शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

शैक्षणिकप्रश्नांवर छात्रभारतीचे निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 1:14 AM

सर्वांना मोफत शिक्षण, विनाअनुदान धोरण रद्द करावे यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी छात्रभारती संघटनेने शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ तीव्र निदर्शने करून, मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

नाशिक : सर्वांना मोफत शिक्षण, विनाअनुदान धोरण रद्द करावे यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी छात्रभारती संघटनेने शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ तीव्र निदर्शने करून, मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.  सध्या शिक्षण व बेरोजगारीचा प्रश्न गंभीर झाला असून, शिक्षण महाग झाल्याने विनाअनुदानित धोरणामुळे शिक्षकांचे संसार उघड्यावर पडू लागल्याचा आरोपही यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला. केजी टू पीजीपर्यंतचे शिक्षण मुला, मुलींना मोफत दिले जावे, राष्टय उत्पन्नाच्या किमान दहा टक्के खर्च शिक्षणावर करावा, शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणानुसार रोजगाराची हमी सरकारने द्यावी, बेरोजगार युवकांना मासिक भत्ता देण्यात यावा, मागेल त्याच्या हाताला काम मिळावे, शिक्षक व प्राध्यापकांच्या रिक्त जागा त्वरित भरण्यात याव्यात आदी मागण्याही यावेळी करण्यात आल्या. या आंदोलनात राकेश पवार, समाधान बागुल, राम सूर्यवंशी, निवृत्ती खेताडे, सचिन भुसारे, देवीदास हजारे, सदाशिव गणगे आदींसह अधिकारी, पदाधिकारी सहभागी झाले होते.विविध मागण्याशिक्षणातील विनाअनुदान धोरण कायमचे बंद करावे, शिक्षणाचे कंपनीकरण, खासगीकरण बंद करावे, मराठी व रात्रशाळा बंद करण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा, सच्चर कमिशन आयोगाचा अहवाल लागू करावा, एमपीएस्सी व यूपीएस्सीमार्फत भरल्या जाणाºया रिक्त जागा त्वरित भराव्यात, देशातील अंगणवाडी कर्मचाºयांना वेतन लागू करावा, शिक्षक व नोकर भरती करण्यात यावी आदि मागण्या करण्यात आल्या.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थी