शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

संजय राऊतांनी दिली डेडलाईन; विधानसभा अध्यक्षांनी एवढ्या दिवसांत निर्णय घ्यावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2023 12:42 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर हे सरकार बेकायदेशीर असल्याचे काल सिध्द झाले. या निकालात आमच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत.

नाशिक - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन विधानसभा अध्यक्षांच्या जबाबदारीची आठवण राहुल नार्वेकर यांना करुन दिली. तसेच, विद्यमान सरकार हे बेकायदेशीर असून अध्यक्षांची निवडही बेकायदेशीरच ठरेल, असे म्हटले आहे. त्यानंतर, आता शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनीही विधानसभा अध्यक्षांना लक्ष्य केले असून लवकरात लवकर म्हणजे किती दिवसांत अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घ्यावा, याची डेडलाईनच सांगितली. तसेच, शिंदे-फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवरही सडकून टीका केली.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर हे सरकार बेकायदेशीर असल्याचे काल सिध्द झाले. या निकालात आमच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. भरत गोगावले यांची प्रतोदपदी नेमणूक बेकायदेशीर आहे, यावरून सगळा काही पिक्चर क्लिअर आहे. त्यामुळे हे सरकार घटनाबाह्य आहे हे सिध्द झाल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. घोषित झालेल्या निकालावरून सरकार जाणार असून न्यायालयाने जल्लादाचे काम विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सोपवल्याचे  टीकास्त्र खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच, पुढील ९० दिवसांत अध्यक्षांना यासंदर्भातील निर्णय घ्यावा लागेल. त्यामुळे, हे सरकार केवळ ९० दिवसांचं आहे, तीन महिन्यात हे सरकार कोसळेल, असा दावाही संजय राऊत यांनी केला. 

शिवसेना नेते व माजी आमदार अनिल कदम यांच्या वडिलांचे निधन झाल्याने राऊत यांनी आज सकाळी ओझर येथे कदम कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. राऊत म्हणाले, न्या.धनंजय चंद्रचूड यांचे वडील देखील त्यावेळी न्यायमूर्ती असताना त्यांनी इंदिरा गांधी सरकारला देखील धक्का दिला होता. त्यामुळे केजरीवाल यांना देखील असेच दिल्लीचे नायब राज्यपाल काम करू देत नसल्याने तो निकाल दिल्लीच्या मुख्यमंत्री यांच्या बाजूने गुरुवारी लागला आहे. त्यामुळे केजरीवाल यांना काम करणे सोपे होणार आहे. आताचे राज्य सरकार हे बेकायदेशीर असून स्वतः गोगावले यांची बेकायदेशीर नेमणूक झाल्याने शिंदे हे सुध्दा नियमबाह्य मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय हा आमच्या बाजूने असल्याचे राऊत यांनी म्हटले. 

शिंदे-फडणवीसांनी पत्रकार परिषद घेणे म्हणजे निर्लज्जपणा आहे. कारण, सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाचे कपडे फाडले आहेत, त्यांना उघडं केलंय. मात्र, चुकीची माहिती देण्याचं काम शिंदे-फडणवी हे पत्रकार परिषद घेऊन करत आहेत, असेही संजय राऊत यांनी म्हटले. केंद्राचे दडपण जास्त दिवस चालणार नाही. पुढील ३ महिन्यात हे सरकार कोसळणार असल्याचा दावा राऊत यांनी केला.  जनता आमच्या बाजूने भक्कम उभी असल्याचे देखील त्यांनी नमूद केले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेस