शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत काँग्रेसनं केला उद्धव ठाकरेंचा गेम?; निवडणुकीनंतरचं स्नेहभोजन वादात
2
निवडणुकीत हरवले ४५ हजार कोटींचे मराठवाड्याचे पॅकेज; प्रचारातही कुणी शब्द काढला नाही
3
“इंडिया आघाडीचे सरकार आल्यास १०० दिवसांत इलेक्टोरल बॉण्डचा तपास करणार”: अरविंद केजरीवाल
4
पश्चिम बंगालमध्ये राडा! भाजपाच्या महिला कार्यकर्त्याच्या मृत्यूनं तणाव; TMC वर आरोप
5
IPL 2024: दोन वर्ष, दोन जिव्हारी लागणारे पराभव... एकाच मैदानाने दोन वेळा तोडलं Virat Kohli चं स्वप्न
6
Smriti Irani : "CM हाऊसमध्ये स्वाती मालीवाल यांच्याशी गैरवर्तन, केजरीवाल गप्प का?"; स्मृती इराणींचं टीकास्त्र
7
Rajkummar Rao : "आता तो माझ्या आयुष्याचा..."; राजकुमार राव आईच्या आठवणीत आजही करतो दर शुक्रवारी व्रत
8
"न्याय झाल्यासारखा दिसला पण पाहिजे"; मतांच्या आकडेवारीवरुन सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाला विनंती
9
बुडालेल्या लोकांना शोधायला गेलेल्या SDRF पथकाची बोट उलटली; तीन जवानांचा मृत्यू
10
Gold Silver Price 23 May: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, एकाच दिवसात सोनं ₹१२८९, चांदी ₹३४७६ स्वस्त 
11
...म्हणून मला भारतीय संघाचा कोच व्हायचं नाही; Ricky Ponting नं सांगितलं कारण
12
"... तो रिपोर्ट खोटा आणि निराधार," कोळसा पुरवठा घोटाळ्याच्या आरोपावर Adani Groupचं स्पष्टीकरण
13
"पैसे देऊन गर्दी करतात", मोदींच्या विधानावर सपा नेत्याचा संताप; म्हणाले, "भाजपाचे बादशाह..."
14
Aadhar Card : १४ जूननंतर जुने आधार कार्ड खरोखरच निरुपयोगी होईल का? जाणून घ्या संपूर्ण सत्य
15
Tata Safari Review: टाटाची सफारी, चिखलात घातली, डोंगरात पळविली, १००० किमी चालवली; मायलेज, फिचर्स कशी वाटली...
16
राजकुमार रावचा 'गजगामिनी वॉक' पाहून पोट धरुन हसाल, 'हीरामंडी'च्या बिब्बोजानची केली कॉपी
17
१७ हंगाम अन् ६ संघ! Dinesh Karthik च्या IPL कारकिर्दीला पूर्णविराम
18
“काही नेत्यांची कीव येते”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी वसंत मोरेंचे रोखठोक भाष्य, दिला इशारा
19
भारत सरकारने सत्या नडेलांना ठोठावला लाखोंचा दंड! दोन महिन्यांत पैसे भरण्याचे आदेश
20
Fact Check: प्रशांत किशोर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला? व्हायरल होत असलेले पत्र आहे खोटे!

लासलगावला कांद्याच्या भावामध्ये विक्रमी घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 1:24 AM

कांद्याचे किमान निर्यात मूल्य कमी केल्यानंतरही निर्यातीमध्ये न झालेली वाढ, राज्यातील तसेच परराज्यातील बाजारपेठांमध्ये वाढलेली मोठी आवक यामुळे लासलगावच्या कांदा बाजारामध्ये सोमवारी सरासरी दरामध्ये ९०० रुपयांची घसरण झाल्याने बळीराजा धास्तावला आहे.

लासलगाव : कांद्याचे किमान निर्यात मूल्य कमी केल्यानंतरही निर्यातीमध्ये न झालेली वाढ, राज्यातील तसेच परराज्यातील बाजारपेठांमध्ये वाढलेली मोठी आवक यामुळे लासलगावच्या कांदा बाजारामध्ये सोमवारी सरासरी दरामध्ये ९०० रुपयांची घसरण झाल्याने बळीराजा धास्तावला आहे.  केंद्र सरकारने मागील सप्ताहामध्येच कांद्याच्या किमान निर्यात मूल्यामध्ये कपात केल्याची घोषणा केली होती. सध्या श्रीलंका वगळता इतर देशांमध्ये कांदा निर्यात थंडावलेली आहे.तसेच लाल कांद्याबरोबरच रांगडा कांद्याची राज्यभरातील सर्वच बाजारपेठेत नेहमीपेक्षा सुमारे तिप्पट आवक होत आहे.  याशिवाय गुजरातसह मध्य प्रदेश व इतर राज्यांत होत असलेली कांदा आवक याचा संयुक्त परिणाम महाराष्ट्रातील लासलगाव सह विविध बाजारपेठांमध्ये जाणवत आहे. कांदा भावात वेगाने घसरण होत असल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे.  मागील सप्ताहात मंगळवारनंतर लासलगावला सोमवारी (दि. २९) कांद्याचे लिलाव झाले.मागील बंद भावाच्या तुलनेत सोमवारी किमान भावात ६००, कमाल भावात ७५२ तर सरासरी भावात नऊशे रूपये प्रतिक्विंटल घसरण झाली . सोमवारी लिलावात किमान ९०० , कमाल भाव २४०० तर सरासरी १९५१ रूपये भाव जाहीर झाला.  सरासरी भाव कमी झाल्याने कांद्याचा उत्पादन खर्चही भरून निघणारा नाही . त्यामुळे शेतकºयांच्या चिंतेत वाढ झाली आहे.  या सप्ताहात गुजरात बरोबरच मध्य प्रदेश सह इतर राज्यांत नवीन कांदा बाजारपेठेत दाखल झाल्याने महाराष्ट्रातील तेजीत असलेल्या कांद्याची मागणी कमी झाली. सोमवारपासून कांदा भावात कमालीची घसरण झाली. जोरदार थंडी आणि पोषक हवामान यामुळे कांदा एकरी उत्पादन चांगले येत आहे. .तसेच पुणे, लोणंद व अहमदनगर भागातील कांदा बाजारपेठेत तिप्पट आवक होत आहे.  गुजरात बरोबरच महाराष्ट्रात पुणे , लोणंद ,जळगाव व अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरसह सर्व आवारात अधिक कांदा आवक वाढलेली आहे. त्याचा परीणाम म्हणून आता कांदा भाव घसरण झाल झाली आहे. उन्हाळ कांदा मार्च महीन्यात बाजारपेठेत दाखल होईल . - नितीन जैन, कांदा व्यापारी, लासलगाव या वर्षी महाराष्ट्रात लाल कांद्याचे भाव टिकून होते त्यामुळे कांदा उत्पादकांमध्ये समाधानकारक वातावरण आहे. परंतु पुणे भागातील कांदा बाजारपेठेत दाखल झाला आहे. तसेच गुजरात व राजस्थान मधील कांदा आवक वाढली आहे. आता कांदा भावात सातत्य रहावे. या करीता कांदा किमान निर्यात मुल्य कमी करावे. किंवा शुन्य इतके केले तर कांदा निर्यात वाढीस मदत होईल. - नानासाहेब पाटील संचालक , नाफेडमागणीपेक्षाही पुरवठा जास्त असल्याने केंद्र शासनाने कांदा निर्यात मुल्य कमी केले पाहीजे . तसेच कांदा आवकेत वाढ होणार असल्याने भाव कमी झाल्यावर किमान आधारभूत किमतीत कांदा खरेदी करण्यासाठी नियोजन आताच केले पाहीजे. कारण सरासरी भाव पातळी ९०० रूपये इतकी कमी झाली आहे- जयदत्त होळकर , सभापती ,लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती. निर्यात सुरू नाहीबाजारात नवीन आवक वाढलेली असताना केंद्र सरकारने कांद्याचे किमान निर्यात मूल्य १५० डॉलरने कमी करून ७०० डॉलर प्रतिटन केले आहे . परंतु श्रीलंका वगळता अन्य कोणत्याही देशामध्ये सध्या कांद्याची निर्यात सुरू नाही.यामुळे देशांतर्गंत बाजारपेठेमध्ये कांद्याच्या दरामध्ये घट होऊ लागली आहे.

टॅग्स :onionकांदाMarket Yardमार्केट यार्ड