शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

संजय राऊतांनी दिली डेडलाईन; विधानसभा अध्यक्षांनी एवढ्या दिवसांत निर्णय घ्यावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2023 12:42 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर हे सरकार बेकायदेशीर असल्याचे काल सिध्द झाले. या निकालात आमच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत.

नाशिक - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन विधानसभा अध्यक्षांच्या जबाबदारीची आठवण राहुल नार्वेकर यांना करुन दिली. तसेच, विद्यमान सरकार हे बेकायदेशीर असून अध्यक्षांची निवडही बेकायदेशीरच ठरेल, असे म्हटले आहे. त्यानंतर, आता शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनीही विधानसभा अध्यक्षांना लक्ष्य केले असून लवकरात लवकर म्हणजे किती दिवसांत अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घ्यावा, याची डेडलाईनच सांगितली. तसेच, शिंदे-फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवरही सडकून टीका केली.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर हे सरकार बेकायदेशीर असल्याचे काल सिध्द झाले. या निकालात आमच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. भरत गोगावले यांची प्रतोदपदी नेमणूक बेकायदेशीर आहे, यावरून सगळा काही पिक्चर क्लिअर आहे. त्यामुळे हे सरकार घटनाबाह्य आहे हे सिध्द झाल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. घोषित झालेल्या निकालावरून सरकार जाणार असून न्यायालयाने जल्लादाचे काम विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सोपवल्याचे  टीकास्त्र खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच, पुढील ९० दिवसांत अध्यक्षांना यासंदर्भातील निर्णय घ्यावा लागेल. त्यामुळे, हे सरकार केवळ ९० दिवसांचं आहे, तीन महिन्यात हे सरकार कोसळेल, असा दावाही संजय राऊत यांनी केला. 

शिवसेना नेते व माजी आमदार अनिल कदम यांच्या वडिलांचे निधन झाल्याने राऊत यांनी आज सकाळी ओझर येथे कदम कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. राऊत म्हणाले, न्या.धनंजय चंद्रचूड यांचे वडील देखील त्यावेळी न्यायमूर्ती असताना त्यांनी इंदिरा गांधी सरकारला देखील धक्का दिला होता. त्यामुळे केजरीवाल यांना देखील असेच दिल्लीचे नायब राज्यपाल काम करू देत नसल्याने तो निकाल दिल्लीच्या मुख्यमंत्री यांच्या बाजूने गुरुवारी लागला आहे. त्यामुळे केजरीवाल यांना काम करणे सोपे होणार आहे. आताचे राज्य सरकार हे बेकायदेशीर असून स्वतः गोगावले यांची बेकायदेशीर नेमणूक झाल्याने शिंदे हे सुध्दा नियमबाह्य मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय हा आमच्या बाजूने असल्याचे राऊत यांनी म्हटले. 

शिंदे-फडणवीसांनी पत्रकार परिषद घेणे म्हणजे निर्लज्जपणा आहे. कारण, सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाचे कपडे फाडले आहेत, त्यांना उघडं केलंय. मात्र, चुकीची माहिती देण्याचं काम शिंदे-फडणवी हे पत्रकार परिषद घेऊन करत आहेत, असेही संजय राऊत यांनी म्हटले. केंद्राचे दडपण जास्त दिवस चालणार नाही. पुढील ३ महिन्यात हे सरकार कोसळणार असल्याचा दावा राऊत यांनी केला.  जनता आमच्या बाजूने भक्कम उभी असल्याचे देखील त्यांनी नमूद केले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेस