन रस्ता दुरुस्त करू असा निर्णय शेतकरी वर्गाने घेतला असता याबाबतची दखल मुंगसरे गावच्या सरपंचांनी घेतली व याबाबतचा अहवाल शासन दरबारी सादर केला असता तुटपुंजा निधी का होईना मिळाला. निदान शेतकºयांना हातभार लागला. यावेळी तानाजी पिंगळे, सरपंच कल्पना भोर, बाळासाहेब म्हैसधुणे, कैलास पिंगळे, हिरामण पिंगळे, बाबूराव पिंगळे, शिवाजी भोर, दशरथ हगवणे, केरुतात्या हगवणे, राजाराम फडोळ, शिवाजी पिंगळे, शेखर पिंगळे, सुखदेव पिंगळे आदी उपस्थित होते.रस्त्याचा फायदा कोणाला होईल?रस्त्याचा फायदा हा शालेय विद्यार्थ्यांना थेट हायवेवर जावे लागणार नाही त्यामुळे अपघात होण्याचा धोका कमी होईल, नाशिक ते मुंगसरे अंतर सुमारे पाच किलोमीटरने कमी होईल. शेतकरीवर्गाला भाजीपाला शेतमाल वाहतुकीसाठी फायदा होईल. अत्यावश्यक सुविधांसाठी दीड किलोमीटर दूर फाट्यावर जावे लागणार नाही.गावातील शिव रस्ता गेल्या साठ वर्षांपासून बंद व अतिक्रमित अवस्थेत होता. गावाबाहेरून जाणारा हायवेच वापरायचा झाल्याने ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष झाले होते. मोठ्या परिश्रमाने व पाठपुराव्याने आम्हाला रस्ता सुरू करण्यात यश आले आहे.- राजाराम फडोळ, ग्रामस्थअनेकदा निवेदने दिली; पण कोणीही लक्ष देत नसल्याने आमचा रस्ता दुर्लक्षित झाला होता. अर्जदेखील दिले, त्यांनी याकडे दुर्लक्ष केले पण दीड महिन्यानी दखल घेत अधिकारी आमच्यापर्यंत आले होते आणि आता कामाला सुरुवात केली आहे.  - प्रभाकर पिंगळे, शेतकरी

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयFarmerशेतकरी