शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

संजय राऊतांनी दिली डेडलाईन; विधानसभा अध्यक्षांनी एवढ्या दिवसांत निर्णय घ्यावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2023 12:42 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर हे सरकार बेकायदेशीर असल्याचे काल सिध्द झाले. या निकालात आमच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत.

नाशिक - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन विधानसभा अध्यक्षांच्या जबाबदारीची आठवण राहुल नार्वेकर यांना करुन दिली. तसेच, विद्यमान सरकार हे बेकायदेशीर असून अध्यक्षांची निवडही बेकायदेशीरच ठरेल, असे म्हटले आहे. त्यानंतर, आता शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनीही विधानसभा अध्यक्षांना लक्ष्य केले असून लवकरात लवकर म्हणजे किती दिवसांत अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घ्यावा, याची डेडलाईनच सांगितली. तसेच, शिंदे-फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवरही सडकून टीका केली.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर हे सरकार बेकायदेशीर असल्याचे काल सिध्द झाले. या निकालात आमच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. भरत गोगावले यांची प्रतोदपदी नेमणूक बेकायदेशीर आहे, यावरून सगळा काही पिक्चर क्लिअर आहे. त्यामुळे हे सरकार घटनाबाह्य आहे हे सिध्द झाल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. घोषित झालेल्या निकालावरून सरकार जाणार असून न्यायालयाने जल्लादाचे काम विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सोपवल्याचे  टीकास्त्र खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच, पुढील ९० दिवसांत अध्यक्षांना यासंदर्भातील निर्णय घ्यावा लागेल. त्यामुळे, हे सरकार केवळ ९० दिवसांचं आहे, तीन महिन्यात हे सरकार कोसळेल, असा दावाही संजय राऊत यांनी केला. 

शिवसेना नेते व माजी आमदार अनिल कदम यांच्या वडिलांचे निधन झाल्याने राऊत यांनी आज सकाळी ओझर येथे कदम कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. राऊत म्हणाले, न्या.धनंजय चंद्रचूड यांचे वडील देखील त्यावेळी न्यायमूर्ती असताना त्यांनी इंदिरा गांधी सरकारला देखील धक्का दिला होता. त्यामुळे केजरीवाल यांना देखील असेच दिल्लीचे नायब राज्यपाल काम करू देत नसल्याने तो निकाल दिल्लीच्या मुख्यमंत्री यांच्या बाजूने गुरुवारी लागला आहे. त्यामुळे केजरीवाल यांना काम करणे सोपे होणार आहे. आताचे राज्य सरकार हे बेकायदेशीर असून स्वतः गोगावले यांची बेकायदेशीर नेमणूक झाल्याने शिंदे हे सुध्दा नियमबाह्य मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय हा आमच्या बाजूने असल्याचे राऊत यांनी म्हटले. 

शिंदे-फडणवीसांनी पत्रकार परिषद घेणे म्हणजे निर्लज्जपणा आहे. कारण, सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाचे कपडे फाडले आहेत, त्यांना उघडं केलंय. मात्र, चुकीची माहिती देण्याचं काम शिंदे-फडणवी हे पत्रकार परिषद घेऊन करत आहेत, असेही संजय राऊत यांनी म्हटले. केंद्राचे दडपण जास्त दिवस चालणार नाही. पुढील ३ महिन्यात हे सरकार कोसळणार असल्याचा दावा राऊत यांनी केला.  जनता आमच्या बाजूने भक्कम उभी असल्याचे देखील त्यांनी नमूद केले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेस