शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

प्रवास सुरूच : परप्रांतीय मजुरांना घेऊन धावली सहावी रेल्वे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 20:09 IST

या सर्व गाडयांमधून ७४५३ मजुरांनी प्रवास केला आहे. गेल्या एक मे पासून अनेकदा मध्यप्रदेश, उतर प्रदेश आणि बिहारसाठी गाडा सोडण्यात आलेल्या आहेत.

ठळक मुद्देरेल्वेने आत्तापर्यत साडेसात हजार मजूर पोहचले गावी

नाशिक : जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात कामधंदा करणाºया परप्रांतीय मजुरांनी गावाकडची वाट धरली असून रेल्वे आणि बससेच्या माध्यमातून सुमारे चाळीस हजाराच्यावर परप्रांतीय मुजरांना त्यांच्या गावी पाठविण्यात आले आहे. यामध्ये बसेसने प्रवास करणा-या मजुरांची संख्या सर्वाधिक आहे तर बुधवारी सकाळी नाशिकरोड रेल्वेस्टेशनमधून मजुरांना घेऊन सहावी ट्रेन बिहारच्या दिशेने धावली.कोरोनामुळे उद्वलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे जिल्ह्यातील मजुरांंचे लोंढे गावाच्या दिशेने निघाले आहेत. गावाकडे जाणाऱ्यांना मुजरांना त्यांच्या गावी पोहचविण्यासाठी प्रशाासनाकडून रेल्वे गाड्या तसेच बसेसची व्यवस्था केली जात आहे. गावी जाण्यासाठी तहसिलदारांकडे नोंदणी केलेल्या आणि संबंधित राज्यांकडून एनओसी प्राप्त झाल्यानंतर संबंधित मजुरांसाठी श्रमिक रेल्वे गाडीची व्यवस्था केली जाते. नाशिाकरोड रेल्वे स्थानकातून आत्तापर्यंत सहा रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या आहेत तर एक गाडी औरंगाबाद येथून सुटल्याने नाशिक जिल्ह्यातील प्रवाशांना सदर गाडीतून रवाना करण्यात आले. या सर्व गाडयांमधून ७४५३ मजुरांनी प्रवास केला आहे. गेल्या एक मे पासून अनेकदा मध्यप्रदेश, उतर प्रदेश आणि बिहारसाठी गाडा सोडण्यात आलेल्या आहेत.बुधवारी (दि.२०) नाश्कि ग्रामीण विभागातून सहावी रेल्वे गाडी बिहार राज्यातील हाजीपूर येथे १५८७ प्रवाशांना घेऊन रवाना झाली. या प्रवाशांच्या तिकीटाचे सुमारे ११ लाख रुपये महाराष्टÑ शासनाने भरले आहेत. गेल्या नऊ तारखेपासून सुरू असलेल्या प्रवासी वाहतुकीत सर्वाधिक प्रवासी हे उत्तरप्रदेशचे प्रवासी आहेत. ग्रामीण भागात अजूनही तहदिलदारांकडे परप्रांतय मजुरांकडे नावनोंदणी सुरूच असून येत्या ३१ तारखेच्या आत जास्तीत जास्त प्रवाशाांना त्यांच्या मुळ गाठी पाठविण्याची तयारी केली जात आहे.जिल्ह्यातील प्रवाशांना त्यांच्या मुळ गावी सोडण्यासाठी करण्यात आलेल्या नियोजनानुसार शहरी भागाची जबाबदारी ही महापालिका आणि पोलीस उपायकुतांकडे देण्यात आलेली आहे तर ग्रामीण भागातील जबाबदारी जिल्हा प्रशासनाचे अधिकारी सांभाळत आहेत. गेल्या ९ तारखेपासून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून सुरू असलेल्या प्रवासी वाहतुकीतून सर्वाधिक ३३ हजार ८८३ प्रवाशांची वाहतूक अनेक राज्यांमध्ये करण्यात आलेली आहे. राजस्थान, बिहार,केरळ, झारखंड, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, ओडीसा, वेस्टबंगाल आदि राज्यांतील प्रवाशांची वाहतूक करण्यात आलेली आहे. ठाणे जिल्ह्यातून येणाºया सर्वाधिक प्रवाशांना थेट ठाणे जिल्ह्यातून पिकअप करण्यात आले.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयRailway Passengerरेल्वे प्रवासीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस