शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
2
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
3
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
4
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
5
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
6
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
7
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
8
प्रेमाचं नाटक, लग्नाचं आमिष आणि त्यानंतर...; मोहम्मद शमीच्या भावावर गंभीर आरोप
9
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
10
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
11
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
12
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झालीय? घाबरू नका, 'या' सोप्या ट्रिकने तुमचे पैसे परत मिळणार!
13
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
14
कुत्र्यापासून वाघांना धोका; कान्हा व्याघ्र प्रकल्पात ‘T-141’ वाघिणीसह तिच्या चार बछड्यांचा मृत्यू
15
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
16
प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; बेडजवळ मिळालं औषधांचं पाकीट
17
फुल क्रीम की टोंड मिल्क? तुमच्या आरोग्यासाठी कोणतं दूध चांगलं? खरेदी करण्यापूर्वी 'हे' फरक नक्की जाणून घ्या
18
Ahilyangar: "घर बांधण्यासाठी माहेरहून ४ लाख रुपये आण" सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेचं टोकाचं पाऊल
19
वॉशिंग मशीन वापरताना 'ही' चूक टाळा; कपडे होतील लवकर खराब, खिशालाही लागेल कात्री
20
'ऑपरेशन सिंदूर'चा विसर पडला? पाक परराष्ट्र मंत्र्यांचा थयथयाट; सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक विकास आराखडा पुस्तकाचे प्रकाशन

By admin | Updated: November 23, 2014 00:36 IST

नाशिक विकास आराखडा पुस्तकाचे प्रकाशन


नाशिक : क्षेत्र नियोजन, ग्राम नियोजन हे अद्यापही जुन्या नियमांवर आधारलेले आहे़ आज वेळी आली आहे की, हे मापदंडच बदलावे लागणार आहेत़ यासाठी सर्व राज्यातील नागरिकांनीच यावर चर्चा व चिंतन करून मागणी करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन न्यायमूर्ती अंबादास जोशी यांनी येथे केले़ गंगापूर रोडवरील शंकराचार्य न्यास सभागृहात शहर विकास आराखडा अन्याय निवारण कृती समितीच्या वतीने आयोजित ‘नाशिक विकास आराखडा चिंता अन् चिंतन’ या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते़ न्या़ जोशी, न्या़ शशिकांत सावळे, नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष नितीन ठाकरे, समितीचे अध्यक्ष निवृत्ती आरिंगळे, लेखक उन्मेश गायधनी यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले़ न्या़ जोशी म्हणाले, अन्यायाचा प्रतिबंध हीच न्यायाची पहिली पायरी आहे़ जनतेसाठी करण्यात येत असलेल्या कामाचा कोणताही अहवाल गुप्त असू शकत नाही़ जर तो गुप्त ठेवला जात असेल तर ती गैरप्रकाराची सुरुवात असते़ यावर वेळीच आवाज उठविण्याची गरज आहे़ खटल्यांची संख्या वाढते आहे याचे दुसरे कारण लोकांमधील सामंजस्यपणा घटत चालला आहे़ यावेळी न्या़ सावळे यांनी आपले मनोगत व्यक्त करत कृती समितीने असेच कार्य सुरू ठेवण्याची सूचना केली़
याप्रसंगी आमदार सुधीर तांबे, माजी खासदार प्रतापदादा सोनवणे, सेनेचे दत्ता गायकवाड, नगरसेवक दामोदर मानकर, तानाजी जायभावे, गजानन शेलार, तानाजी फडोळ आदि उपस्थित होते़