शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

श्रीश्री रविशंकर मार्गावरील  झाडांना संरक्षणाअभावी वाढलेल्या धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 00:21 IST

महापालिकेने हरित नाशिक संकल्पना साकारण्यासाठी व शहरातील रिंगरोडवरील वृक्षतोडीचा मोबदला म्हणून कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये दहा फूट उंचीच्या २१ हजार रोपांच्या लागवडीच्या उद्दिष्टपूर्तीकरिता श्रीश्री रविशंकर दिव्य मार्गाच्या दुतर्फा कदंब, टॅबोबिया या प्रजातीच्या रोपट्यांची लागवड केली गेली. या मार्गावरील बहुसंख्य झाडांची चांगली दमदार वाढ झाली आहे; मात्र संरक्षणाअभावी वाढलेल्या झाडांना धोका उद्भवला असून, काही झाडांची हानी होत असल्याचे चित्र नजरेस पडत आहे.

नाशिक : महापालिकेने हरित नाशिक संकल्पना साकारण्यासाठी व शहरातील रिंगरोडवरील वृक्षतोडीचा मोबदला म्हणून कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये दहा फूट उंचीच्या २१ हजार रोपांच्या लागवडीच्या उद्दिष्टपूर्तीकरिता श्रीश्री रविशंकर दिव्य मार्गाच्या दुतर्फा कदंब, टॅबोबिया या प्रजातीच्या रोपट्यांची लागवड केली गेली. या मार्गावरील बहुसंख्य झाडांची चांगली दमदार वाढ झाली आहे; मात्र संरक्षणाअभावी वाढलेल्या झाडांना धोका उद्भवला असून, काही झाडांची हानी होत असल्याचे चित्र नजरेस पडत आहे.सुमारे २१ हजार रोपांच्या लागवडीचे जणू अभियान मनपाकडून वर्षभरापूर्वी राबविले गेले. मनपाने नियुक्त केलेल्या ठेकेदारांनी जेसीबीद्वारे खड्डे घेऊन दहा फुटांची रोपे लावली. रविशंकर दिव्य मार्गालगतही अशाप्रकारे रोपे लावली गेली. पावसाळ्यामुळे येथील काही रोपांनी तगही धरल्याने रोपे सध्या हिरवीगार दिसत आहे; मात्र काही रोपांनी मान टाकली आहे, तर काही रोपे जनावरांनी कुरतडल्याने नाहीशी झाली आहे. पाच वर्षे लावलेल्या रोपांच्या संवर्धनाची जबाबदारीही पालिक ा प्रशासनाने त्यावेळी संबंधितांवर निश्चित केली होती; मात्र याचा विसर पडल्याने संताप व्यक्त होत आहे. लावलेल्या रोपांची सुरक्षितता वाºयावर सोडल्यामुळे रोपे लावून केवळ उद्दिष्टपूर्ती केली गेली; मात्र हेतूला हरताळ फासल्याचे बोलले जात आहे. केवळ दहा फूुटाच्या रोपांचे दिलेले ‘टार्गेट’ पूर्ण झाल्यानंतर संबंधितांनी हात वर केल्यामुळे रोपांचे वृक्ष होणार का? असा प्रश्न सकाळ-संध्याकाळ या रस्त्यावरून फेरफटका मारणाºया नागरिकांनी उपस्थित केला आहे. ज्या रोपट्यांची हानी झाली त्याऐवजी पुन्हा नवीन रोपे अद्याप लावली गेली नाही. अधिकाºयांचेही याकडे दुर्लक्ष झाले आहे.वर्षभरापूर्वी लागवड; सुरुवातीपासूनच निष्काळजी गेल्या वर्षी वृक्षारोपणासाठी १५ जानेवारी ही डेडलाइन दिली होती. पाच ते सहा खासगी एजन्सींद्वारे यावेळी ‘खड्डे खोदा, रोपे लावा’ अशी मोहीम जिथे जागा मिळेल तिथे राबविण्यात आली. त्यावेळी दोन ते तीन दिवसांमध्येच काही ठिकाणी लावलेल्या रोपांच्या काड्या झाल्या, तर काही ठिकाणी नर्सरीमधील प्लॅस्टिक पिशव्यांसह रोपे खड्ड्यात उभी केल्याचेही वास्तव पुढे आले होते. त्यामुळे महापालिकेकडून करण्यात आलेला कोट्यवधींचा खर्चाचे ‘फळ’ नाशिककरांना पहावयास मिळेल का? याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. सर्वच रिंगरोडलगत लावलेल्या झाडांपैकी बहुतांश झाडे अखेरच्या घटका मोजत आहे. उन्हाळ्यात खºया अर्थाने ही झाडे जगविण्याचे आव्हान राहणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक