शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
9
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
10
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
11
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
13
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
14
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
15
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
16
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
17
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
18
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
19
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
20
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी

जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन बंधाऱ्यांचा गाळ काढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2019 6:51 PM

आतापर्यंत २६ वळणबंधा-यातील गाळ काढल्याचे चांगले परिणाम दिसून आल्याने पुढील टप्प्यात १७० वळणबंधा-यांतील गाळ काढण्यात येणार आहे. यासाठी ३१ जेसीबी यंत्र उपलब्ध करून देण्यात आले असून, ही संख्या ७०पर्यंत वाढविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देकरार : आठ तालुक्यांत खासगी संस्थांची घेणार मदत १४२ गावांतील ७१ हजार कुटुंबांना याचा लाभ

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यात ब्रिटिशकालीन वळण बंधा-यातील गाळ काढण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि युवामित्र संस्थेत सामंजस्य करार करण्यात आला असून, त्यानुसार आठ तालुक्यांत १४२ गावांतील ७१ हजार कुटुंबांना याचा लाभ होणार आहे. बंधा-यातील गाळ काढल्यानंतर साचणा-या पाण्यातून ५५ हजार एकर क्षेत्राला सिंचनासाठी लाभ होणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी. आणि युवामित्रच्या वतीने व्यवस्थापकीय संचालक सुनील पोटे यांनी या करारावर स्वाक्ष-या केल्या. आतापर्यंत २६ वळणबंधा-यातील गाळ काढल्याचे चांगले परिणाम दिसून आल्याने पुढील टप्प्यात १७० वळणबंधा-यांतील गाळ काढण्यात येणार आहे. यासाठी ३१ जेसीबी यंत्र उपलब्ध करून देण्यात आले असून, ही संख्या ७०पर्यंत वाढविण्यात येणार आहे. यात बागलाण तालुक्यात ३५ गावांतील ४० बंधारे, चांदवड तालुक्यात ३२ गावातील ३९, दिंडोरी १० गावांतील १३, कळवण २१ गावातील २४, मालेगाव १३ गावातील १३, नाशिक १ तालुक्यातील २, निफाड २२ गावांतील २५ आणि सिन्नर तालुक्यात ८ गावांतील १४ बंधा-यांचा यात समावेश आहे.गाळ काढण्यासाठी ५० टक्के खर्च शासन, ४१.९ टक्के खर्च टाटा ट्रस्ट व इतर संस्था आणि ८.१ टक्के खर्च लोकसहभागातून करण्यात येणार आहे. गाळ काढण्याबरोबर पीक पद्धतीत अपेक्षित बदल घडवून आणण्यासाठीदेखील प्रयत्न करण्यात येणार आहेत. स्थानिक नागरिकांचेदेखील या कामात सहकार्य घेण्यात येणार आहे. भविष्यात पाण्याचा सुयोग्य वापर व्हावा यासाठी पाणीवापर संस्था स्थापन करण्यावरही भर देण्यात येणार आहे. गाळ काढण्याच्या कामात ग्रामस्थांचे सहकार्य मिळावे यासाठी जनजागृतीवर भर देण्यात येत आहे. यावेळी टाटा ट्रस्टचे कार्यक्रम व्यवस्थापक मुकुल गुप्ते, अधीक्षक अभियंता राजेश मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, कार्यकारी अभियंता सागर शिंदे, युवामित्र संस्थेचे, कार्यक्रम व्यवस्थापक अजित भोर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Waterपाणीnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयDamधरण